हिंदुत्व वा धर्म कट्टरपणा
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असो समाजकारणात
ते सामाजिक सांकेतिक स्थळावर हिंदुत्व संदर्भात खूप चर्चा होत आहे. निवडणुका काळात
जितकी चर्चा झाली नाही त्यापेक्षा कैक पटीने सध्या चर्चा केली जात आहे.
हिंदुत्व संदर्भात अनेक समज ते गैरसमज आहेत अखेर
माणूस म्हंटले कि समज व गैरसमज निर्माण होणे स्वाभाविक आहे. हिंदू धर्म म्हणजे
नेमका कोणता धर्म? हिंदू संस्कृती म्हणजेच धर्म का? वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म
का? असे अनेक प्रश्न असून यांची उत्तरे म्हणजे समज व गैर समज आहेत. काही व्यक्ती
स्वतःचा समज हेच सत्य मानतात कारण स्वाभविक अज्ञान. समज हाच गैरसमज याचे ज्ञान
घेण्यासाठी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
वर्तमान समाजात आत्मपरीक्षण म्हणजे काहीतरी
भयंकर असा एक समज आहे. समाजात जितकेही कट्टर वादी आहेत विशेषतः त्यांनी
आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे पण सध्या ते अशक्य असे दिसते.
राजकीय पक्ष व त्यांचे हिंदुत्व त्यामधून
त्यांचा होणारा फायदा हे समजण्या सारखे आहे पण त्या पक्षांना समर्थन देणारे जे
कोणी समर्थक आहेत त्यांचे काय? अर्थात कोणी कोणत्या गोष्टीचे समर्थन करावे व का
करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असून त्यामध्ये त्याची विद्वत्ता व संस्कार यांची
निर्णायक भूमिका असते.
सामान्यतः आपण कोणत्याही प्रकारची कृती करताना
थोडाफार विचार करतो किंवा त्या मागील उद्देश तरी आपणास माहित असतो. जे कोणी
हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते ते प्रचारक आहेत त्यांना ते धर्माचे म्हणजे पवित्र
काम करतात असे वाटणे स्वाभाविक आहे. कोणत्याही धर्माचा विचार करता त्यामध्ये समाज
देखील तितकाच महत्वाचा आहे.
हिंदुत्ववादी समर्थक व प्रसारक यांनी समाजाच्या
ते देखील हिंदू समाजाच्या उन्नती साठी नेमके काय केले असा मला एक प्रश्न पडतो.
कारण हिंदू मुलांना मोफत शिक्षण देणारी संस्था, शिक्षणासाठी किती प्रमाणात
शिष्यवृत्ती दिली जाते? किती हिंदू मुलांना शिक्षणा साठी परगावी जावे लागते त्या
ठिकाणी त्यांची राहण्याची व जेवणाची सोय मोफत ते अल्प दरात केली जाते?
उपरोक्त प्रश्न निर्माण होतात कारण यासंदर्भात
कुठे पाहण्या वा वाचनात येत नाही. अर्थात कुठेतरी काही प्रमाणात काही ना काही होत
असेल पण ते प्रमाण नेमके कळण्यास मात्र मार्ग नाही. मंदिर व मस्जिद असेल किंवा
धर्मांतर हे मुद्दे खूप गाजत आहेत कारण इतरांचे दोष असले व नसलेले दाखण्यात
माणसाला एक विकृत आनंद मिळतो कारण एक माणूस दुसऱ्या माणसाला तसेच एक कट्टर धार्मिक
दुसऱ्या धर्माला ते धार्मिक व्यक्तीला शत्रू मानतो. यामुळे गरळ ओकतो पण कधी स्वतः
स्वतःच्या धर्माचा असो कि स्वतःच्या ज्ञानाचा अभ्यास करीत नाही.
माणूस कोणत्याही समाजाचा असो कि धर्माचा एकदा का
विरोधाचा वा शत्रुत्वाचा चष्मा घातला कि त्याला प्रत्येक ठिकाणी वास्तव न दिसता
विरोध व शत्रू दिसतो. वास्तवात सृष्टी आपण आपल्या दृष्टीने पाहतो त्याप्रमाणे दिसत
असते याची माणसाला माहिती असून जाणीव नाही यामुळे स्वतःच्या दृष्टीचा दोष दुरुस्त
न करता सृष्टी मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न ते प्रकार केला जातो.
कट्टर व्यक्ती म्हणजे वैचारिक आंधळेपणा म्हणा
किंवा वैचारिक प्रगल्भतेचा अभाव म्हणा हे अस्तित्वात असतात. आपण ज्या धर्माचे
कट्टर प्रचारक आहोत त्या धर्मातील समाजाच्या वैचारिक व सामाजिक उन्नती साठी आपले
योगदान काय? असा प्रश्न स्वतःला विचारून पहावा.
कोणत्याही समाजाच्या उन्नती साठी सर्वात प्रथम
शिक्षण नंतर ज्ञान व सलोखा ते शांतात हे घटक अत्यंत महत्वाचे आहे. आपण ज्या
धर्माचे प्रचारक ते रक्षक आहोत त्या धर्माचे आपले ज्ञान किती? त्यामध्ये ऐकीव किती
व वास्तवात ग्रंथसंपदेचा अभ्यास ते विश्लेषण किती? याचा विचार करून पहावा.
भारतीय समाजात धर्मज्ञान एकाच वर्ण ते वर्ग
यापुरते मर्यादित होते यामुळे धर्म संदर्भात ज्ञान कमी व अज्ञान अधिक, कर्म कमी
कांड जास्त असा प्रकार आहे. यामुळेच देशातील धर्मस्थान व देवस्थान अरबो ते खरबो
रुपयांचे धनी आहेत ते दुसरीकडे पुरेसा पैसा नाही म्हणून कोणाला शिक्षण घेता येत
नाही तर कोणी त्यामुळे आत्महत्या करीत आहे तर कोणी गुन्हेगारी करण्याकडे वळत आहे.
माणूस देवाला पैसा देण्या इतका मोठा झाला असून
त्याला साधे दुसऱ्या माणसात असणारा देव ते देवाचा अंश दिसत नाही म्हणजे खरेच आम्ही
आमच्या धर्माचे पालन करीत आहोत का? हिंदू संस्कृती तर निसर्गातील समस्त घटकांचा
आदर ते पूजा करणारी संस्कृती आहे पण येथे दगडात देव मानला जातो पण माणसातला देव
दिसत नाही कारण चष्मा.
राजकीय नेते असोत कि पक्ष त्यामध्ये तुमच्या
आमच्या सारखी माणसेच असून याच समाजात संस्कार ग्रहण करीत लहानाचे मोठे होतात. आता
कोणत्याही धर्माचा कोणताही नेता धर्म संदर्भात बोलत असेल ते त्याने प्रथम त्याच्या
धर्मीय समाजाच्या शिक्षण असो कि धार्मिक ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी काय केले याचा
अभ्यास करावा.
आज हिंदुत्वाची चर्चा होते त्यामध्ये किती
धार्मिक व शैक्षणिक संस्था उभारत समाजातील धर्म ज्ञान असो कि सामान्य ज्ञान
वाढण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षाने काय केले याचा अभ्यास करावा. किती हिंदू
विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची कोणती सोय केली वा त्या अनुषंगाने काय केले याचा
विचार करावा. निखळ मंदिर व मस्जिद अथवा भारत पाक करून धर्म रक्षण होणार नाही.
सर्वात प्रथम धर्म जाणावा म्हणजे राजकीय पक्ष ते
धार्मिक नेते यांचे मर्म ते वर्म मिळणार आहे. बाकी ज्याला त्याला बुद्धी आहे फक्त
आपण कृती करताना त्याचे होणारे परिणाम समाज व आपल्या भावी पिढीवर होणार आहेत याचे
भान ते जाण ठेवावी इतकीच अपेक्षा.
Comments
Post a Comment