ना राम, ना देव, ना बाबा, फक्त एक हस्तक.

भारतात कृती महत्वाची नसून नाव व पेहराव खूप महत्वाचा आहे त्यामध्ये नावात बाबा असेल व राम देखील असेल तर विचारता सोय नाही. योगगुरू रामदेव बाबा यांच्या एकंदरीत नावात व कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे साम्य नाही.
रामदेव बाबा सध्या चर्चेत आहेत कारण मूलनिवासी आंदोलन व रामास्वामी पेरियार यांच्या संदर्भात काही विधान केली आहेत. अर्थात त्यांनीच हि विधाने केली कि नाही यासंदर्भात शंका निर्माण होते कारण सध्या बनावट व्हिडीओ, बनावट चित्र यांचा खूप सुळसुळाट आहे भरीस भर मीडियाची विश्वासहर्ता कालबाह्य होण्यात जमा आहे.
पण या व्यक्तीचा एकंदरीत प्रवास पाहता व्यक्तव्य करण्याची शक्यता अधिक आहे. टीम अण्णा आंदोलन मधील एक लाभार्थी म्हणजे रामदेव बाबा. एकीकडे स्वतःची सेना निर्माण करण्याची वल्गना करीत सलवार घालून स्त्र्यीयांच्या मदतीने पलायन प्रयत्न करणारा हाच बाबा रामास्वामी पेरियार यांना मारण्याची भाषा करू शकतो.
एकीकडे स्वतःला योगगुरू हे बिरूद लावून मिरवतात पण प्रत्यक्षात योग म्हणजे जोडणे पण हा बाबा नेहमी तोडण्याची भाषा करीत आला आहे. नावात राम आहे याचे देखील भान नाही. भगवान राम यांनी कोणाच्या होडीतून नदी पार केली व कोणाची उष्टी बोरे खाल्ली होती याचे विस्मरण झाले कि माहितच नाही या बाबाला?
स्वतः आय्रुवेद व योगाचे दुकान मांडत अनेकांचे असाध्य आजार निवारण केल्याचा दावा ठोकणारा माणूस स्वतःच्या चेहरा व डोळा यांचा इलाज करू शकत नाही? विशेष म्हणजे त्या आजारावर आयुर्वेदात सर्वोत्तम औषधे आहेत. आता हा बाबा मूलनिवासी आंदोलन व अंधश्रध निर्मुलन करणाऱ्या व्यक्तीचा इलाज करण्याची भाषा वापरत आहे.
एकीकडे बाबा तर दुसरीकडे अरबोंचा व्यापारी ते मालक? ओरिसा पूरग्रस्त व्यक्तींना मदत करताना स्वतःच्या कंपनीची मुदत संपलेली अन्न पदार्थांची पाकिटे वाटणारा माणूस कोणत्या लायकीचा असेल हे मी सांगण्याची गरज नाही. जो स्वतः सरकार कडून अनुदान घेत जमीन लाटतो तो काय इतरांना मदत करणार?
आंबेडकरी जनता, मूलनिवासी आंदोलक असो कि रामास्वामी पेरियार यांना वैचारिक दहशतवादी असे संबोधन केले, पण वास्तवात धर्माच्या व जन्माच्या नावाखाली ज्यांनी शोषण करीत दहशत निर्माण केल्याचा इतिहास आहे त्यांचे लांगुन चांगुण करण्यासाठी कोणत्या थराला गेला हा माणूस?
जावे त्यांच्या जन्मा तव कळे यातना किती कठीण असे म्हणतात. या बाबाच्या गळ्यात मडके बांधून पाठीला खराटा बांधून फिरवले पाहिजे म्हणजे दहशतवादी कोण याची जाणीव होईल. याची सावली कोणावर पडली कि याला चाबकाचे फटके द्यायचे म्हणजे आंदोलन योग्य कि अयोग्य याची जाणीव होणार आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान केले असताना माझी अभिव्यक्ती म्हणजे सुविचार पण इतरांची अभिव्यक्ती म्हणजे वैचारिक दहशतवाद का? रामास्वामी पेरियार असोत कि बाबासाहेब आंबेडकर असोत यांनी स्वातंत्र्य पूर्व काळापासून संघर्ष केला. या संघर्षात स्वकीय व परकीय अश्या दोन आघाड्यावर लढा दिला होता.
