लोकशाही की हुकुमशाही?
भारतात घटनात्मक लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे पण ज्ञान किती व्यक्तींना आहे हा मात्र संशोधनाचा एक विषय आहे. वर्तमान भारतीय लोकशाहीची दुरवस्था असो की अनर्थ असो तो पाहता असा विचार मनात डोकावणे स्वाभाविक आहे. जर टीम अण्णा आंदोलन पहिले किंवा जनआंदोलन मानले तर हा विषय गहन व गंभीर होते. लोकशाही म्हणजे तुम्ही तुमचे मत मांडा त्याचे विश्लेषण करा तसेच इतरांचे मत देखील विचारात घेत त्याचे विश्लेषण करा. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र आहे. आपण आपला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावतो त्याप्रमाणे इतरांना देखील संधी प्रदान करणे. लोकशाहीत मी स्वच्छ व नैतिक तसेच तू भ्रष्ट व अनैतिक असल्याचे माझे मत असून तुला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही असा प्रकार लोकशाही द्योतक आहे का? न्यायालय देखील द्विपक्षीय युक्तिवाद ऐकते थोडक्यात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा तसेच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. टीम अण्णाला कदाचित लोकशाही मान्य नसावी अथवा मी करेल-सांगेल तीच पूर्व म्हणजे लोकशाही वाटत असावी यामुळे त्यांनी ज्या लोकपाल साठी आग्रह धरला त्याला अमर्याद अधिकार तसेच अनिर्बंधता प्रदान कर...