घातक परिवर्तन
परिवर्तन म्हणजे निसर्ग स्वभाव आहे. निसर्गातील प्रत्येक घटकात
प्रत्येक क्षणात परिवर्तन घडते. मानव या निसर्ग चक्रातील एक घटक असल्याने मानव असो
कि मानवी स्वभाव परिवर्तनाला अपवाद नाही पण ते सगळ्यांना समजते-जाणवते असा नियम
नाही. काही व्यक्ती प्रसंगी आकलन कक्षेत न येणाऱ्या परिवर्तनाला नाकारण्याचा
प्रयन्त करतात अर्थात हा त्यांच्या जडण-घडण प्रक्रियेचा एक भाग आहे.
मानवी स्वभावातील परिवर्तनाचा मागोवा घेण्यासाठी भूतकाळ सापेक्ष विचार
करणे क्रमप्राप्त आहे. सापेक्षता विना अभ्यास करता येणार नाही. सध्या सोप्या
शब्दात भूतकाळ व वर्तमान काळ दरम्यान तुलना करावी लागेल त्याविना आकलन होणार नाही.
यापैकी भूतकाळ प्रथम घडला यामुळे त्याला सापेक्ष मानत- त्यापारत्वे वर्तमानाचा
अभ्यास करावा लागेल.
सध्या भारतीय सामाजिक वाढता भ्रष्टाचार असो कि हिंसाचार, बलात्कार,
जातीयवाद सारख्या समस्या वाढत आहेत. एका दृष्टीने प्रत्येक समस्या भिन्न आहे मात्र
भिन्नता मागील एकता पाहता मानवातील अहंकार वाढत असून विवेक निष्क्रीय होत आहे.
मानवी स्वभावाचे जे केंद्र आहे ते विवेकावरून अहंकाराकडे प्रवास करीत
आहे. वर्तमान समाजात स्वतःचे परीक्षण न करता इतरांचे परीक्षण करणे असो कि इतरांचे
मुल्यांकन करीत पात्रता,लायकी, अक्कल तपासणे याचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढत
आहे. वर्तमान मानव स्वतःला सत्य मानतो तसेच सत्याला संकुचित करीत आहे. मुळात मानव
संकुचित दृष्टीकोनाचा धनी असल्याने प्रत्येक गोष्ट संकुचित होत आहे.
वर्तमान समाजात वैचारिक परिपक्वता, प्रगल्भता अभावाने आढळते मात्र
बौद्धिक कुपोषण सर्रास आढळते तसेच स्वतःचे कुपोषण न पाहता इतरांचे शोषण करण्यात
येत आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो कि व्यक्ती स्वातंत्र्य यानावाखाली सरार्स
स्वैराचार करण्यात येतो मात्र त्याला स्वैराचार समजण्यात येत नाही कारण सगळे करतात
तेच मी करतो यामध्ये वावगे काय?
मी जे काही करतो ते शिष्टाचार वर्गवारीत मोडते मात्र बाकीचे जे काही करतात
ते स्वैराचार ते भ्रष्टाचार वर्गवारीत मोडते. गंमत म्हणजे मी काय करतो तसेच इतर
काय करतात हे मीच ठरवणार आहे. इथे मी माझी दृष्टी असो कि आकलन ते स्वभाव इतरांवर
लादणार आहे. सध्या जो तो स्वतःला इतरांवर लादण्याचा प्रयन्त करतो यामुळे आपसात
तणाव-कलह-वादंग ते शत्रुत्व वाढत आहे. वर्तमान मानवाला स्वतः परिपूर्ण नसल्याचे
भान आहे का? मुळात त्याला कोणत्याही प्रकारचे आचरण करताना भान आहे का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते.
भान म्हणजे विवेक तेच आवेग-आवेश ते अभिनिवेश म्हणजे अहंकार आहे.
वर्तमान काळात आवेग असो कि आवेश ते अभिनिवेश याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे.
वर्तमान मानव वास्तव न पाहता, त्यासंदर्भात विचार न करतात आवेशी वर्तन करतो पण आपण
काय करतो त्याचे परिणाम ते दुष्परिणाम यासंदर्भात विचार करीत नाही कारण तो
प्रत्येक गोष्ट वेगळी समजतो. अर्थात यामागे अहंकार आहे.
थोडक्यात माणूस नाण्याची एक बाजू पाहतो पण ती देखील धड समग्र नसते तरी
देखील त्या पाहण्याला सत्य मानतो कारण अज्ञान. माणसाचे पाहणे ते दिसणे व असणे
यामध्ये जमीन अस्मान इतके अंतर असताना दिसण्याला असणे समजतो. गंमत म्हणजे दिसते
तसे नसते म्हणून जग फसते असे लहानपणा पासून घोकत असतो.
एकंदरीत मानवी स्वभावाचे केंद्र विवेकावरून अहंकाराकडे वाटचाल करीत
असल्याने मानवाच्या समस्त स्वाभाविक संकल्पना मध्ये बदल होत आहे. यामुळे समस्त
सामाजिक मापदंड देखील बदलत आहेत. आज नैतिकता असो कि लायकी-पत्रात, प्रतिष्ठा याचे
मापदंड काय? कधी काळाचा व्याभिचार असो कि भ्रष्टाचार आजचा शिष्टाचार झाला आहे.
सगळ्यात महत्वाचे परिवर्तन म्हणजे खापर दुसऱ्यांच्या माथी फोडणे.
समाजात भ्रष्टाचार बोकाळतो त्याला नेते जबाबदार पण या नेत्यांना जन्म ते संस्कार
देणारा समाज मात्र निष्पाप, निरागस समाजाला जातो........
उद्या भाग दोन( टीम अण्णा आंदोलनाने बदलेल्या परिभाषा तसेच त्याची घातकता)
Comments
Post a Comment