घटस्फोट समस्या की समाधान ?

मानवी जीवन समस्या यामध्ये एक अतूट नाते आहे. कोणत्या मानवाच्या जीवनात कोणती समस्या कधी डोकावणार याचा कोणताही नियम वा भरवसा नाही. प्रत्येक मानवाच्या जीवनात समस्या आहेत पण मानव समस्येला समस्या मानतो असा काही नियम नाही.
वर्तमान मानवी जीवनात घटस्फोट ही एक समस्या आहे. अर्थात काही मानव मात्र घटस्फोट म्हणजे एक समाधान मानतात हा भाग वेगळा आहे. भारतीय समाजात घटस्फोटाला प्रारंभ करणे असो किंवा मान्यता प्रदान करताना एक समाधान हे त्याचे प्राथमिक किंवा प्रारंभिक स्वरुप होते.
कालानुरुप परिवर्तन हा निसर्गाचा गुणधर्म, स्वभाव आहे. निसर्गातील प्रत्येक घटकात, प्रत्येत क्षणात परिवर्तन घडते. अर्थात मानवाला त्याची जाणीव होतेच असा नियम नाही. मानवाला जे काही जाणवत नाही किंवा समजत नाही त्याठिकाणी माणूस सहजगत्या नकार घंटा वाजवतो हा भाग वेगळा आहे.
निसर्गातील परिवर्तनाचा मागोवा घेतला तर ते दोन ध्रुवा दरम्यान असल्याचे निदर्शनास येते. समाधान हा एक ध्रुव असून समस्या हा दुसरा ध्रुव आहे. समस्या ते समाधान असो किंवा समाधान ते समस्या असा परिवर्तन प्रवास सातत्याने सुरु आहे.
कधीकाळी समाधान असणारा घटस्फोट आजच्या काळात समस्या हे स्वरुप धारण करीत आहे. खुद्द न्यायालयाने घटस्फोटाचे वाढते प्रमाण लक्षात घेता चिंता व्यक्त केली आहे. आपण घटस्फोटाला जर समाधान मानले तर क्षणभर विचार करण्याची गरज आहे.
घटस्फोटाने वास्तवात समस्या नाहीशी होते की काही काळापुरती नाहीशी झाल्याचा आभास निर्माण होतो याचा विचार करुन पहा. ज्या दोन व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात कलह, विवाद ते वितंडवाद असतो त्यांना विभक्त करण्यात येते. इतर शब्दात विभक्त करुन संवादाचा अभाव निर्माण करीत विवाद सोडण्याचा काहीसा प्रकार आहे.
घटस्फोट नंतर कोणत्या प्रकारचा संवाद होत नसल्याने विवादाचा प्रश्नच निर्माण होणार नाही पण हा जो काही इलाज आहे तो लक्षण आधारित असून निदानत्मक उपचार नाही. लक्षण दिसत नाहीत म्हणून निरोगी समजणे असा प्रकार आहे.
दोन व्यक्ती मध्ये कोणत्याही कारणास्तव कलह, विवाद ते वितंडवाद होतो यामागे दोन्ही व्यक्तीमध्ये असणारे स्वाभाविक गुण-दोष जबाबदार असतात. या गुण-दोषांचा इलाज करता सरळ विभक्त करण्यात येते. जो काही दोष असतो तो तसाच राहतो यामुळे अनेकांचे दोन-तीन घटस्फोट होतात.
इतर शब्दात सांगायचे झाले तर घटस्फोट समस्या काही काळासाठी स्थगित करण्याचा प्रयत्न ते प्रकार आहे. घटस्फोट समस्या नाहीशी झाल्याचा आभास निर्माण करतो. जर घटस्फोट कौटुंबिक समस्या किंवा कलह ते हिंसाचार नाहीसा करीत असता तर समाजात या प्रकारच्या समस्यांचे अस्तित्व नाहीसे झाले असते.
घटस्फोट वैवाहिक जीवनातील समस्या नाहीश्या करण्या पेक्षा वौवाहिक जीवनच नाहीसे करते. जर वौवाहिक जीवन नसेल तर मानवी समाजाची अवस्था कोणत्या प्रकारची असेल हे सांगण्याची गरज नाही.

वर्तमान समाजात घटस्फोट त्याचे परिणाम दुष परिणाम पाहण्यास मिळतात. अर्थात यासाठी नाण्याच्या दोन्ही बाजू पाहण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते