Posts

Showing posts from December, 2011

पुढच्यास ठेच मागचा शहाणा

टीम अण्णा यांच्या मुंबई मधील आंदोलनाच्या अवस्थे पासून समाजाने जर अर्थबोध घेतला तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा होणार आहे. टीम अण्णा यांचे आंदोलन यशस्वी की अपयशी हा निष्कर्ष व्यक्तीच्या दृष्टी, आकलन सापेक्ष निकषावरून ठरणार आहे. प्रत्येक निष्कर्ष एक शक्यता पेक्षा मुल्यवान नाही तसेच सत्य नाही. आत्मपरीक्षणात्मक व विवेकी दृष्टीने पाहता या आंदोलनात अतिरेक व अट्टाहास असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्याने अल्प अथवा अपेक्षा पेक्षा कमी प्रतिसाद मिळाला या वास्तवाला नाकारता येणार नाही. आंदोलन असो की सामाजिक जीवन अथवा व्यक्तिगत जीवन या सगळ्यात कुठेतरी थांबावे लागते किंवा एक मर्यादा निश्चित करून राहावे लागते मात्र इथे नेमके तेच घडले नाही. सामाजिक आंदोलनास एक राजकीय स्वरूप देण्यात आले ते देखील स्वतः हून हे स्वरूप घेण्यामागे दबावाचे राजकारण ही भूमिका असे सांगण्यात आले इथे गल्लत झाली. एकीकडे राजकारण म्हणजे दलदल सांगायचे व त्यामध्ये मनसोक्त दगड फेक करायची यामुळे मुलभूत दिशा व आंदोलनाची दशा बदलत गेली. थोडक्यात समाजकारणाची मर्यादा ओलांडून राजकारण झाले कारण कुठे थांबावे याचे भान नव्हते. मुळात या आंदोलना मागे भा...

आभासीक ऐक्य

जगातील कोणत्याही देशातील, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही कारणास्तव एकत्र येणाऱ्या लोकांच्यात जे काही ऐक्य आढळते, त्यामध्ये आभास किती व वास्तव किती? प्रथम दर्शनी ऐक्य म्हणजे वास्तव भासते, पण तो आभास असल्याचे कालांतराने प्रत्ययास येते. अर्थात असा प्रत्यय प्रत्येकाला मिळेल असा नियम नाही.       कोणत्याही ठिकाणी माणूस सहज एकत्र येत नाही तर ठराविक उद्देशासाठी एकत्र येतात. भारतीय स्वातंत्र लढा सुरु असताना अनेक भारतीय एकत्र आले. यामध्ये अहिंसक मार्गाने वाटचाल करणारे तसेच हिंसक मार्गाने वाटचाल करणारे यांचा समावेश होता. या एकत्रीकरणात जात-पात, धर्म, प्रांत, भाषा यांना महत्व नव्हते किंबहुना स्थान नव्हते. मात्र ज्या प्रमाणात स्वातंत्र्य दृष्टीच्या टप्यात येण्यास प्रारंभ झाला त्या प्रमाणात एकीकरनास तडे जाण्यास प्रारंभ झाला. उद्दिष्ट प्राप्त होता होता धर्म आधार मानत फाळणी झाली. याच फाळणीची पुढील फाळणी प्रांत आधारित होत एकाचे तीन देश झाले. भारत व पाक मध्ये सध्या प्रांत व भाषा सोबत धर्म वाद यांचे प्रमाण वाढत असून वारंवार संघर्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.    ...

हुकूमशाहीच्या दिशेने

भारतीय सामाजिक जीवनात डोकावता भारतीय समाजाची वाटचाल एका हुकुमशाहीला जन्म देण्यास पूरक व पोषक वातावरण निर्माण करीत आहे किंवा करण्यात येत आहे. सध्या भारतीय सामाजिक जीवनात असंतोष, नैराश्य, तणाव व्यापक प्रमाणात आहे. अर्थात हा कालच्या काळात देखील होता मात्र त्याला समूहाच्या गानिमिकाव्याची जोड नव्हती तसेच त्या काळात भारतीय पणा होता मात्र सध्या एका भाषेचे, जातीचे, धर्माचे, व्यवसायाचे, प्रांताचे, जनतेचे, सरकारचे, विरोधीपक्षाचे अधिक मक्तेदार आहेत मात्र भारतीय कमी आहेत.       काही महाभाग यासाठी सरकारला जबाबदार ठरवतात. भारतीय समाजात तो दिवस दूर नाही की एखाद्या घरात मुल जन्माला आले त्याला सरकार जबाबदार तसेच वंध्यत्व असेल तरीही सरकार जबाबदार याप्रकारचे आरोप करण्यात येतील. थोडक्यात कोणत्या प्रकारचा व्यक्ती कोणता आरोप करणार याचा भरवसा नाही. कोणतीही वृत्तवाहिनी पहा याचा प्रत्यय मिळेल. पत्रकार असो की त्यांच्या सांगण्यानुसार असणारा तज्ञ असो की प्रवक्ता असो स्वतःला सत्य मानतात हे त्यांच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे. तसेच यांना स्वतःच्या दृष्टी नुसार सृष्टी यासंदर्भात भान नाही. अर्था...

भ्रष्ट जनता, भ्रष्ट सरकार

सध्या जेष्ठ सरकार सुधारक श्री. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात आरोप व प्रत्यारोप करताना भ्रष्टाचाराचा मुलभूत विषय व आशय बाजूला जात मीच योग्य व नैतिक, सत्य असे स्वरूप प्राप्त होताना काही महत्वाचे घातक दुर्लक्षित झाले किंवा करण्यात आले.       सर्वात प्रथम जनता व सरकार यांना भिन्न समजण्यात आले यामुळे सरळ सरकार व राजकारणी म्हणजे भ्रष्टाचारी तसेच राजकारण म्हणजे दलदल, चिखल याप्रकारची वक्तव्य करण्यात आली. आपण लोकशाही देशात वावरतो किंवा लोकशाही म्हणजे काय याचे विस्मरण अथवा अज्ञान असावे यामुळे याप्रकारची वक्तव्य करण्यात आली असावीत.       टीम अण्णा यांची लोकशाहीची व्याख्या मला ज्ञात नाही पण नागरिकशास्त्र मध्ये जी लोकशाहीची व्याख्या आहे त्यानुसार लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. माझ्या माहिती नुसार यासाठी आपल्या देशात रीतसर निवडणुका होतात व जनता आपले प्रतिनिधी निवडतात व ते सरकार स्थापन करतात. अर्थात याला राज्यघटनेची संविधानात्मक कायद्याची चौकट आहे. थोडक्यात नियमावली आहे मात्र जनता हीच सरकार निवडते म्हणजे अप्रत्यक्ष स...

भ्रष्टाचार की शासकीय भ्रष्टाचार

भष्टाचार एक करंट इश्यू आहे. टीम अण्णा व तथाकथित समाजाचे मक्तेदार व ठेकेदार सध्या लोकशाहीच्या नावाखाली उघड हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करीत आहेत मात्र हा ना स्वैराचार ना भ्रष्टाचार समाजाला जातो हा भाग अलाहिदा. सध्या लोकपाल सारखी संस्था निर्माण करून भ्रष्टाचार रोखण्याच्या गप्पा ते दिवास्वप्ना पाहण्याचा व दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे मात्र याने भ्रष्टाचार नाहीसा होणार की फक्त शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार कमी होणार? हा संशोधनाचा तसेच चिंतनाचा विषय व आशय आहे.       एकंदरीत या समस्त आंदोलनात ‘भ्रष्टाचार’ हा प्रमुख मुद्दा आहे की ‘शासकीय’ पातळीला होणारा भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा आहे? जर भ्रष्टाचार हा मुद्दा असेल तर समाजाला एकाही शब्दाने भ्रष्टाचार न करण्याचे आवाहन का नाही? एकतर सामाजिक पाठींबा मिळणार नाही हे भय किंवा समाज निष्पाप व निरागस असण्या संदर्भातील गैर समाजायुक्त अज्ञान आहे. या दोन्ही अवस्था समाजिक भ्रष्टाचाराला पोषक आहेत यामुळे शासकीय भ्रष्टाचाराला पोषक आहेत.       मी टीम अण्णा व तथाकथित समाजाच्या मक्तेदार इतका अगाध ज्ञानी नाही पण ...

समस्या अनेक उपाय एक

जेष्ठ सरकार सुधारक श्री. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असो की भ्रष्टाचार असो अथवा हिंसाचार, दहशतवाद, बलात्कार, चोरी, दरोडा, नक्षलवाद, घटस्फोट, कौटंबिक हिंसाचार या सारख्या अनेक सामाजिक समस्या वर्तमान समाजाला भेडसावत आहेत.       मानवाला समस्या भेडसावता तो त्याच्या दृष्टी व आकलन क्षमता अनुसार समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याच्या दृष्टी व आकलन क्षमतेच्या मर्यादा दुर्लक्षित करून समाधान शोधता तो नवीन समस्या निर्माण करतो. वास्तवात समस्या मध्ये समाधान आहे. समस्या हे प्रत्यक्ष स्वरूप असेल तर समाधान अप्रत्यक्ष स्वरुपात आहे. सामान्यतः समस्या व समाधान यांना भिन्न समजण्यात येते मात्र वास्तवात समस्या व समाधान एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू आहेत. समस्या व समाधान हे ठरवणारा दृष्टीकोन व आकलन इथे निर्णायक आहेत.       मानवी दृष्टीकोन व आकलन मर्यादा मुळे मानव वर्गीकरण करतो मात्र वर्गीकरण म्हणजे वास्तवात संकल्पना असल्याचे त्याला ज्ञात नाही यामुळे यासंदर्भात भान किंवा माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. या समस्त समस्या या समाधान आहेत. तस...

कायद्यापेक्षा प्रबोधनाची गरज

सध्या मिडिया व समाज यांच्या दृष्टीने भ्रष्टाचार म्हणजे एक “ करंट इशु ” आहे. भ्रष्टाचाराचा इलाज करण्यासंदर्भात व्यापक प्रमाणात चर्चासत्र ते वादासत्र घडत आहेत. या समस्त चर्चासत्रात भ्रष्टाचाराचा मुलभूत मुद्दा बाजूला राहतो व मी सांगतो, मी सुचवतो तोच उपचार योग्य व अंतिम असा प्रकार घडतो. तुझा उपाय कमकुवत, कुचकामी, त्यामध्ये पळवाटा ते आयोग्यता व त्रूटी आहेत असा युक्तिवाद ते तर्क करण्यात येतो. आरोप ते प्रत्यारोप करण्यात येतात व भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला राहतो व गुद्देगिरी सुरु होते. याठिकाणी गंम्मत म्हणजे या समस्त चर्चेचा मूलाधार काय? या समस्त चर्चेमध्ये निर्णायक कोण तसेच काय तर मी व माझे आकलन. जगातील कोणत्याही व्यक्तीचे आकलन परिपूर्ण आहे का? जगातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बाबतीत परिपूर्णत्व आहे का? काही महाभाग स्वतःला परिपूर्ण समजतात मात्र समज व वास्तव यामध्ये अंतर आहे. समाजात अनेक व्यक्ती स्वतःला परिपूर्ण व सत्य समजतात कारण अज्ञान. जो मानव स्वतःचे अज्ञान दुर्लक्षित करतो तोच मानव स्वतःला सत्य समजतो तसेच स्वतःच्या माहितीला ज्ञान समजतो यामुळेच स्वतःच्या अपूर्ण माहितीला सत्य मानत अट्...

स्वातंत्र की स्वैराचार?

जेष्ठ सरकार सुधारक श्री. अण्णा हजारे व प्रसार माध्यमे सोबत सामाजिक सांकेतीक स्थळांना पाहता, आपण संसदीय लोकशाही मध्ये आहोत कि स्वैराचारी लोकशाही मध्ये वावरतो असा प्रश्न पडतो. अभिव्यक्ती स्वातंत्र म्हणजे बेफाम व बेलगाम बोलणे व वागणे असा आहे का? स्वतःचे स्वतःवर नियंत्रण नसताना इतरांना नियंत्रीत करण्याची प्रवृत्ती समाजात बोकाळत आहे. याप्रकारची प्रवृत्ती बळवण्यात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भूमिका निर्णायक आहे. भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी या गोंडस नावाखाली देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयन्त केला जात आहे. समाजात संसदीय लोकशाही वर आक्रमण करण्यात येत असून मी सांगतो त्याच प्रमाणे करा अन्यथा मी उपोषण करणार ही धमकी राजरोस पणे देन्यात येत आहे. या आंदोलनात जोश आहे पण होश नाही यामुळे आपण जे आचरण करतो याचा होणारा परिणाम व दुष्परिणाम यांचा विचार केला जात नाही. या आंदोलनात जोश पेक्षा आवेश जास्त प्रमाणात आहे. आवेशी व्यक्ती स्वैराचार करणार यात शंका नाही. कोणत्याही व्यक्तीचा स्वैराचार समाज, कायदा व सुव्यवस्था यांना घातक आहे. श्री.अण्णा हजारे यांचा स्वैराचार समाज व देश यांना घातक आहे कारण नैतिकत...

मी सत्य :- एक गैरसमज

कोणत्याही दोन व्यक्तीमधील, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही विषयावर सुरु असणारा संवाद पाहताना, काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे व्यक्ती तत्परतेने प्रतिक्रिया देताना आवेगात व आवेशात असतो. दुसरे म्हणजे तो सहजतेने इतरांचे आकलन संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करतो, प्रसंगी इतरांना समजत किंवा कळत नाही असा आरोप ते दावा करतो. तिसरे म्हणजे माझा समज अथवा मी ज्यांना मानतो त्यांचा समज हेच अंतिम सत्य आहे. चौथे म्हणजे माझा तो समज व इतरांचा गैरसमज आहे यामुळे इतरांनी माझाच समज सत्य मानत वाटचाल करावी. याप्रकारामुळे कळत-नकळत संवादाचे विवादात रुपांतरण होते यामुळे निष्पत्ती कोणती हे सांगण्याची गरज नाही. अर्थात असा समस्त प्रकार जाणीव पूर्वक घडत नाही तर तो मानवी अज्ञानामुळे घडतो. वर्तमान मानवाला स्वतः संदर्भात ज्ञान नाही यामुळे स्वतःच्या आकलन सापेक्ष इतरांचे परीक्षण करण्याला तो सत्य मानतो. वास्तवात मानव अज्ञानामुळे व्यक्तिगत मर्यादा दुर्लक्षित करतो. मत मतांतर हा मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे यामागे मानवी आकलन आहे. मानवी आकलन मागे त्याचा दृष्टीकोन आहे. मानवाच्या दृष्टीकोन मागे त्याचा संस्कार आहे. संस्क...