घातक परिवर्तन (भाग २)


वर्तमान समाजात स्वभाव केंद्राचे परिवर्तन प्रत्यय घ्यायचा असेल तर समाजाच्या एका वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे भ्रष्ट नेते असो कि फक्त शासकीय भ्रष्टाचार विरोधात कायद्याची मागणी करणारे टीम आंदोलन असो दोघे समाजाचे प्रतिनिधी आहेत.
समाजाचा एक वर्ग भ्रष्टाचार विरोधी लढतो तेच दुसरा वर्ग भ्रष्टाचार करतो प्रथम दर्शनी या दोघात भिन्नता आहे मात्र भिन्नता मागील एकता पाहता स्वाभाविक पातळीला दोघांच्यात समानता ते एकता आहे. या दोन्ही वर्गाचा स्वभाव केंद्र असणारा अहंकार तसेच त्याचा होणारा संस्कार हा चिंताजनक विषय असून तो वर्तमान तसेच भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरणार आहे.
टीम अण्णाला समाजकारणाचा संदर्भ तसेच मुखवटा आहे यासोबत नैतिकता, स्वच्छता तसेच गांधीवादाची किनार असल्याने त्याचा सामाजिक मनावर सखोल परिणाम तसेच संस्कार होणार आहे. विशेषतः या आंदोलनात अनेक तरुणांचा सहभाग असून ते आमच्या भावी समाजाचे-समाजकारण ते राजकारणाचे खांदेकरी होणार आहेत. ते पाहता परिभाषा ते मापदंड परिवर्तन अत्यंत घातक ठरणार आहे.
टीम अण्णाने अनेक परिभाषा ते मापदंड परिवर्तन केले अर्थात तो त्यांचा उद्देश होता कि नाही हा वादग्रस्त तसेच संशोधनाचा विषय आहे. मात्र जो संस्कार घडला तसेच घडत आहे तो एक निष्पत्तीचा एक भाग आहे. आंदोलनाचे जे काही परिणाम-दुष्परिणाम आहेत त्यांचा अविभाज्य घटक आहे.
काही व्यक्ती परिणाम तसेच दुष्परिणाम भिन्न मानतात कारण संस्कार. काही व्यक्ती आंदोलनाचे दुष्परिणाम नाकारणार यामध्ये शंका नाही कारण प्रत्येक परिवर्तन संदर्भात समजणे प्रत्येकाला साध्य होत नाही मात्र माणूस स्वाभाविकरित्या जे परिवर्तन दिसत-जाणवत नाही त्याला प्रसंगी नाकारतो पण मानवाच्या नाकाराण्याने परिवर्तनाला फरक पडतो कि मानवाला? विचार करून पहा.
टीम आंदोलनाने ज्या परिभाषा मध्ये परिवर्तन झाले त्यामध्ये प्रथम भ्रष्टाचार आहे. नंतर गांधीवाद परिभाषा आहे. नैतिकता असो कि स्वच्छता या परिभाषा मध्ये परिवर्तन झाले असून एकंदरीत अहंकारी आचरण करून देखील ते नैतिक, स्वच्छ, गांधीवादी. थोडक्यात अहंकार, असंयम, अविवेक म्हणजे नैतिक आचरण आहे.
आपण काय करतो ते तपासण्याच्या फंदात नपडता सरळ दुसऱ्यांचे परीक्षण करावे ते देखील स्वतःच्या निसर्गात असणाऱ्या मर्यादा दुर्लक्षित करून. स्वतःहून स्वतःला प्रमाणपत्र द्यायचे तसेच बाकींच्या व्यक्तींची अवहेलना, विटंबना करावी. एका वाक्यात आत्मपरीक्षण अभाव असणारा स्वभाव प्राधान्य आचरण करणे म्हणजे नैतिकता आहे.
लोकशाही मध्ये जनता व सरकार भिन्न आहे. लोकशाहीत जनता गुलाम आहे. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राजरोस पणाने स्वैराचार करावा. लोकशाहीत एक टीम गोळा करा आणि देश ते संसद पेक्षा श्रेष्ठ आहोत अशी घोषणा करा. अराजकीय आहोत यामुळे आराजाकता निर्माण झाली तरी चालेले पण मी सांगणार तीच पूर्व झालीच पाहिजे तरच सरकार लायक अन्यथा नालायक.
थोडक्यात अविवेकी, बेताल, बेफाम ते बेलगाम आचरण करावे भले यामुळे समाजात अनागोंदी ते हिंसाचार भडकवणारा संस्कार झाला तरीही हरकत नाही. या समस्त आंदोलनात विवेकी आचरण करीत बेफाम ते बेलगाम मुक्ताफळे उधळणारी वक्तव्ये टाळत हे आंदोलन पार पडणे शक्य होते कि नव्हते? भारतातील हे काही पहिले-वाहिले आंदोलन नव्हते. भारतास आंदोलनाचा अविभाज्य इतिहास आहे. तसेच जो संस्कार होता त्यामध्ये परिवर्तन झाल्याचे या आंदोलनाने लक्षात येते.
भारतात उघड हिंसाचार करणारी आंदोलन होतात मात्र त्याचा जनमानसावर तेवढा प्रभाव पडत नाही कारण हिंसा अनैतिक समजली जाते. इथे जी काही हिंसा होती ती अहिंसेच्या नावाखाली झाकली गेली. इतरांना हीन समजणे म्हणजे हिंसा अर्थात हि विवेकाची परिभाषा आहे. महात्मा गांधीजी असोत कि लोकनायक यांनी प्रथम आत्मपरीक्षण नंतर आंदोलन केले.
आंदोलनाची वर्तमान परिभाषा काय? आंदोलनात विवेक-संयम यांना काही स्थान आहे का? भारतीय इतिहासातील आंदोलन पहा नंतर परिभाषा परिवर्तन तसेच त्याची घताकता याचा प्रत्यय घ्यावा. आज उठसुठ कोणीही कोणाचीही लायकी काढत आहे की नाही?
अर्थात टीम ने समस्त संदर्भ ते परिभाषा परिवर्तन केले असा आरोप करण्याचा करंटेपणा मी करणार नाही पण परिवर्तनाला वेग-गती दिली हे नाकारणार नाही. टीम असो कि भ्रष्ट नेता ते अहंकाराच्या स्वभाव केंदाचे द्योतक तसेच समाजाचे प्रतिनिधी असल्याने अत्यंत चिंताजनक विषय आहे.
जगातील कोणत्याही मानवाचा जवळ मित्र असो कि शत्रू हा त्याचा व्यक्तिगत स्वभाव आहे. मानव जगातील परिवर्तन पाहतो-अभ्यासतो पण स्वतःच्या स्वभावाचे काय? त्यामधील परिवर्तनाचे काय? आज काही व्यक्तींचा अहंकार समाजात उपद्रव करीत असून आम्ही कायद्याने सुधारणा करण्याचे दिवास्वप्न पाहतो कि माझ्याशी निगडीत नाही यामुळे दुर्लक्ष करतो पण याचा परिणाम ते प्रभाव आम्हाला भोगावे लागतात तसेच आमच्या भावी पिढीला भोगावे लागणार आहेत.
आपण आत्मपरीक्षण करून विवेक सक्रीय आचरण केले तर त्याचा प्रभाव आपल्या मुलांच्या वर तसेच आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीवर पडणार आहे. कोणी तरी जन्माला येणार व तो सुधारणा करणार अशी भ्रामक अपेक्षा बाळगण्यापेक्षा स्वतः पासून प्रारंभ केला तर त्याने जीवनाचा उपभोग तसेच आनंद मिळणार आहे. तसेच अहंकाराचे समस्त संभ्रम गळून पडणार आहेत. करून पहा आणि प्रत्यय घ्या. जो प्रत्यय-अनुभव तो सत्य बाकी सगळे संभ्रम.  

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते