Posts

हिंदुत्व वा धर्म कट्टरपणा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असो समाजकारणात ते सामाजिक सांकेतिक स्थळावर हिंदुत्व संदर्भात खूप चर्चा होत आहे. निवडणुका काळात जितकी चर्चा झाली नाही त्यापेक्षा कैक पटीने सध्या चर्चा केली जात आहे. हिंदुत्व संदर्भात अनेक समज ते गैरसमज आहेत अखेर माणूस म्हंटले कि समज व गैरसमज निर्माण होणे स्वाभाविक आहे. हिंदू धर्म म्हणजे नेमका कोणता धर्म? हिंदू संस्कृती म्हणजेच धर्म का? वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म का? असे अनेक प्रश्न असून यांची उत्तरे म्हणजे समज व गैर समज आहेत. काही व्यक्ती स्वतःचा समज हेच सत्य मानतात कारण स्वाभविक अज्ञान. समज हाच गैरसमज याचे ज्ञान घेण्यासाठी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. वर्तमान समाजात आत्मपरीक्षण म्हणजे काहीतरी भयंकर असा एक समज आहे. समाजात जितकेही कट्टर वादी आहेत विशेषतः त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे पण सध्या ते अशक्य असे दिसते. राजकीय पक्ष व त्यांचे हिंदुत्व त्यामधून त्यांचा होणारा फायदा हे समजण्या सारखे आहे पण त्या पक्षांना समर्थन देणारे जे कोणी समर्थक आहेत त्यांचे काय? अर्थात कोणी कोणत्या गोष्टीचे समर्थन करावे व का करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असून त्य...

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

सामाजिक सांकेतिक स्थळाला भेट देताच सर्वात प्रथम मराठीतील हि म्हण आठवते कारण कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीच्या कृती संदर्भात तत्परतेने प्रतिक्रियांचा अक्षरशा पाऊस सुरु होतो तो देखील रिमझिम नसून मुसळधार असतो. त्यामध्ये राजकीय संदर्भ असेल किंवा राजकारणा सोबत निगडीत असेल तर विचारता सोय नाही. महाराष्ट्रातील निवडणुका असो कि त्यांचे निकाल ते वर्तमान घडामोडी यासगळ्या संदर्भात एकाचा व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहिल्या नंतर हसावे कि रडावे असा प्रश्न निर्माण होतो. मिडिया व पत्रकार यांच्या संदर्भात कमीत कमी व्यवसायाचा एक भाग म्हणत दुर्लक्ष करता येते पण सामान्य माणूस देखील यात हिरारीने भाग घेत क्षणाक्षणाला प्रतिक्रिया बदलतो. राजकारण हे बुद्धीबळाच्या खेळा पेक्षा जटील आहे. बुद्धीबळाच्या खेळात दोन व्यक्ती सोंगटी व त्यांची चाल निश्चित करीत असतात पण राजकारणाच्या पटावर सोंगटी देखील स्वतःची चाल करीत असते व त्याचा अंदाज घेत खेळ खेळला जातो. अंदाज कधी बरोबर ठरतो तर कधी चुकतो. राजकारणात अनेकदा खेळी करायची असते एक तर दर्शवली जाते एक. राजकारणात विचारधारा, पक्ष व पक्षनिष्ठा हे फक्त बोलण्...

ना राम, ना देव, ना बाबा, फक्त एक हस्तक.

भारतात कृती महत्वाची नसून नाव व पेहराव खूप महत्वाचा आहे त्यामध्ये नावात बाबा असेल व राम देखील असेल तर विचारता सोय नाही. योगगुरू रामदेव बाबा यांच्या एकंदरीत नावात व कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे साम्य नाही. रामदेव बाबा सध्या चर्चेत आहेत कारण मूलनिवासी आंदोलन व रामास्वामी पेरियार यांच्या संदर्भात काही विधान केली आहेत. अर्थात त्यांनीच हि विधाने केली कि नाही यासंदर्भात शंका निर्माण होते कारण सध्या बनावट व्हिडीओ, बनावट चित्र यांचा खूप सुळसुळाट आहे भरीस भर मीडियाची विश्वासहर्ता कालबाह्य होण्यात जमा आहे. पण या व्यक्तीचा एकंदरीत प्रवास पाहता व्यक्तव्य करण्याची शक्यता अधिक आहे. टीम अण्णा आंदोलन मधील एक लाभार्थी म्हणजे रामदेव बाबा. एकीकडे स्वतःची सेना निर्माण करण्याची वल्गना करीत सलवार घालून स्त्र्यीयांच्या मदतीने पलायन प्रयत्न करणारा हाच बाबा रामास्वामी पेरियार यांना मारण्याची भाषा करू शकतो. एकीकडे स्वतःला योगगुरू हे बिरूद लावून मिरवतात पण प्रत्यक्षात योग म्हणजे जोडणे पण हा बाबा नेहमी तोडण्याची भाषा करीत आला आहे. नावात राम आहे याचे देखील भान नाही. भगवान राम यांनी कोणाच्या होडीतून नदी पार...

धर्मांतर कथा व व्यथा?

भारतात सध्या धर्म व धर्मांतर यासंदर्भात सामाजिक सांकेतिक स्थळावर खुपकाही लिहिले जात आहे. लिखाण करणारे अथवा शेअर करणारे यांचा मागोवा घेतला तर त्यांची एकाच संघटनेची असणारी पार्श्वभूमी त्वरित लक्षात येते पण तो आपला मुख्य मुद्दा नाही. जागतिक इतिहासात धर्मांतर संदर्भात अनेक घटना आहेत. लोक धर्मांतर का करतात? या प्रश्नाचा मागोवा घेताना धर्म व त्यामधील तत्व यांचे आकलन करून धर्मांतर केलेल्या व्यक्तींची संख्या जवळपास बोटावर मोजण्या इतकी आहे. जे धर्म ज्ञानातून धर्मांतर करतात त्यांना काही अडचणी जाणवत नाहीत. समजा जाणवली तरी ज्ञानातून मार्ग मिळतो. धर्मांतर करण्यात प्रमुख कारण सापडते ते म्हणजे दर्जा, वर्तमान धर्मात किंवा समाजात जे खालच्या स्तरावर असतात ते वरच्या दर्जाच्या अपेक्षेने धर्मांतर करतात. या प्रकारचे धर्मांतर अधिक प्रमाणात आढळते. जगातील सगळ्या धर्मात व समाजात स्तर रचना असल्याचे निदर्शनास येते. धर्मातील स्तर रचना मागे वास्तवात अहंकार आहे पण तो अप्रत्यक्ष स्वरुपात असतो. जगातील कोणत्याही धर्माचा अभ्यास करताना स्तर रचना निदर्शनास येते मात्र धर्मांतर करतात ते याचा कितपत अभ्यास करतात हे स...

जे एन यु घृणा का?

जे एन यु गेल्या काही वर्षात खूप प्रसिद्ध झाले आहे अर्थात काहींच्या दृष्टीने ते चांगले आहे तर काहींच्या दृष्टीने वाईट आहे. कोणत्याही ठिकाणी योग्य व अयोग्य, चांगले व वाईट हे असणे स्वाभाविक आहे कारण सापेक्षता विना आकलन होत नाही. असो सध्या जे एन यु विद्यार्थी फी वाढ करण्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत तर सरकार नेहमीप्रमाणे ते मोडीत काढण्याचा प्रयत्न ते प्रकार करीत आहे. वर्तमान सरकारचे जे एन यु वरती खास प्रेम आहे असो तो राजकारणाचा एक भाग आहे. राजकारणा पलीकडे जे समाजकारण आहे त्यामध्ये जे घडते ते निश्चित चिंता जनक आहे. सामाजिक सांकेतिक स्थळावर ज्याप्रकारच्या प्रतिक्रिया वाचनात येतात त्याचा अभ्यास केला तर भावी समाज व भावी पिढी यांच्या संदर्भात चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे. अर्थात सगळ्या व्यक्तींचा वा समाजाचा असाच निष्कर्ष असेल किंवा असावा असा विचार करणे मूर्खपणा ते अज्ञान द्योतक आहे. समर्थन अथवा विरोध करणारे कोणत्याही पातळीचा वा थराचा विचार न करता टीकाटिप्पणी करतात हा त्यांच्या संस्काराचा एक भाग आहे, काही काळाने त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. पण टीकाटिप्पणी करताना वास्तवाचा ...

बेगडी देशभक्ती

कोणत्याही सामाजिक स्थळाला भेट देताच वंदे मातरम बोलणे व देशभक्ती यावर टिप्पणी असल्याचे निदर्शनास येते. जे कोणी वंदे मातरम म्हणत नाहीत ते देशद्रोही आहेत असा आरोप करण्यात येतो पण खरी गंमत म्हणजे आरोप करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण वंदे मातरम म्हणता येत नाही असे अनेक व्हिडीओ वारंवार पाहण्यात येतात. इतरांनी काय करावे हे सांगणाऱ्या व्यक्तीला आपण स्वतः काय करतो याचे भान वा जान नसल्याचे निदर्शनास येते. नुसत्या घोषणा दिल्या म्हणजे देशभक्ती होते का? देशभक्ती इतकी क्षुल्लक गोष्ट आहे का? वर्तमान समाजातील सामाजिक सांकेतिक स्थळांना भेट देताच देशभक्ती व त्यावरील मक्तेदारी प्रकर्षाने जाणवते. सोबत होणारी फजिती देखील दिसते. आपण इतरांच्या देशभक्ती संदर्भात शंका घेतो कारण आपली देशभक्ती बेगडी आहे. जो बेगडी देशभक्त आहे त्याच्याच मनात इतरांच्या देशभक्ती संदर्भात शंका निर्माण होतात. दोष सृष्टी मध्ये नसून दृष्टीत आहे. कोणताही देशभक्त इतरांच्या देशभक्तीची तपासणी करणे किंवा प्रमाणपत्र देण्याच्या फंदात पडत नाही. देश म्हणजे काय? तसेच त्याची भक्ती काय असा प्रश्न घोषणावादी तरुणांना केला तर काय प्रतिक्रिया मिळते...

मंदिर-मस्जिद की सगुण-निर्गुण

राम मंदिर व बाबरी मस्जिद संदर्भात न्यायालयाने निकाल दिला. कोणत्याही न्यायालयात न्याय होतो सोबत अप्रत्यक्ष स्वरुपात अन्याय देखील होतो. न्याय व अन्याय हे विरुद्ध अर्थी शब्द असले तरी ते परस्पर सापेक्ष व पूरक असून या दोघांना स्वतंत्र असे अस्तित्व नाही. न्यायालीन निकालांचा सगळ्यांनी आदर करावा. कारण न्यायालय त्यांच्या समोर मांडण्यात येणाऱ्या समस्त घटकांचा विचार करून निर्णय घेते. अर्थात तो निर्णय काही व्यक्तींना न्याय वाटतो तर काहींना अन्याय वाटतो यामध्ये काही नवल किंवा वेगळे नाही. मत मतांतर ते मतभेद हे माणसांच्या जिवंतपणाचे एक लक्षण आहे. पण माझेच मत अंतिम सत्य हे मानवी अहंकाराचे एक लक्षण आहे. न्यायालय निकाल नंतर मिडिया पुन्हा निकाल व त्यामागील खटला ते घटनाक्रम याच्या मागे लागली. मिडिया मध्ये कृती पूर्वी विचार करणे किंवा जबाबदारीचे भान असणे हा प्रकार खूप पूर्वीच काळबाह्य झाला आहे. पत्रकारिता एक धंदा आहे त्यामधून अर्थाजन करणे हेच ध्येय आहे कि काय असा प्रश्न निर्माण होतो. काही असो त्यांनी काय बोलावे हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे पण यामुळे सामजिक संस्कार व मानसिकता यांच्या...