घातक परिवर्तन(भाग-५)
स्वातंत्र्योत्तर काळात जी काही परिवर्तन घडली
त्यामधील एक घातक परिवर्तन म्हणजे इतर सुधारक ते देखील स्वतःला सुधारणेसाठी अपवाद
मानणारे सुधारक.
वर्तमान समाजात घराघरात कमीत कमी एक तरी सरकार
सुधारक आहे. सरकारने काय व कसे करावे हे सांगण्याचा-समजावण्याचा प्रयन्त करणारा
व्यक्ती घराघरात आढळणार आहे. या व्यक्ती संविधानाने दिलेल्या मार्गाचा अवलंब करतात
का? रीतसर सक्रीय राजकारणात प्रवेश घेत निवडणुका लढवत राजकारण करतात कि त्यापेक्षा
घरात बसून अकलेचे तारे तोडण्यात धन्यता मानतात?
वर्तमान समाजात उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार
ते प्रयन्त करणारे लक्षणीय प्रमाणात वाढत आहेत. स्वतः मध्ये करण्याची धमक-पात्रता
नाही पण जे कोणी जे काही करतात त्यावर सहज-सरळ आक्षेप घेणे ते आरोप करण्याचा
प्रकार जागोजागी घडताना आढळतो.
राजकीय तज्ञ- विश्लेषक असो खेळ तज्ञ-विश्लेषक
अथवा चित्रपट समीक्षिक यांचे सध्या पेव फुटले आहे. पदवी घ्या- पत्रकारिता करा आणि
तज्ञ व्हा असा प्रकार सर्रास घडत आहे. इथे त तत्वाचा कि तर्काचा? याचा विचार
करायचा नाही. राजकीय तज्ञ हा कधीही सक्रीय राजकारणात नसतो फक्त राजकारणाचा अभ्यास
ते मागोवा घेतो यावर विशेष टिप्पणी देखील करतो. राजकीय नेत्यांनी काय करावे तसेच
करू नये त्याचे योग्य काय किंवा अयोग्य काय याचा निर्णय यांनीच घायचा.
खेळ पत्रकार असो कि तज्ञ-विश्लेषक यापैकी किती
वास्तविक खेळाडू आहेत तसेच त्यांची व्यक्तिगत कारकीर्द काय होती? त्यांनी कधी सदोष
खेळ केला नाही का? यासंदर्भात विचार करून त्यांचे विश्लेषण ते टिप्पणी असते का?
चित्रपट समीक्षिक संदर्भात तोच प्रकार. आज जवळपास प्रत्येक वृत्त वाहिनी चित्रपट
समीक्षण ते मानांकन करण्याचा प्रयन्त करते पण याच्या समीक्षकाने किती चित्रपट
निर्माण केले किंवा त्याप्रक्रिया मध्ये सहभाग होता?
पूर्वी जावे त्यांच्या जन्मा तव कळे यातना किती
कठीण असे म्हणत पण वर्तमानात हे म्हणता-सांगता येणार का? सध्या परीक्षा द्या आणि
तज्ञ व्हा. वर्तमान तज्ञांची अवस्था म्हणजे पोहण्याचे तज्ञ ते देखील काठावर पुस्तक
घेऊन पोहणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे पण स्वतः पाण्यात उतरणार नाहीत.
कधी काळी प्रथम स्वतः केले मग जगा सांगितले असा
प्रकार होता पण वर्तमानात मी काय करतो किंवा करावे हे दुय्यम तसेच शिष्टाचाराचा एक
भाग आहे पण इतर काय करतात किंवा करावे हे मी ठरवणार तसेच त्या बर हुकुम वागले तर
लायक तसेच शिष्टाचार पण नाही वागले तर नालायक तसेच भ्रष्टचार.
कधी काळी माणूस योग्य काय याचा मागोवा घेत सत्य
शोधण्याचा प्रयन्त करीत होता पण सध्या मीच कसा योग्य हे सिद्ध करण्याचा तसेच
स्वतःला सत्य घोषित करणारा अट्टाहास कसा करायचा याचा मागोवा घेतो. कधी काळी माणूस
स्वतःचे अपूर्णत्व ते मर्यादा यांचा मागोवा घेत परिपूर्ण होण्याचा प्रयन्त करीत
होता पण वर्तमान मानव स्वतःला परिपूर्ण मानत इतरांचे अपूर्णत्व तसेच मर्यादा याचा
मागोवा घेताना आढळतो.
वर्तमान समाजात जो स्वतः बेरोजगार तो सरकारने
कोणत्या पद्धतीने बेरोजगारी दूर करावी याचे सरकारला मार्गदर्शन करतो, जो धड
स्वतःचे घर सांभाळण्यास असक्षम तो देश सांभाळण्याच्या वल्गना करतो थोडक्यात ज्याला
स्वतः काय आहोत तसेच काय करतो याची परिपूर्ण जाणीव नसते तो इतरांनी काय करावे
किंवा केलेच पाहिजे किंवा करतात असा दावा अट्टाहास करतो. यावर्गावारीत मोडणाऱ्या
व्यक्ती असोत कि त्यांचा समाज अथवा देश यांचे भवितव्य काय?
थोडे आत्मपरीक्षण करून प्रत्यय घ्या आपण स्वतः
काय करतो त्याविना काय केले पाहिजे याची जाणीव तसेच भान होणार नाही त्याविना
सुधारणा होणार नाही.
वर्तमान भारतीय समाजाला खरी गरज आहे ती समाज सुधारणेची
पण याचा प्रारंभ स्वतः पासून करण्याची गरज आहे. परवा एक कार्यक्रमात डॉ.अब्दुल
कलाम यांनी थोडक्यात पण खूप महत्वाचे सांगितले पण दुर्दैवाने त्याची फारशी चर्चा
अथवा दखल समाज तसेच मिडीयाने घेतली नाही कारण त्यामध्ये सुधारणा हि स्वतः मध्ये
अपेक्षित होती. समाज तसेच मिडिया यांना स्वतः पेक्षा इतरांच्यात सुधारणा अपेक्षित
आहेत त्याचा एक परिणाम कि परिवर्तनाचा एक प्रभाव?
Comments
Post a Comment