घातक परिवर्तन(भाग ३)


मानवी स्वभावाचे केंद्र विवेकावरून अहंकाराकडे करण्याचा प्रवास भारतीय स्वातंत्र्य पूर्व काळा पासून सुरु झाला. स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच आपला तो माझा-तुझा करण्यास सुरवात झाली. या तुझ्या-माझ्याची परिणीती भारत-पाक फाळणी मध्ये झाली. काही महाभाग यासाठी काही नेत्यांना जबाबदार धरतात कारण अज्ञान तसेच अहंकार. सामाजिक वातावरण पाहता तत्कालीन नेत्यांना जे योग्य वाटले त्याप्रमाणे त्यांनी आचरण केले. मात्र या सगळ्यामागे माझे-तुझे असा भेदभाव करणारा अहंकार होता याकडे किती अभ्यासकांनी तसेच विश्लेषकांनी लक्ष दिले? इथे परिवर्तन तसेच अहंकार दुर्लक्षित झाला.
भारत-पाक फाळणी हि देशाची फाळणी होती नंतर भाषिक राज्य असो कि कौटुंबिक पातळीला एकत्र ते विभक्त कुटुंब पद्धतीचा उगम ते संस्कार पासून संस्कृतीचा उदय झाला. वर्तमान समाजात भाषिक अस्मिता असो कि स्वाभिमान या गोंडस नावाखाली अहंकार झाकला जातो. भुतकाळापेक्षा वर्तमान काळात प्रांतीय असो कि भाषिक संघर्ष अधिक प्रखर तसेच हिंसक होताना आढळतो यामागे अहंकार केंद्र असणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढणे म्हणा अथवा विवेकाचा अभाव असणाऱ्यांची संख्या वाढणे म्हणा अधिक आहे.
समाजातील अहंकार वाढण्याला घरात होणारे संस्कार केंद्रीय भूमिकेत आहेत. वर्तमान पिढीवर विभक्त होण्याचा संस्कार आहे तसेच यांच्यावर संस्कार करणारी पिढीने एकत्र ते विभक्त होताना जो प्रकार केला त्याची पुनरावृत्ती यांची अपत्य करीत आहेत.
एकत्र ते विभक्त होताना नेमका कोणता प्रकार घडतो? मी निर्दोष, निष्पाप, निरागस, बाकीचे नालायक, पापी असून ते माझ्यावर अन्याय करीत आहेत. मी माझा फायदा पाहताना इतरांचा तोटा होतो कि नाही याच्याशी मला काही देणे-घेणे नाही. थोडक्यात स्वतःला प्राधान्य देणे प्रसंगी त्यासाठी इतरांचा तोटा करणे, स्वतःला एक निकष तेच इतरांना दुसरा निकष म्हणजे निकषात भेदभाव करणे.
एकत्र ते विभक्त होताना जो काही प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती म्हणा अथवा प्रत्यय म्हणा सामाजिक जीवनात पाहण्यास मिळतो. कोणत्याही ठिकाणी वादंग असो कि कलह माणूस स्वतःला सत्य ते निष्पाप व निरागस तसेच योग्य समजतो मात्र इतरांना पापी ते गुन्हेगार पासून अयोग्य ते असत्य मानतो. थोडक्यात धड स्वतःचा स्वभाव ते स्वभाव समजत नसताना इतरांच्या स्वभावाचा निर्णायक होण्याचा प्रयन्त ते प्रकार करतो. मानवाच्या याचा स्वाभाविक गुणधर्मामुळे वाद-विवाद ते कलह वादंग घडतात.
मानव स्वतःची स्वाभाविकता तसेच त्यामधील त्रुटी पाहण्याच्या फंदात पडत नाही यामुळे त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव नसते परिणाम स्वरूप मर्यादा उल्लंघन होत अतिरेक घडतो मात्र माणूस स्वतःचा अतिरेक न पाहता इतरांना अतिरेकी ठरवतो. वास्तवात अहंकारी मानव प्रत्येक ठिकाणी अतिरेक करतो मात्र त्याला स्वतःचा अतिरेक ना समजतो ना तो मान्य करतो. वर्तमान समाजात प्रत्येक गोष्टीचा अतिरेक होताना आढळतो.
माणूस स्वतःचा अतिरेक ना पाहतो ना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो याउलट त्यांचे वेगळे व माझे वेगळे करतो. अहंकार स्वभाव केंद्र असणारा माणूस स्वतःचा वेगळे पणा दर्शवण्याचा तसेच जोपासण्याचा प्रयन्त करतो यासाठी प्रसंगी विभक्त होण्याचा प्रयन्त करतो. एकत्र ते विभक्त कुटुंब असा प्रवास आता एकटा होण्याच्या दिशेने सुरु असल्याने वर्तमान समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे.
पती-पत्नी घटस्फोट घेतात तेच माणूस स्वतःच्या जात-पात-भाषा-धर्मावरून इतरांशी फारकत घेत स्वतःची वेगळी चूल मांडण्याचा प्रयन्त करताना आढळतात. समस्त समस्या मागील एकता म्हणा कि स्वभाव केंद्रातील अहंकारच्या दिशेने होणारे परिवर्तन म्हणा दुर्लक्षित होत आहे.  

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते