स्वातंत्र की स्वैराचार?


जेष्ठ सरकार सुधारक श्री. अण्णा हजारे व प्रसार माध्यमे सोबत सामाजिक सांकेतीक स्थळांना पाहता, आपण संसदीय लोकशाही मध्ये आहोत कि स्वैराचारी लोकशाही मध्ये वावरतो असा प्रश्न पडतो. अभिव्यक्ती स्वातंत्र म्हणजे बेफाम व बेलगाम बोलणे व वागणे असा आहे का? स्वतःचे स्वतःवर नियंत्रण नसताना इतरांना नियंत्रीत करण्याची प्रवृत्ती समाजात बोकाळत आहे. याप्रकारची प्रवृत्ती बळवण्यात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भूमिका निर्णायक आहे. भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी या गोंडस नावाखाली देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयन्त केला जात आहे. समाजात संसदीय लोकशाही वर आक्रमण करण्यात येत असून मी सांगतो त्याच प्रमाणे करा अन्यथा मी उपोषण करणार ही धमकी राजरोस पणे देन्यात येत आहे. या आंदोलनात जोश आहे पण होश नाही यामुळे आपण जे आचरण करतो याचा होणारा परिणाम व दुष्परिणाम यांचा विचार केला जात नाही. या आंदोलनात जोश पेक्षा आवेश जास्त प्रमाणात आहे. आवेशी व्यक्ती स्वैराचार करणार यात शंका नाही. कोणत्याही व्यक्तीचा स्वैराचार समाज, कायदा व सुव्यवस्था यांना घातक आहे. श्री.अण्णा हजारे यांचा स्वैराचार समाज व देश यांना घातक आहे कारण नैतिकतेचा मुखवटा.
श्री.अण्णा हजारे नैतिकतेचा आधार घेत अनैतिक आचरण करीत आहेत मात्र ते सहजगत्या लक्षात येत नाही. श्री अण्णा हजारे व्यक्तिगत मत मांडताना त्यांना व्यक्तिस्वातंत्र मात्र नेते मत मांडतात त्यावेळी कायदा कमकुवत करण्याचा प्रयन्त ठरवतात म्हणजे अप्रत्यक्षात इतरांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र वर सहज घाला घालतात यामध्ये कोणती नैतिकता आहे? संसदीय लोकशाही मध्ये संसदेत न जाता, संसदीय प्रणालीचा एक भाग, एक हिस्सा न होत मी व आम्ही सांगतो तोच मसुदा व कायदा झालाच पाहिजे असा अट्टाहास करण्यात कोणती नैतिकता आहे? राजकारण( संसद) म्हणजे एक चिखल अशी विटंबना करण्यात कोणती नैतिकता आहे? इतरांवर चिखलफेक करणे कोणत्या नैतिकतेमध्ये मोडते? चिखलात दगडफेक करून इतरांचे कपडे खराब करणे कोणत्या नैतिकतेचे द्योतक आहे? चिखल साफ करताना हात भरणे स्वाभाविक आहे पण श्री.अण्णा स्वतःचे हात खराब न करता इतरांचे हात खराब करण्याचे प्रयत्न करतात यामध्ये कोणती नैतिकता आहे?या प्रश्नासंदर्भात कधी कोणी विचार केला का?
        श्री.अण्णा हजारे यांचे आंदोलन भ्रष्टाचार निर्मुलनसाठी कि नियंत्रणसाठी हा संशोधनाचा एक विषय आहे. त्याच प्रमाणे लोकपाल असो कि जनलोकपाल असो या सारख्या कायद्याने भ्रष्टाचार रोखला जाणार का हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. मानवी स्वभावाचे अज्ञान व संकुचित दृष्टीकोन असणारी व्यक्ती कायद्याने भ्रष्टाचार रोखला जाणार या संभ्रमात वावरणार यात शंका नाही. श्री.अण्णा हजारे एकतर मानवी स्वभाव संदर्भात अद्यानी आहेत किंवा संकुचित दृष्टीकोणाचे धनी असावेत कारण कायद्याचा अट्टाहास. वर्तमान भारतीय समाजातील अनेक गोष्टी रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत पण कोणताही प्रकार रोखला जाण्यापेक्षा त्याचे प्रमाण वाढत आहे. काही अगाध ज्ञानी कायदा कमकुवत आहे किंवा कडक नाही असा सूर आलाप करतात कारण अज्ञान.
कोणत्याही कायद्याचे पालन अथवा उल्लंघन यामागे मानवी आचरण आहे. मानवी आचरण ही स्वाभाविक निष्पत्ती आहे. मानवी स्वभावावर संस्कारांचा प्रभाव आहे. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजात सरसकट कायद्याचे पालन करण्याचा संस्कार आहे कि सोय, फायदा यांचा विचार करून सोयीस्कररीत्या पालन तसेच उल्लंघन करण्याचा संस्कार आहे या संदर्भात विचार करताना इतरत्र पाहण्यापेक्षा स्वतःचे आचरण पहावे म्हणजे प्रत्यय मिळणार आहे. आम्ही जर स्वतःचा स्वैराचार रोखला तर कायद्याचे पालन होणार आहे. कायद्याचे पालन करताना भय नको तर आदर हवा. कायद्याचे पालन करण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही मात्र खरी अडचण इथे आहे. स्वतःचा स्वैराचार असो कि इतरांन आदर प्रदान करणे असो आम्हाला जमत नाही कारण संस्कार व अज्ञान.
        श्री.अण्णा हजारे स्वतःचे अज्ञान न पाहता सरळ संसदीय लोकशाही संदर्भात जनसामान्य व्यक्तींच्या मनात प्रक्षोभ निर्माण करीत आहेत अर्थात तो त्यांचा उद्देश नाही मात्र त्यांच्या आचरणाचा एक दुष्परिणाम आहे. या विदारक वास्तवाला नाकारता येणार नाही. निखळ चांगला उद्देश आहे म्हणून नैतिकतेच्या नावाखाली स्वैराचार करता येणार का? उद्देशाला आचरणाची जोड हवी मात्र या आंदोलनात स्वातंत्र या नावाखाली उघड उघड स्वैराचार सोबत इतरांची अवहेलना, विटंबना आहे. या इतर मध्ये संसद देखील आहे यामुळे कोणताही व्यक्ती श्रेष्ठ कि संसद श्रेष्ठ हा विचार करावा लागेल. जर व्यक्ती श्रेष्ठ ठरणार असेल तर आम्ही हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत.
कोणत्याही राष्ट्रात हुकुमशाही निर्माण होण्यापूर्वी अराजकता निर्माण झाल्याचे आढळते. आपण जनसामान्य जीवनात डोकावता अराजकतेची लक्षणे आढळतात. प्रस्थापित व्यवस्था संदर्भात असंतोष तसेच त्यांच्या प्रती हिंसक हल्ले होणे तसेच या हिंसक प्रवृत्तीचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समर्थन करणे नंतर त्यावरून घुमजाव करणे तसेच पुन्हा त्यावर टीका-टिप्पणी करणे या प्रकारची अराजकता माजवणारी लक्षणे दुर्लाक्षित करता येणार नाहीत. कोणताही प्रारंभ हा छोटा असतो तसेच याकाळात समाज त्याला दुर्लक्षित करतो मात्र काळाच्या ओघात लहान मोठा होतो तसेच तो नियंत्रण व निर्मुलन यांच्या कक्षेच्या बाहेर जातो व मिडिया यामधून स्वतःचा धंदा साधते मात्र समाजाला बैल गेला नी झोपा केला म्हणजे काय याचा प्रत्यय मिळतो. आज समाजात निर्माण करण्यात येणार असंतोष व अराजकता यांना वेळीच रोखले नाही तर आपल्या देशात कधी लोकशाही होती व गेले ते दिवस राहिल्या त्य आठवणी याचा प्रत्यय मिळेल तसेच भावी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही.
आजच्या भ्रष्टाचाराला कालची पिढी जबाबदार आहे. त्याकाळात भ्रष्टचार लहान होता मात्र आता तो मोठा झाला. बैल गेला त्यावेळी झोपा घेणारे आज सरकारने बैल शोधावा तो सुद्धा मी सांगतो त्याच मार्गाने व पद्धतीने अन्यथा सरकार भ्रष्ट व पळवाट शोधात आहे म्हणून कालवा करतात व सामान्य माणूस देखील आपण माणूस आहोत याला दुर्लक्षित करून एका मेंढरा मागे दुसरे असा प्रकार करीत आहे कारण अज्ञान. वर्तमान समाजात व्यापक अज्ञान आहे कारण साक्षरता आत्मपरीक्षण करण्यापासून वंचित ठेवते. साक्षर व्यक्ती स्वतःला परम ज्ञानी समजतो तसेच अर्ध्या हळकुंडाने पिवळा होत इतरांचे परीक्षण करतो व व्यक्तिगत निष्कर्षाला इतरांचे सत्य मानतो. प्रसंगी यासाठी आकांड-तांडव करतो याचे उदाहरण पहायचे असेल तर टीम अण्णा असो कि त्यांचे समर्थक यांचे आचरण पहा अथवा मिडिया पहा किंवा सामाजिक सांकेतिक स्थळाला भेट द्या. उपरोक्त विधानाचा प्रत्यय मिळेल.
        भ्रष्टाचार रोखण्यासाठी आंदोलन उभे करणारे भ्रष्टाचाराची संकल्पना कुठेही स्पष्ट करीत नाहीत अन्यथा त्यांचा भ्रष्टचार उघडा पडेल. मुळात भ्रष्टाचाराचा इलाज करण्यासाठी सरकार व संसदेला वेठीस धरणारे समाजाला भ्रष्टाचार करू नका यासाठी साधे अवाहन करण्यास तयार नाहीत ते का? सामान्य माणूस भ्रष्ट नाही का? कि सामान्य माणसाच्या भ्रष्टाचाराशी यांना काही देणे-घेणे नाही? की जनसामान्य व्यक्तींचा पाठींबा मिळणार नाही याचे भय आहे? की भ्रष्टाचार संदर्भात संकुचित दृष्टीकोन अथवा अज्ञान आहे? या समस्त प्रश्नांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अर्थात श्री.अण्णा हजारे यांच्या प्रमाणे वादी व प्रतीवादी वकील मीच तसेच न्यायाधीश देखील मीच करता काम नये. सर्वात प्रथम स्वतःचे स्वतः परीक्षण करून पहावे त्याविना दृष्टी, आकलन यांच्या मर्यादा समजणार नाहीत तसेच त्याविना ज्ञान नाही. ज्ञान नाही तर स्वतःच्या स्वैराचार नियंत्रण मिळणार नाही. कोणताही स्वैराचारी हा संकुचित दृष्टी व अज्ञान यांचा धनी आहे मात्र तो स्वतःचे संकुचित विश्व व अज्ञान मान्य करीत नाही. याउलट इतरांना अज्ञानी ठरवणे, इतरांची लायकी काढणे थोडक्यात परपरीक्षण करतात. परपरीक्षण हे स्वैराचाराचे लक्षण आहे. तेच आपण काय करतो हे तपासणे आत्मपरीक्षण आहे. आत्मपरीक्षण विना ज्ञान नाही. ज्ञान विना संयम नाही. आपण आपले आचरण तपासून पहावे म्हणजे प्रत्यय मिळेल.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते