दिसणे की असणे ?

निवडणूकांच्या रणधुमाळीस प्रारंभ होताच भारतीय समाजकारणात दावे-प्रतिदावे, पैजा पासून वाद-विवाद ते हाणामारी या प्रकारास सुरुवात होणे हा प्रकार स्वाभाविक आहे. भारतीय समाजातील बहुसंख्य व्यक्तींना स्वतःच्या घरात काय सुरु यासंदर्भात प्रसंगी कल्पना नसते पण राजकारणात काही घडो त्या संदर्भात बित्तम बातमी ते अंदाज असतो.
भारतीय समाजातील बहुसंख्य व्यक्तींना प्रमाणा बाहेर राजकारणात स्वासस्य असल्याचे सहज निदर्शनास येते. भरीस भर सामाजिक सांकेतीक स्थळांची यामध्ये भर पडत असल्याचे सहज निदर्शनास येते.
कोणत्याही सामाजिक सांकेतीक स्थळाला भेट देताच सध्या राजकीय संदर्भांना अनन्य साधारण महत्व प्रदान करण्यात येत असल्याचे सहज जाणवते. अर्थात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असून त्याने काय करावे यासंदर्भात जो तो स्वतंत्र आहे. पण आम्हाला स्वातंत्र्य व स्वैराचार यामध्ये असणारे अंतर माहित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो कारण मी सत्य यासाठी हट्ट करताना अनेक व्यक्ती मर्यादा उल्लंघन करीत आहेत.
अनेक व्यक्ती इतरांना मूर्ख ते बावळट ठरवण्याचा प्रयत्न ते प्रकार करतात. अनेक व्यक्ती इतरांच्या मताचे खंडन-मुंडन करण्याचा प्रयत्न करतात पण आपण जो काही प्रकार करतो त्यामागे कोणता आधार आहे याचा साधा विचार करीत नाहीत.
कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे मत असो की कोणत्याही प्रकारची कृती वा निर्णय असो त्यामागे त्याचे काही व्यक्तिगत संदर्भ असतात. इतर शब्दात सांगायचे झाले तर स्वभाव सापेक्षता असते.
काही व्यक्ती दिसण्याला प्राधान्य देतात तर काही व्यक्ती असण्याला प्राधान्य देतात मात्र माणसाचे दिसणे असो की असणे याला काही मर्यादा आहेत. काही व्यक्ती बोलण्यास प्राधान्य देतात तर काही व्यक्ती बोलण्यापेक्षा कृतीला प्राधान्य देतात.
बोलणारा व्यक्ती काय बोलतो यापेक्षा आपण त्याचे आकलन कोणत्या प्रकारे करतो याला अनन्य साधारण महत्व आहे. कोणताही व्यक्ती कोणती कृती करतो यापेक्षा ती कृती आपण कोणत्या प्रकारे आत्मसात करतो याला महत्व आहे. मात्र अनेकदा मानवाला यासंदर्भात सोयिस्कर विस्मरण होते.
मानव इतरांच्या बोलण्यास असो की वागण्या संदर्भात जे काही व्यक्तिगत आकलन करतो हेच इतरांचे सत्य असल्याचा दावा करतो. वर्तमान समाजात याप्रकारच्या व्यक्तींची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे.
राजकीय नेते असो की कार्यकर्ता अथवा सामान्य व्यक्ती इतरांचे परिक्षण करतात व त्याला इतरांचे सत्य असल्याचा दावा करतात. निवडणूका काळात तर याला खूप चालना मिळते. इतर राजकीय पक्ष असो की नेता हे कसे नालायक आहेत याचे पध्दतशीर विषश्लेषण इतरांना सांगण्यात येते. थोडक्यात इतरांना नालायक ठरवत स्वतःला लायक ठरवण्याचा प्रकार वारंवार करण्यात येतो. जो माणूस इतरांची लायकी ठरवण्याचा ते काढण्याचा प्रयत्न करतो त्याचा इतका दुसरा कोणीही नालायक नसतो.
निवडणूका काळात वेगाने चालना मिळते तो प्रकार म्हणजे भूलथापा. समाजाला अनेक प्रकारची दिवास्वप्न दाखवण्याचा तसेच स्वतः देखील पाहण्याचा प्रयत्न ते प्रकार वारंवार घडतो. कालांतराने वास्तवाची जाणीव होते मात्र तोपर्यत उशिर झालेला असतो.
निवडणूका काळात काही व्यक्ती सामाजिक जीवनात व्देषाचे निखारे पेटवणे ते त्यावर फुंकर मारण्याचा वारंवार प्रयत्न करता कारण यांची पोळी भाजली पाहिजे. प्रसंगी इतरांचे घर पेटले किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तरी हरकत नाही पण यांचे इप्सीत साध्य होण्याशी यांना मतलब असतो. याप्रकारच्या व्यक्ती समाजिक आरोग्यासाठी हानीकारक असतात.
व्देष त्याठिकाणी अहंकार आहे. अहंकारी माणूस स्वतःच्या हितासाठी इतरांचा बळी देण्यास सहज तयार होतो. अहंकारी माणूस मतांध असतो तसेच मी सर्वज्ञ या थाटात वावरताना इतरांची अक्कल काढणे असो की नुकसान करणे यासारख्या कृती करताना कचरत नाही.
रावण असो की दुर्योधन अथवा हिटलर, मुसोलिनी ही काही अहंकाराची ठळक उदाहरणे आहेत. भारतीय राजकारण असो जागतिक राजकारण अथवा समाजकारण यामध्ये अनेक अहंकारी आहेत पण त्यांना अहंकारी मानवाचा अंत कसा होतो याचे सहज विस्मरण होते.
वर्तमान परिस्थितीमध्ये कोण काय करतो यापेक्षा आपण स्वतः काय करतो याचा विचार ते सवंग अभ्यास करणे अंत्यत महत्वाचे आहे. किंबहुना ही काळाची गरज आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही असे मला वाटते.

आपण दिसण्याला की असण्याला अथवा भासण्याला सत्य ते परिपूर्ण मानत वाटचाल करीत आहोत का? या प्रश्नाचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. जर विचार केला तर भारतीय समाजाची प्रगती होणार आहे. पण विचार न करता अहंकाराला खतपाणी देण्याचा प्रकार केला तर मात्र अधोगतीच्या दिशने प्रवास तो देखील अत्यंत व्यापक वेगाने करणार आहोत. निर्णय आपणच करणार आहोत तसेच परिणाम देखील आपणच भोगणार आहोत.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते