Posts

Showing posts from March, 2014

अज्ञान

मानवी जीवनात कोणत्याही प्रकारचा कलह किंवा वादंग होतो त्यामागे अज्ञान हा प्रमुख घटक असतो . कोणत्याही घटका संदर्भात अज्ञान असेल तर त्या घटकाचे महत्व असो की मुल्यांकन करताना मानव गल्लत करणे स्वाभाविक आहे . वर्तमान मानवी समाजात विवाह संदर्भात अज्ञान आहे तसेच वैवाहिक जीवनाचे सर्रास अवमूल्यन करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे . अर्थात असा प्रकार नसता तर वैवाहिक जीवनात कलह , वादंग , तणाव निर्माण होणे असो की घटस्फोट होण्याचे प्रकार निर्माण झाले नसते . भारतीय संस्कृतीमध्ये विवाह एक संस्कार आहे . संस्कार असल्याने संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे . संस्कार असो की संस्कृती यांचा अंगिकार करताना मानव यासंदर्भात आकलन करतो किंवा विचार करतो असा कोणताही नियम नाही . संस्कार असो की संस्कृती यांचे पालन करताना मानव अनेकदा अंधानुकरण करण्याचा प्रयत्न ते प्रकार करतो . विवाह हा संस्कार देखील याला अपवाद नाही . मानव विवाह करताना देखील अनुकरण करण्याचा प्रकार सरार्स घडतो . अर्थात याचा प्रत्यय साम...