अज्ञान

मानवी जीवनात कोणत्याही प्रकारचा कलह किंवा वादंग होतो त्यामागे अज्ञान हा प्रमुख घटक असतो. कोणत्याही घटका संदर्भात अज्ञान असेल तर त्या घटकाचे महत्व असो की मुल्यांकन करताना मानव गल्लत करणे स्वाभाविक आहे.
वर्तमान मानवी समाजात विवाह संदर्भात अज्ञान आहे तसेच वैवाहिक जीवनाचे सर्रास अवमूल्यन करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. अर्थात असा प्रकार नसता तर वैवाहिक जीवनात कलह, वादंग, तणाव निर्माण होणे असो की घटस्फोट होण्याचे प्रकार निर्माण झाले नसते.
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह एक संस्कार आहे. संस्कार असल्याने संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. संस्कार असो की संस्कृती यांचा अंगिकार करताना मानव यासंदर्भात आकलन करतो किंवा विचार करतो असा कोणताही नियम नाही.
संस्कार असो की संस्कृती यांचे पालन करताना मानव अनेकदा अंधानुकरण करण्याचा प्रयत्न ते प्रकार करतो. विवाह हा संस्कार देखील याला अपवाद नाही. मानव विवाह करताना देखील अनुकरण करण्याचा प्रकार सरार्स घडतो. अर्थात याचा प्रत्यय सामाजात पाहण्यास मिळतो.
कोणत्याही विवाहीत व्यक्तीला तो बेसावध असताना अचानक त्याने विवाह करण्याचे कारण काय? असा प्रश्न करताच मिळणारे उत्तर वास्तवाचा प्रत्यय देते.
कधी विचार केला नाही, सगळे करतात यामुळे केला, संस्कृती-परंपरा यांचा एक भाग आहे, शारिरीक गरजांची पूर्तता करण्यासाठी, कामवासना पूर्तीसाठी या सारखी उत्तरे मिळतात.
वर्तमान मानवाला मुळात स्वतः संदर्भात व्यापक प्रमाणात अज्ञान असल्याने वैवाहिक जीवन संदर्भात ज्ञान असेल का? वर्तमान मानव स्वतःला स्वावलंबी ते परीपूर्ण समजतो यामुळे स्वतः संदर्भात कधी विचार करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
वर्तमान समाजातील मानव मुळात स्वतः संदर्भात अभ्यास करीत नाही. जो मानव स्वतः संदर्भात अभ्यास करतो त्याला स्वतःच्या अपूर्णत्वाची जाणीव होते. तसेच स्वतःच्या परावलंबनाची जाणीव होते. दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर जो माणूस आत्मपरिक्षण करतो त्याला स्वतः मधील कमतरता, उणीव, त्रुटी यांची जाणीव होते.
वर्तमान मानवी समाजात आत्मपरिक्षण करण्याचे प्रमाण नगण्य असून परपरिक्षण करण्याचे प्रमाण अधिक आहे. आत्मपरिक्षण करण्याचा अभाव त्याठिकाणी अहंकार असणे स्वाभाविक आहे.
अहंकारी मानव इतरांचे अवमूल्यन करतो. या अवमूल्यनात वैवाहिक जीवन असो की जीवनाचा जोडीदार असो यांचा सामावेश असतो. जितका प्रबळ अहंकार तितके प्रबळ अज्ञान असते.
अज्ञानी असो की अहंकारी असो स्वतःला परिपूर्ण मानतो मात्र निसर्गानेच मानवाची रचना करताना पुरुषाला स्त्रीविना तसेच स्त्रीयांना पुरुषाविना अपरिपूर्ण केले आहे. कोणताही पुरुष स्त्रीविना परीपूर्ण होत नाही तसेच स्त्री पुरुषाविना परीपूर्ण होत नाही.
आपण एकमेकाविना अपरिपूर्ण आहोत याची जोपर्यंत पती-पत्नी यांना जाणीव होत नाही तो पर्यंत वैवाहिक जीवनाचे महत्व असो की मुल्यांकन होणार नाही तसेच त्याविना वैवाहिक जीवनातील कलह, वादंग, विवाद नाहीसे होणार नाहीत.

वर्तमान समाजाला वास्तवात घटस्फोट पेक्षा खरी गरज आहे ती ज्ञानाची. पण जो स्वतःला ज्ञानी समजतो त्याला ज्ञान मिळणार का?

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते