घातक परिवर्तन(भाग-४)
मानवी स्वभावाचे केंद्र विवेक ते अहंकार परिवर्तन
करण्यामुळे परस्पर सामंजस्य अभाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. इतरांनी मला समजावून
घ्यावे हि प्रत्येकाची इच्छा आहे पण आपण स्वतः इतरांना समजावून घेतो का? कि
समजावून घेतले असा समज बाळगतो याचा विचार ते पुनर्विचार करून पाहावा.
पती-पत्नी यांच्या मधील सामंजस्य अभावी घटस्फोट
घडतो. पती-पत्नी विभक्त होतात त्याच प्रमाणे सध्या समाजात जात-प्रांत-धर्म-भाषा
यानावाने सावता सुभा मांडण्याचा प्रयन्त तसेच प्रकार घडत आहे तसेच ज्याप्रमाणे
भारतीय फाळणी असो कि कौटुंबिक फाळणी असो त्यादरम्यान जो हिंसाचार, जो रक्तपात घडला
त्याची पुनरावृत्ती होते कारण प्रवृत्ती.
प्रथम दर्शनी दहशतवादी, नक्षलवादी, प्रांत ते
भाषा-धर्म-जातीयवादी, भ्रष्टाचारी या समस्त समस्या असो कि प्रवृत्ती भिन्न भासते
मात्र या सगळ्यांचे स्वभाव केंद्र म्हणजे अहंकाराचे केंद्र आहे. अहंकाराचे केंद्र
त्याठिकाणी स्वमतांधता, घृणा, द्वेष, तिरस्कार ते शत्रुत्व भावना येणार यामध्ये
शंका नाही. तसेच कळत-नकळत इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी हुकुमशाही ते
हुकुम चालवण्याचा प्रकार होणार आहे. यासाठी प्रसंगी आक्रमक होणे ते हिंसाचार करणे
असा प्रकार घडतो.
सध्या भारतात काय घडते? भारतीय समाजात परस्पर
संमंध कोणत्या प्रकारचे आहेत? परस्पराप्रती प्रेम कि घृणा. आज एक माणूस दुसऱ्या
माणसाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? माणूस पाहतो स्वतःच्या दृष्टीने तसेच त्याचे
आकलन करतो स्वतः च्या आकलन क्षमतेने मात्र स्वतःचा निष्कर्ष म्हणजे इतरांचे वास्तव
ते सत्य असण्याचा दावा करतो. एकांगी पाहतो त्यामधून अंशतः आकलन करतो वर तेच सत्य
असा दावा ते अट्टाहास कारण समज असो कि आकलन ते निष्कर्ष यासोबत अहंकार जोडला जातो.
मानवाचा अहंकार असो कि “मी” असो याला प्राधान्य देताना कुटुंब असो कि समाज
ते देश यांचा क्रमांक ते क्रम कोणता? प्रथम “मी” नंतर माझा या माझा मध्ये देखील प्रथम घर नंतर
जात-पात-धर्म-भाषा ते प्रांत नंतर त्याचे घटक त्यामधून जमले तर देश. याठिकाणी
अहंकारी माणूस काही वास्तव दुर्लक्षित करतो ते म्हणजे जर देश व समाज असेल तर “मी” ला एक अस्तित्व आहे अन्यथा अस्तित्व नाही.
मानवी “मी”चे अस्तित्व कधी पर्यंत तर मृत्यू पर्यंत.
मानवातील मी असो कि माझे यावर मृत्यू एका क्षणात बोळा फिरवतो. मृत्यू हेच जीवनाचे
वास्तव आहे. जन्माला येणारा प्रत्येक घटक मग तो जात-पात-धर्म-प्रांत असो कि
देश-समाज या समस्त घटकांना मृत्यू ते स्वरूप परिवर्तन आहे. कदाचित या समस्त
घटकांचा ते सृष्टीचा ऱ्हास करण्यासाठी मानवाचा जन्म असावा.
वर्तमान मानवाची वाटचाल हि सृजनशीलता दर्शवते कि
त्याची विध्वंसकता दर्शवते याचा समग्र विचार करून पहा म्हणजे प्रत्यय मिळणार आहे.
अर्थात मानव जर विनाश करणार असेल तर मानवाच विनाश टाळू शकतो मात्र त्यासाठी त्याला
स्वतःचे स्वभाव केंद्र अहंकाराकडून विवेककडे जाणीव पूर्वक न्यावे लागेल अन्यथा .........
Comments
Post a Comment