घातक परिवर्तन(भाग-१०)
भारतीय सामाजिक जीवनात जी काही परिवर्तन घडत आहेत त्यापैकी एक घातक परिवर्तन म्हणजे अनियंत्रित गती, वेगवान जीवन, धावपळ ग्रस्त जीवन. दुसऱ्या शब्दात जीवनातील वाढती अस्थिरता. वेग-गती त्याठिकाणी स्थिरता निर्माण होणार का? वर्तमान माणूस खूप काही मिळवण्यासाठी धावतो पण या धावण्यात जे काही गमावतो त्यामध्ये स्थिरता हा एक महत्वाचा घटक आहे. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे माणूस जी काही धावपळ करतो ती स्थिरता मिळवण्यासाठी करतो पण ही स्थिरता मिळते का? मुळात स्थिरता म्हणजे काय? स्थिरता ही व्यक्तीच्या स्वभाव परत्वे बदलणारी एक संकल्पना आहे. पत्येकाची स्थिरता संदर्भातील व्याख्या भिन्न आहे. काही व्यक्ती भविष्यात स्थिरता मिळावी यासाठी वर्तमान काळात धावपळ करण्याचा प्रयन्त तसेच प्रकार करतात मात्र त्यांना स्थिरता प्राप्त होते का? वर्तमान हा भविष्याचा पाया आहे. वर्तमान काळात असणारी स्थिरता संदर्भातील संकल्पना काळाच्या ओघात बदलत जाते दुसऱ्या शब्दात संकल्पना संदर्भात अज्ञान असल्याने मानव धावतो पण प्राप्त होत नाही. गंमत म्हणजे संकल्पना असते ती व्यक्तिगत अंतरंगात पण तिचा मागोवा असो की पूर्तता करण्याचा प्रयन्त बाह्य...