घातक परिवर्तन(भाग-१०)


भारतीय सामाजिक जीवनात जी काही परिवर्तन घडत आहेत त्यापैकी एक घातक परिवर्तन म्हणजे अनियंत्रित गती, वेगवान जीवन, धावपळ ग्रस्त जीवन. दुसऱ्या शब्दात जीवनातील वाढती अस्थिरता.
वेग-गती त्याठिकाणी स्थिरता निर्माण होणार का? वर्तमान माणूस खूप काही मिळवण्यासाठी धावतो पण या धावण्यात जे काही गमावतो त्यामध्ये स्थिरता हा एक महत्वाचा घटक आहे. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे माणूस जी काही धावपळ करतो ती स्थिरता मिळवण्यासाठी करतो पण ही स्थिरता मिळते का? मुळात स्थिरता म्हणजे काय?
स्थिरता ही व्यक्तीच्या स्वभाव परत्वे बदलणारी एक संकल्पना आहे. पत्येकाची स्थिरता संदर्भातील व्याख्या भिन्न आहे. काही व्यक्ती भविष्यात स्थिरता मिळावी यासाठी वर्तमान काळात धावपळ करण्याचा प्रयन्त तसेच प्रकार करतात मात्र त्यांना स्थिरता प्राप्त होते का? वर्तमान हा भविष्याचा पाया आहे. वर्तमान काळात असणारी स्थिरता संदर्भातील संकल्पना काळाच्या ओघात बदलत जाते दुसऱ्या शब्दात संकल्पना संदर्भात अज्ञान असल्याने मानव धावतो पण प्राप्त होत नाही.
गंमत म्हणजे संकल्पना असते ती व्यक्तिगत अंतरंगात पण तिचा मागोवा असो की पूर्तता करण्याचा प्रयन्त बाह्य जगात करण्यात येतो. एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने पैसा असेल तर सुरक्षा किंवा स्थिरता ही संकल्पना असेल तर तो पैसा कमावण्याच्या मागे धावतो पण किती पैसा असेल तर स्थिरता मिळणार? कधी काळी हजारो म्हणजे खूप होते तेच आता लाखो देखील कमी आहेत तेच भविष्यात करोडो ते अरबो देखील कस्पटा समान होणार आहेत तर कमावणार किती? स्थिरता कधी? मानव यासंदर्भात विचार करीत नाही याउलट अपेक्षा व आशा बाळगत धावत राहतो.
मानव स्थिरतेचा मागोवा घेण्या मागे त्याची अस्थिरता आहे. मानवी स्वभावातील अस्थिरता त्याला स्थिरतेचा मागोवा घेण्यास भाग पाडते. मानवाने स्वतःच्या स्वभावाच्या अस्थिरतेचा मागोवा घेतला तर त्याची समस्त धावपळ थांबते पण वर्तमान मानवाला स्वतःच्या स्वभावाचा अभ्यास करण्यास सवड आहे कुठे? वर्तमान मानव जे दृष्टी व आकलनात आहे त्याचा मागोवा घेण्यासाठी सृष्टीत धावपळ करीत आहे. वास्तवात मानव आभासा मागे- मृगजळा मागे धावत आहे.
माणूस धावताना देखील एका स्थिर गतीने धावतो का? मानवाचे स्वतःच्या गतीवर नियंत्रण आहे का? ज्या गतीवर नियंत्रण नाही त्याठिकाणी गती स्थिर असणार का? मानव अनियंत्रित गतीने धावतो वर दुसरा पर्याय नाही असे कारण-स्पष्टीकरणही देतो पण यामागे असणारे अज्ञान उघडे पडते. सगळे धावतात म्हणून मी धावतो. इथे ससा व आभाळ फाटले पळा अशी गत आहे.
वास्तवात आपण धावतो कारण आपण स्वतःचे मालक पेक्षा स्वतःच्या अहंकाराचे व अज्ञानाचे गुलाम आहोत. मुळात अंतरंगात स्थिरतेचा अभाव आहे. अंतरंगात स्थिरता असणारा स्थितीप्रज्ञ होतो मात्र त्यासाठी प्रथम स्वतःच्या अंतरंगात उतरून आभास आणि वास्तव यांचा प्रयत्य देणारे ज्ञान पाहिजे. आम्ही पदवी घेत स्वतःला ज्ञानी समजतो पण ज्ञानाची लक्षणे काय? संयम-स्थिरता ही ज्ञानाची लक्षणे तसेच निष्पत्ती आहेत. आपण स्वतः काय करतो याच विचार करून पहा.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते