पुढच्यास ठेच मागचा शहाणा
टीम अण्णा यांच्या मुंबई मधील आंदोलनाच्या अवस्थे पासून समाजाने जर अर्थबोध घेतला तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा होणार आहे. टीम अण्णा यांचे आंदोलन यशस्वी की अपयशी हा निष्कर्ष व्यक्तीच्या दृष्टी, आकलन सापेक्ष निकषावरून ठरणार आहे. प्रत्येक निष्कर्ष एक शक्यता पेक्षा मुल्यवान नाही तसेच सत्य नाही. आत्मपरीक्षणात्मक व विवेकी दृष्टीने पाहता या आंदोलनात अतिरेक व अट्टाहास असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्याने अल्प अथवा अपेक्षा पेक्षा कमी प्रतिसाद मिळाला या वास्तवाला नाकारता येणार नाही. आंदोलन असो की सामाजिक जीवन अथवा व्यक्तिगत जीवन या सगळ्यात कुठेतरी थांबावे लागते किंवा एक मर्यादा निश्चित करून राहावे लागते मात्र इथे नेमके तेच घडले नाही. सामाजिक आंदोलनास एक राजकीय स्वरूप देण्यात आले ते देखील स्वतः हून हे स्वरूप घेण्यामागे दबावाचे राजकारण ही भूमिका असे सांगण्यात आले इथे गल्लत झाली. एकीकडे राजकारण म्हणजे दलदल सांगायचे व त्यामध्ये मनसोक्त दगड फेक करायची यामुळे मुलभूत दिशा व आंदोलनाची दशा बदलत गेली. थोडक्यात समाजकारणाची मर्यादा ओलांडून राजकारण झाले कारण कुठे थांबावे याचे भान नव्हते. मुळात या आंदोलना मागे भा...