स्वातंत्र पूर्व काळात असो कि नंतरच्या काळात आंबेडकर असोत कि पेरियार अथवा राजाराम मोहन राय ते नरेंद्र दाभोलकर ज्यांनी वर्ण व्यवस्था असोकी अंधश्रध्दा यावर प्रहार केला कि समाजातील एक वर्णाला खूप त्रास झाला कारण त्यांची मक्तेदारी ते दुकानदारी संपुष्टात येते. त्याच वर्णाने स्वातंत्र पूर्व काळात इंग्रजांना मदत केली त्यापूर्वी जो कोणी शासक होता त्याच्या सोबत जवळीक ठेवली होती.
वर्ण व्यवस्था व समाजावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सध्या ते सगळ्यांना धर्माचे  बाळकडू पाजत असून काही बाळबोध तरुण त्यांना बळी पडत आहेत. धर्माच्या नावाने झिंगणारे धर्म व संस्कृती यामध्ये गल्लत करीत आहेत पण जो झिंगला तो बेभान होतो, जो बेभान त्याला आपण काय व का करतो तसेच त्याचे सामाजिक परिणाम कोणत्या प्रकारचे असतील याचे भान नसते.
एकीकडे धर्माचे बाळकडू तर दुसरीकडे धार्मिक विद्वेष सोबत संविधानाची थट्टा करीत ते कसे अयोग्य हे बिंबवण्याचा प्रकार सुरु असून आता जातीयवादाला खतपाणी देत त्याची चाचपणी म्हणजे रामदेव बाबा वक्तव्य आहे. बहुजन व दलित यांच्यात संघर्ष निर्माण करून द्यायचा व तमाशा पाहत योग्यवेळी संधी साधत पुन्हा वर्चस्व मिळवणे हा मुलभूत हेतू आहे.
एकंदरीत समाजातील विवेक नाहीसा करण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यात येत आहे. विवेक नाहीसा करण्यासाठी धर्म, गाय, गोबर यांना माणूस व माणसाच्या समस्या यापेक्षा जास्त प्राधान्य देण्यात येत असून यासाठी केवळ गोहत्या या संशयावरून अथवा नावाखाली मुस्लीम असो कि दलित युवकांना मारहाण करण्यात येते.
रामदेव बाबा सध्या त्याच वरिष्ठ वर्णासाठी काम करीत असून बोलणारे जरी ते असले तरी त्यामागे असणारी शिकवणी वेगळी आहे. गांधीवध संबोधतात तेच या शिकवणीचे मास्तर आहेत. आज ना उद्या बाबा गांधीजीवर घासणार यामध्ये शंका नाही.
ज्याच्या नावात राम आहे पण कृती रावणाची म्हणजे अहंकाराची, बाबा असून संन्यासी नाही तर व्यवसाईक आहे, योगगुरू हे बिरूद पण तोडण्याची भाषा करतो त्यांचे बोलणे बाळबोध बुद्धी व्यक्तींना मनावर घेऊ नये तसेच मूलनिवासी असो कि अंधश्रद्धा निर्मुलन करतात त्यांना शिव्या देणे किंवा बदनाम करण्याचा खटाटोप करू नये.
हस्तक पुन्हा बरळला गोमांस खाण्यामुळे ग्लोबल वार्मिंग होत आहे. निखळ शिक्षणाचा अभाव असल्याने असा प्रकार होतो पण जे साक्षर बाळबोध आहेत ते या अशिक्षित माणसाची री ओढतील हे दुर्दैवी असून हस्ताकांचे यश आहे. या समस्त यशात माणूस व माणुसकी हरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते