दुसरी क्रांती?


टीम अण्णा आंदोलनास काही उत्साही मानवांनी त्याची तुलना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती सोबत केली तसेच तत्सम उपमा देण्याच्या प्रयन्त ते प्रकार घडला. कोणत्या व्यक्तीने कोणाची तुलना कोणा सोबत करावी यासाठी काही नियम-नियमावली नाही कारण लोकशाही असून प्रत्येकाला अभिव्यक्ती तसेच कृती स्वातंत्र्य आहे.
माझ्या दृष्टीने संपूर्ण क्रांती सोबत तुलना म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भटाची तट्टीन किंवा कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली या मराठी म्हणी नुसार प्रकार घडणार आहे. संपूर्ण क्रांती मध्ये समाज सुधारणा करून क्रांती होती इथे सरकार सुधारणा करून क्रांती?
संपूर्ण क्रांती मध्ये प्रथम स्वतः मध्ये सुधारणा करून समाज ते सरकार-अधिकारी सुधारणा अपेक्षित होती. टीम समाजाला निष्पाप, निरागस मानत असावी यामुळे समाजाला चकार शब्दाने आवाहन न करता फक्त सरकार सुधारणा ती देखील कायदा करून अपेक्षित आहे.
संपूर्ण क्रांती मध्ये प्रबोधनातून समाज तसेच देश सुधारणा करण्याचा प्रयत्न होता तेच टीमला कायदा करून फक्त सरकार सुधारणा अपेक्षित आहे. संपूर्ण क्रांती या नावात सगळे आहे तेच टीमच्या मुळात नावात गोंधळ ते गौडबंगाल आहे. भ्रष्टाचार विरोधी पेक्षा सरकारी भ्रष्टाचार विरोधी ते देखील आम्ही सांगतो तसाच कायदा झाला तर भ्रष्टाचार निर्मुलन अन्यथा नाही.
संपूर्ण क्रांती मध्ये स्वतः पासून प्रारंभ होता तेच इथे स्वतःचा अपवाद आहे. याउलट इथे मी करतो तो शिष्टाचार ते समाजसेवा त्यासाठी मला मिळतो तो मेवा मात्र तीच कृती नेता करतो त्यावेळी भ्रष्टाचार तसेच नेतो घेतो ती लाच असा दुजाभाव ते भेदभाव आहे.
संपूर्ण क्रांती समस्त भेदभाव नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत होती यामुळे समाजात समता तसेच एकता निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. इथे लोकशाहीतील लोकनियुक्त ते देखील संविधानात्मक मार्गाने रीतसर निवडणुका लढवत सरकार स्थापन झाले असताना सरकार व जनता भिन्न आहे असा दावा, वल्गना सोबत स्वैराचारी जनता गुलाम असण्याची भाषा आहे.
संपूर्ण क्रांती मध्ये विवेक असल्याने समस्त भिन्नता मागील एकता पाहत समस्त समस्यांचे मूळ-कारक असणारा अहंकार निष्क्रीय करणारा विवेक तसेच ज्ञान मार्गावरून वाटचाल करण्यास प्रेरणा ते प्रोत्साहन देण्यात आले मात्र टीम आंदोलनात अहंकाराला प्रेरणा तसेच प्रोत्साहन देण्याचा प्रकार घडला.
संपूर्ण क्रांती मध्ये विषय अनेक पण आशय एक होता मात्र इथे नेमका उलट प्रकार आहे. टीम आंदोलनात विषय एक मात्र आशय अनेक आहेत. संपूर्ण क्रांती मागे कारक विवेक होता तेच इथे अहंकार असल्याने या दोन्ही क्रांतीचा प्रवास किंवा दिशा परस्पर विरोधी आहेत. संपूर्ण क्रांती मध्ये आत्मपरीक्षण प्राधान्य कृती होती इथे परापरीक्षण प्राधान्य कृती आहे.
संपूर्ण क्रांती मध्ये नितळ पारदर्शकता होती मात्र टीम आंदोलनात पारदर्शकतेचा अभाव व्यापक प्रमाणात आहे. संपूर्ण क्रांती विवेक प्रधान असल्याने सुसंस्कार घडले मात्र इथे अहंकाराचे संस्कार घडले. भारतीय संस्कृती मध्ये अहंकाराच्या संस्कारांना कुसंस्कार समजण्यात येत होते मात्र इथून पुढे कदाचित सुसंस्कार समजले जातील.
थोडे आत्मपरीक्षण करून पहा या आंदोलनाने कोणता संस्कार केला त्यानंतर क्रांती आहे कि नाही याचा निर्णय घ्यावा. 

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते