सरड्याची धाव कुंपणापर्यंत


सरड्याची धाव कुंपणापर्यंत अशी एक मराठी म्हण आहे. थोडक्यात प्रत्येकाच्या प्रत्येक क्षमतेला एक मर्यादा आहे. वर्तमान सामाजिक जीवन असो की व्यक्तिगत जीवन असो मानव या मर्यादांचे भान राखत नाही मात्र भान राखले किंवा नाही तरीही मर्यादा आहेत यावस्तावला नाकारता येत नाही.
सध्या कोणत्याही सामजिक सांकेतिक स्थळाला भेट द्या म्हणजे सरड्याची धाव कुंपणा पर्यंत यासंदर्भात प्रत्यय मिळणार आहे. मानव म्हणजे अज्ञानाचे एक चालते-फिरते दुकान आहे तसेच मानव चालता फिरता अज्ञानाचे मुक्तहस्ताने वाटप करतो मात्र त्याला ज्ञान समाजात वाटप करतो यामुळे सामाजिक जीवनात कलह, वादंग ते हिंसाचार घडतात.
मानवाचे कोणत्याही पातळीचे जीवन पहा तो फक्त मी आणि माझा यांचा विचार करतो अर्थात असा विचार करणे हा मानवी स्वभाव आहे मात्र ‘स्व’ भावला प्राधान्य देताना मात्र तू तसेच तुझा यांना दुय्यम दर्जाची वागणूक देणे, तुच्छ समजणे सारखा प्रकार करतो कारण अपुरी बुद्धिमत्ता. अपुरी बुद्धिमत्ता असणारा माणूसच मी व माझा विचार करताना इतरांना सरळ दुर्लक्षित करतो, ग्राह्य मानतो, हीन समजतो, थोडक्यात दुसर गेला गाढवाच्या.........
माणूस मी व माझा यांना प्राधान्य देताना अस्मिता, स्वाभिमान, प्रतिष्ठा यांचा अंतर्भाव असतो मात्र दुसऱ्यांना देखील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिष्ठा असते याचे विस्मरण होते. सध्या कोणता माणूस कोणत्या घटकात अस्मिता-स्वाभिमान पाहणार याच भरवसा नाही. सध्या भाषा म्हणजे अस्मिता व स्वाभिमान असा एक समज-गैरसमज व्यापक प्रमाणात प्रचलित असून यावरून इतर भाषिकांना त्रास देण्यात येतो किंबहुना त्यांनी माझीच भाषा वापरावी अशी सक्ती करण्यात येते. मात्र ज्याला त्याला ज्याची त्याची भाषा आहे तिच्या सोबत अस्मिता, स्वाभिमान आहे याचे भान राखले जाते का? मुळात संकुचित बुद्धी असल्यानेच अभिव्यक्तीच्या एका मध्यमा सोबत अस्मिता-स्वाभिमान जोडण्यात येतो. थोडक्यात सरड्याची धाव दुसरे काय?
सध्या स्थानिक व अस्थानिक असा विचार करण्याची प्रथा रूढ होत आहे. तसेच अस्थानिकाना त्रास देणे, मारहाण करणे, हुसकावण्याचा प्रयन्त करणे असे प्रकार वारंवार घडतात. मुळात मानवाचा उगम हा आफ्रिका खंडात असल्याचे विज्ञान सांगते तसेच इथले मूळ निवासी हे आदिवासी आहेत बाकी सगळे उपरे असताना मी स्थानिक व तू अस्थानिक असा प्रकार सुरु आहे कारण सरड्याची धाव.
इथे सरडा हा शब्द लागू पडतो कारण मानवी स्वभावाचा मी व माझ्या साठी रंग बदलणारी प्रवृत्ती. सरडा हा प्राणी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी रंग बदलतो मात्र माणूस स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी रंग बदलतो. आज भाषा असो की प्रांत अथवा धर्म की जात यांचा फायदा मिळावा तो देखील मला तसेच माझ्या या वर्गवारीत मोडणाऱ्या लोकानांचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतो. मात्र आपण जी काही कृती करतो त्याचे सामाजिक परिणाम व दुष्परिणाम यांचा विचार केला जात नाही. आपली कृती समाजाला दुभांगण्याचे काम करते किंवा सामाजिक तेढ निर्माण करीत देशाच्या ऐक्याला खंडीत करते याच्याशी काही देणे घेणे नाही कारण खुजी बौद्धिक क्षमता.
जो व्यक्ती मी व माझा यांना प्राधान्य देतो तो सर्वात प्रथम मी ला प्राधान्य देतो नंतर माझा. माझा यामध्ये सुद्धा वर्गीकरण करीत प्रथम कुटुंब नंतर इतर घटक म्हणजे भाषा, प्रांत, जात, धर्म आणी आठवण होणार त्यावेळी देश. माणूस ज्या मी व माझ्या या संकल्पना साठी जे काही प्रयन्त करतो त्यापैकी कोणत्या घटकाचे अस्तित्व किती? तसेच त्या घटकाचे वास्तव काय? समस्त घटकांना जन्म तसेच मृत्यू आहे. समस्त घटक म्हणजे मानवाने काळाच्या ओघात निर्माण केलेल्या संकल्पना आहेत. समस्त संकल्पना एक आभास निर्माण करतात व माणूस या आभासाला सत्य मानत बळी पडतो.
एकीकडे आभासाला सत्य मानतो त्याला मनोरुग्ण समजण्यात येते मात्र स्वतःचा आभास हे सत्य? असा प्रकार घडतो कारण संकुचित दृष्टी व आकलन थोडक्यात सरड्याची धाव.... आपण स्वतः काय करतो एकदा तपासून खातरजमा करून घ्यावी. आपण एक जात-धर्म-प्रांत-भाषा असो की समाज अथवा देश यांच्या हिताचा विचार करताना दुसऱ्या घटकांना दुय्यम मानतो का? याचे उत्तर होकारार्थी असेल तर स..............

Comments

Popular posts from this blog

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते