समस्या अनेक उपाय एक


जेष्ठ सरकार सुधारक श्री. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असो की भ्रष्टाचार असो अथवा हिंसाचार, दहशतवाद, बलात्कार, चोरी, दरोडा, नक्षलवाद, घटस्फोट, कौटंबिक हिंसाचार या सारख्या अनेक सामाजिक समस्या वर्तमान समाजाला भेडसावत आहेत.
      मानवाला समस्या भेडसावता तो त्याच्या दृष्टी व आकलन क्षमता अनुसार समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याच्या दृष्टी व आकलन क्षमतेच्या मर्यादा दुर्लक्षित करून समाधान शोधता तो नवीन समस्या निर्माण करतो. वास्तवात समस्या मध्ये समाधान आहे. समस्या हे प्रत्यक्ष स्वरूप असेल तर समाधान अप्रत्यक्ष स्वरुपात आहे. सामान्यतः समस्या व समाधान यांना भिन्न समजण्यात येते मात्र वास्तवात समस्या व समाधान एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू आहेत. समस्या व समाधान हे ठरवणारा दृष्टीकोन व आकलन इथे निर्णायक आहेत.
      मानवी दृष्टीकोन व आकलन मर्यादा मुळे मानव वर्गीकरण करतो मात्र वर्गीकरण म्हणजे वास्तवात संकल्पना असल्याचे त्याला ज्ञात नाही यामुळे यासंदर्भात भान किंवा माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. या समस्त समस्या या समाधान आहेत. तसेच हे समस्त समाधान समस्या आहेत फक्त एकाचे समाधान दुसऱ्याची समस्या आहे. एकाची सोय ही दुसऱ्याची गैरसोय आहे.
      कोणत्याही घटकाचा अभ्यास करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. एक भिन्नता आधारित तर दुसरी एकता आधारित. प्रत्येक घातक भिन्न मानत प्रत्येकाचा वेगळा अभ्यास करणे. तेच एकता आधारित अभ्यास करताना सगळे घटक एक समान. समस्त समस्या एक मानत अभ्यास करता, या समस्त घटकातील एकता निदर्शनास येते.
      मानवाच्या समस्त सामाजिक समस्या म्हणजे मानवी स्वभावाची निष्पत्ती आहेत. मानवी स्वभाव आचरण मध्ये निर्णायक आहे. एका मानवाचे आचरण दुसऱ्या मानवाला त्रासदायक ठरते. वास्तवात एका मानवाचा स्वभाव दुसऱ्या मानवाच्या स्वभावाला त्रासदायक ठरतो. एक मानव स्वतः च्या हिशोबाने आचरण करताना इतरांना देखील स्वतःच्या हिशोबाने आचरण करण्यास भाग पाडतो. इथे समस्त समस्या व समाधान यांचे मुळ आहे. एक मानव दुसऱ्या मानवाचा अनादर करतो यामुळे इतरांचे मुल्यांकन करतो ते देखील स्वतःच्या अपूर्ण आकलन क्षमतानुसार निर्णय घेतो, याला अध्यात्मिक शब्दात अहंकार म्हणतात, सामान्य शब्दात स्वार्थ म्हणतात.
      थोडक्यात व्यक्तिगत दृष्टी व आकलन मर्यादा दुर्लक्षित करण्याचा प्रकार घडतो कारण अज्ञान व संस्कार. व्यक्तिगत मर्यादा न पाहता आचरण करता समस्या निर्माण होतात कारण दृष्टी हीच श्रुष्टी मनात दृष्टी व आकलन या नुसार श्रुष्टी परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.  इथे गल्लत घडते. प्रत्येकाला स्वतःची दुष्टी आहे तसेच प्रत्येक व्यक्ती श्रुष्टी मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो यामुळे संघर्ष घडतो. श्रुष्टी बदलण्यापेक्षा दृष्टी बदलता समस्त श्रुष्टी बदलते ते देखील कोणताही संघर्ष न कारता. मात्र यासाठी स्वतःच्या दृष्टीप्रती जागरुकता हवी तसेच दोष श्रुष्टीत नसून दृष्टीत असल्याचे ज्ञान हवे पण आम्ही माहितीला ज्ञान समजण्याची गल्लत करतो यामुळे सगळा गोंधळ होतो. स्वतःच्या मर्यादा संदर्भात जागरूक राहणे म्हणजे विवेक आहे. जगातील कोणताही विवेकी माणूस समस्या निर्माण करीत नाही कारण तो जग काय करते यापेक्षा आपण काय करतो तसेच जगाकडे कसे पाहतो याला प्राधान्य देतात यामुळे इतरांचा आदर करतात. आपण ज्यांचा आदर करतो त्यांना कधी त्रास देतो का? इतरांचा आदर करून पहा प्रत्यय मिळेल.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते