Posts

Showing posts from April, 2012

लोकशाही की हुकुमशाही?

भारतात घटनात्मक लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे पण ज्ञान किती व्यक्तींना आहे हा मात्र संशोधनाचा एक विषय आहे. वर्तमान भारतीय लोकशाहीची दुरवस्था असो की अनर्थ असो तो पाहता असा विचार मनात डोकावणे स्वाभाविक आहे. जर टीम अण्णा आंदोलन पहिले किंवा जनआंदोलन मानले तर हा विषय गहन व गंभीर होते. लोकशाही म्हणजे तुम्ही तुमचे मत मांडा त्याचे विश्लेषण करा तसेच इतरांचे मत देखील विचारात घेत त्याचे विश्लेषण करा. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र आहे. आपण आपला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावतो त्याप्रमाणे इतरांना देखील संधी प्रदान करणे. लोकशाहीत मी स्वच्छ व नैतिक तसेच तू भ्रष्ट व अनैतिक असल्याचे माझे मत असून तुला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही असा प्रकार लोकशाही द्योतक आहे का? न्यायालय देखील द्विपक्षीय युक्तिवाद ऐकते थोडक्यात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा तसेच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. टीम अण्णाला कदाचित लोकशाही मान्य नसावी अथवा मी करेल-सांगेल तीच पूर्व म्हणजे लोकशाही वाटत असावी यामुळे त्यांनी ज्या लोकपाल साठी आग्रह धरला त्याला अमर्याद अधिकार तसेच अनिर्बंधता प्रदान कर...

गांधीवादी की गोडसेवादी?

टीम अण्णा आंदोलनास गांधीवादाची किनार-झालर ते झुल आहे अर्थात ते कोणी केले तो व्यक्ती ज्ञात की अज्ञात याने फारसा फरक पडणार नाही. गांधीवाद म्हणजे नेमके काय? उपोषण करणे, खादीचे कपडे घालणे, गांधी टोपी वापरणे ते मौन धारण करणे म्हणजे गांधीवाद आहे का? अर्थात ज्यांनी गांधीजीचे आचरण बाहेरून पकडले, अंधानुकरण केले त्यांच्या दृष्टीने हा गांधीवाद निश्चित आहे याबद्दल दुमत नाही पण ज्यांनी गांधीवाद आत्मसात केला म्हणजे गांधींचे अंतरंग पाहण्याचा प्रयत्न केला ते या प्रकारला कधीही गांधीवाद समजणार नाहीत. गांधीवाद आत्मसात करण्याचे पहिले पाऊल म्हणजे आत्मपरीक्षण त्यामधून ज्ञान प्राप्ती मधून सक्रीय होणारा विवेक. विवेकाच्या सक्रियतेने निर्माण होणारा सयंम म्हणजे अहिंसा. अहिंसा असो की सयंम या निखळ निष्पत्ती आहेत यामागे विवेक सक्रियता म्हणजे जागरुकता आहे. कोणताही विवेकी माणूस इतरांचा अनादर करीत नाही यामुळे हिंसक होण्याचा प्रश्न निर्माण होत नाहीत. विवेकी माणूस समतेचा पुरस्कार करतो यामुळे भेदभाव नाहीसा होते. विवेकी माणूस जग काय करते यापेक्षा त्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो तसेच आकलन करतो याला प्राधान्य देतात ...

भ्रष्टाचार की शिष्टाचार?

टीम अण्णा आंदोलनात अनेक शब्दांच्या परिभाषा संदर्भात संदिग्धता तसेच पारदर्शकतेचा अभाव जाणवतो. भ्रष्टाचार म्हणजे काय? याशब्दाची परिभाषा-व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. पण परिभाषा व्यक्तीचे एकंदरीत व्यक्तिमत्व दर्शवते. इथे टीम अण्णाला अभिप्रेत असणारी व्याख्या कोणती असा प्रश्न पडतो कारण त्यांचा जो लढा तसेच मागणी आहे ती फक्त सरकारी भ्रष्टाचार रोखणारा तसेच चौकशी ते शासन करणाऱ्या कायद्याच्या मागणी करिता आहे. सामान्य माणूस भ्रष्टाचार करीत नाही किंवा फक्त नेते आणि सरकारी अधिकारीच भ्रष्टाचार करतात किंवा मक्तेदार आहेत असा त्याचा समज असेल तर परिभाषा म्हणजे नेता व सरकारी अधिकारी असणाऱ्या व्यक्तीने जी काही कृती केली ती भ्रष्टाचार मात्र तीच कृती सामान्य व्यक्ती अथवा टीम सदस्याने केली तर तो एक शिष्टाचार आहे. टीम अण्णाचे रण धुरंदर शिलेदार-सेनानी ते सेनापती श्री.अरविंद केजरीवाल यांनी शासकीय सेवा सोडताना सरकार सोबत केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन केले त्यापोटी त्यांनी दंडात्मक असणारी रक्कम भरणे क्रमप्राप्त होते पण मी समाजसेवक असल्याने तसेच समाजसेवा करण्यासाठी राजीनामा दिला यामुळे मी रक्कम भरण्याचे कारण...

अर्धवट इलाज का?

टीम अण्णा तसेच बाबा रामदेव यांच्यातील जी काही समानता आहे ती म्हणजे अर्धवट इलाज करण्याचा अट्टाहास. इथे अर्धवट कारण टीम अण्णा सामान्य माणूस तसेच समाजातील भ्रष्ट प्रवृत्ती संदर्भात मुग गिळून गप्प आहे तेच बाबा भारतात असणाऱ्या काळ्या पैशा संदर्भात मौन बाळगून आहेत. भ्रष्ट समाज भ्रष्ट नेता निर्माण करतो कारण संस्कार. नेता असो की अधिकारी याच समाजात जन्माला येत याच समाजात संस्कार घेत लहानाचे मोठे होतात. आज स्वार्थ साधण्याचा संस्कार घरा घरात पाहण्यास मिळतो पण त्याला स्वार्थ साधने असे समजले जाते मात्र हाच प्रकार नेता वा अधिकारी करतो त्यावेळी भ्रष्टाचार ठरतो तेच टीम अण्णा सदस्य करतात त्यावेळी शिष्टाचार ठरतो हा भाग वेगळा. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनच्या नावाखाली फक्त शासकीय भ्रष्टाचार संदर्भात वाच्यता करणाऱ्यांना भ्रष्टाचाराचे मूळ उगम स्थान ना दिसले ना यासंदर्भात बोलले. कमीतकमी समाजाला चार ओळींचे अवाहन करून अथवा मी भ्रष्टाचार करणार नाही अशी एक प्रतिज्ञा घेण्याचे अवाहन करून आंदोलन केले असते तर तो पूर्ण इलाज वाटला असता मात्र इथे आंदोलन एक सोपस्कर अथवा सोयीस्कर ते अर्धवट इलाज भासते याबद्दल कधी विचा...

भद्र की अभद्र युती?

जेष्ठ सरकार सुधारक श्री. अण्णा हजारे व सध्या सरकार सुधारक होण्याच्या मार्गावर असणारे योगी श्री.बाबा रामदेव यांनी एकत्र येत सरकार तसेच लोकशाही विरुद्ध बिगुल वाजवले. आम्ही सुरवाती पासून एकत्र आहोत फक्त एकमेकांच्या आंदोलनात हातभार अंतरावर राहणारे की ठेवणारे मित्र एकत्र येतात. काही असो मैत्री अथवा युती जुनी असो की नवी याने फारसा फरक पडत नाही. इथे दोन्ही व्यक्तींची विचारधारा काही संदर्भात कमालीची विरुद्ध आहे पण काही बाबतीत साधर्म्य आहे. दोघे ब्रम्हचारी म्हणजे अविवाहित आहेत. ब्राम्ह्चर्याचा प्रथम गुण-कसोटी म्हणजे सयंम या दोघांच्या बोलण्यात आहे का? हा भाग वेगळा. दोन्ही व्यक्ती कायदा करण्याचा अट्टाहास करताना संविधानात्मक मार्ग पत्करण्यास तयार नाहीत. दोघांचा प्रयन्त सरकार सुधारणा करण्याचा आहे पण दोघे समाजाला एका शब्दाने प्रबोधनात्मक बोलण्यास तयार नाहीत. थोडक्यात दोघांना अर्धवट इलाज करण्याची इच्छा आहे. दोघांची इच्छा म्हणजे सरकारने मी सांगतो तेच करावे. एक व्यक्ती म्हणतो मी गांधीवादी आहे. गांधीवादी म्हणजे अहिंसा अशी आमची बापड्यांची समजूत होती पण त्यांनी गांधीवादाची नवीन परिभाषा आम्हा समोर म...

महागाई विरुद्ध बोंब पण चोरी बाबत आळीमिळी गुपचिळी का?

महाराष्ट्राचा अर्थ संकल्प सादर झाला त्यामधील घरगुती गँस वरील कर वाढ होताच विरोधक असो की जनता यांना आयते कोलीत मिळाले. सगळ्या थरातून भाव वाढीला विरोध करण्यात आला अर्थात यामध्ये काही महाभागांनी स्वतःची पोपटपंची साधली. पोपटपंचीच कारण भाववाढीचा विरोध करणारे घरगुती गँसचा होणारा गैरवापर संदर्भात मात्र आळीमिळी गुपचिळी का करतात? गावा-गावातील हॉटेल व्यावसाईक असोत की गँसवर चालणारे चारचाकी वाहन असोत यामध्ये सर्रास घरगुती गँसचा वापर करताना आढळतात. अर्थात काही व्यक्ती यासाठी जास्तीचे पैसे देखील मोजतात. गँसचा दुकानदार असो की ग्राहक काळाबाजार करून पैसे कमावतात हे एक उघड गुपित आहे. सगळा प्रकार राजरोस पणाने सुरु आहे पण यासंदर्भात स्वतःला लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ समजणारे असो की स्वतःला समस्त समाजाचे स्वयंघोषित प्रतिनिधी समजणारे टीम अण्णा सदस्य असोत मुग गिळून गप्प का बसतात? पत्रकार असो की टीम अण्णा अथवा सामाजिक घटक असोत सध्या सरकार त्याचे कर्तव्य करीत नाही यासाठी बेंबीच्या देठा पासून ओरडत आहे पण यापैकी किती व्यक्ती प्रथम स्वतःच्या कर्तव्याचे पालन करतात? समाजात अधिकाराला हावरे पण कर्तव्याला बावरे ...

वाद-विवाद की वैचारीक देवाण-घेवाण?

शालेय जीवनात वाद-विवाद स्पर्धा घेण्यात येतात अर्थात विद्यार्थी आकलन प्रगल्भ करण्यासाठी तसेच विद्यार्थी वक्तृत्व क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास प्रदान करणे यासारखी काही उद्दिष्ट असतात परंतु हाच विद्यार्थी सामाजिक जीवनात पुढे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करीत वाद-विवाद करतो. अर्थात यामागे पालाकांच्यातील आपसातील वाद-विवादांचा संस्कार देखील आहे. वर्तमान समाजात ज्याठिकाणी मत-विचार मांडण्यात येतात त्याठिकाणी वाद-विवाद निर्माण होतात किंवा करण्यात येतात. मत-विचार मांडणारा असो अथवा त्याला प्रतिक्रिया देणारा असो यापैकी कोणताही व्यक्ती वाद-विवाद निर्माण करू शकतो-करतो. याठिकाणी जो काही वाद-विवाद घडतो तो वैचारीक देवाण-घेवाण करणारा असतो का? या वाद-विवादात आकलन प्रगल्भ होते का? याविवाद मध्ये मुलभूत मुद्द्यांवर चर्चा घडते की आरोप-प्रत्यारोप यांच्या फैरी झाडत मुलभूत विषय-आशय यांना बगल दिली जाते का? वर्तमान जीवनावर शाळा-पालक-पासिद्धी माध्यम व सामाजिक सांकेतिक स्थळांचा व्यापक प्रभाव आहे. या समस्त ठिकाणी होणारी चर्चा ही वाद-विवादाचे स्वरूप धारण करते मात्र यामध्ये वैचारीक देवाण-घेवाण घडत...

कृषीप्रधान, क्रिकेटप्रधान, मद्यप्रधान की पिचकारीप्रधान........

आम्ही शालेय जीवनात असताना भारत एक कृषीप्रधान देश असल्याचे आम्हाला शिकवण्यात-सांगण्यात आले. भारतीय संस्कृती असो की अर्थ व्यवस्था ही कधी काळी शेती प्रधान होती यासंदर्भात कोणाचेही दुमत नाही मात्र परिवर्तन हा निसर्ग नियम यामुळे संस्कृती असो की अर्थ व्यवस्था त्यामागील प्राधान्य घटक असो की पार्श्वभूमी असो त्यामध्ये परिवर्तन होणे स्वाभाविक-नैसर्गिक आहे. वर्तमान भारतीय संस्कृती असो की अर्थ व्यवस्था असो त्यामधील प्राधान्य घटक कोणता? कृषी प्रधान हे परंपरागत-पठडीतील किंवा पाठ केलेले उत्तर देणे सोपे आहे पण वास्तव पाहणे असो की स्वीकारणे असो जरा कठीण आहे. मी परपरीक्षण वादी किंवा टीम अण्णा सदस्य अथवा विरोधी पक्ष नेता, पत्रकार नाही यामुळे सगळे खापर सरकारच्या माथी मारणे व स्वतःची जबाबदारी-कर्तव्य यांना पाठ दाखवणे मला जमत नाही. मी स्वतः काय पाहतो तसेच त्यामधून काय समजतो व वागतो याचा प्राधान्याने विचार करतो. वर्तमान समाजात कृषी क्षेत्राला कितपत प्राधान्य दिले जाते? तसेच क्रिकेट, दारू, तंबाखू-गुटखा-पान यांना कितपत प्राधान्य दिले जाते? कधी काळी भारतीय संस्कृती मध्ये फक्त वावर(शेत) महत्वाचे होते नंतर...

वाढती कुपमंडूक प्रवृत्ती

वर्तमान समाजातील प्रवृत्तीची भूतकाळ सापेक्ष विचार करता माणसातील कुपमंडूक प्रवृत्ती वाढत आहे. दुसऱ्या शब्दात माणसातील स्वार्थ तसेच स्व-अर्थ वाढत आहे. मानवाला जग काय करते हे समजते मात्र स्वतः काय करतो याची जाणीव अथवा भान नाही. वर्तमान मानव मी व माझा यामध्ये बंदिस्त होत आहे. मी योग्य यामुळे माझा योग्य, मी निष्पाप व निरागस यामूळे माझा देखील निष्पाप व निरागस आहे. माझा हा स्थळ-वेळ नुसार बदलतो. माणूस समस्यांचा विचार करताना देखील मी व माझा यांच्याशी निगडीत समस्यांचा विचार करतो. सध्या समाजात माझे हे डबके असणारे भाषा-जात-धर्म-प्रांत-पेशा यांच्या समस्यांचा विचार करताना इतर भाषा-जात-धर्म-प्रांत-पेशा यांचा एक तर विचार करीत नाहीत आणि केला तर तो दुय्यम स्वरूपाचा अथवा विरोधाचा-शत्रुत्वाचा असतो. या समस्त डबक्यातील एकाही बेडकाला यापैकी कशाचे ही वास्तविक ज्ञान नसते पण अस्मिता व स्वाभिमान यांच्या नावाखालील अहंकार यांना पुरता झिंगवतो. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे डबके घ्या यामधील व्यक्तींना फक्त सरकारी भ्रष्टाचार सोबत घेणे-देणे असून सामाजिक भ्रष्टाचार संदर्भात ना सोयरे-ना सुतक. मध्यंतरी डॉक्टरांनी ...

ये तो आगाज है तो सोचो अंजाम क्या होगा?

अल्पवयीन मुलांनी पैसा तो देखील सहजगत्या मिळवण्यासाठी मित्राचे अपहरण केले तसेच त्याची हत्या केली. काही व्यक्तींनी प्रसार माध्यमांना जबाबदार ठरवले तेच काहींनी पालकांचा बेजबाबदार पणा यावर प्रकाश टाकला. काही महिन्या पूर्वी अल्पवयीन मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होता त्यावेळी देखील चर्चा घडल्या-झाडल्या पण आम्ही कोणता अर्थबोध घेतला? वर्तमान माणूस कमावण्याच्या मागे धावत सुटला आहे पण कमावण्या मधील जे गमावणे आहे ते पाहण्यास तयार नाही. अर्थात ते समजण्या-जाणवण्यासाठी जे भान-जागरुकता हवी त्याचा अभाव असल्याने याप्रकारच्या घटना घडतात तसेच त्यांची पुनरावृत्ती होते. मानवाने जे काही कमावले त्यामधील गमावण्याचा हा एक प्रारंभ-सुरुवात आहे. वर्तमान माणसातील हिंसकता वाढत आहे. वर्तमान माणसाचा अहंकार सर्वोच्च शिखराकडे प्रवास करीत आहे. मानवाने जीवनाचे वर्गीकरण केले असून व्यावसाईक-व्यावहारिक,कौटुंबिक,व्यक्तिगत अश्या प्रकारात वर्गीकरण करून आयुष्य जगण्यास प्रारंभ केला आहे. पालकांच्या एकंदरीत आचरणाचा मुलांवर प्रभाव पडतो तसेच मुले फक्त अनुकरण करतात. आज पालकांना मुलांना देण्यासाठी भरपूर पैसा आहे पण वे...

हल्ला बोल

वर्तमान भारतीय संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य काय? तर हल्ला बोल. वर्तमान भारतीय समाजात कोणता माणूस कोणत्या माणसावर कधी हल्ला करणार याचा काही नियम अथवा भरवसा नाही. डॉक्टर असो की पत्रकार, कार्यकर्ता सामाजिक असो की राजकीय, व्यक्ती प्रसिद्ध असो कुप्रसिद्ध अथवा सामान्य असो त्यावरती हल्ला करणे ही संस्कृती बनली आहे. हल्ला करण्याची कारण मीमांसा असो की पद्धत ही व्यक्ती परत्वे बदलते. हल्ला करण्यासाठी कोणी हिंसक मार्गाचा अवलंब करतो तर कोणी अहिंसात्मक मार्गाचा मुखवटा परिधान करून हल्ला करतो. हल्ला करणारा असो की झेलणारा असो स्वतःला निर्दोष-निष्पाप-निरागस समजतो तेच दुसरे दोषी-पापी-नालायक ठरवतो. वर्तमान माणूस स्वतःचे परीक्षण न करता जे काही आचरण करतो त्याची एक निष्पत्ती म्हणजे हल्ला बोल आहे. डॉक्टर असो की पत्रकार अथवा सामान्य माणूस यांच्यावर जे काही हल्ले होतात त्यामागे दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यवर घाला घालण्याचा प्रयन्त व प्रकार आहे. मुळात आम्ही लोकशाही राज्य प्रणाली अंगिकारली पण आमची जडण-घडण ही हुकुमशाही वातावरणात घडते तसेच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील अंतर आम्हाला माहित नाही यामुळे त्याचे ज्ञान फ...

नक्षलवाद: एक दुर्लक्षित समस्या

आज भारता समोर असणाऱ्या प्रमुख समस्या असोत की शत्रू असोत याबद्दल कोणत्याही सामान्य माणसाला विचारणा करता तो एक यादी सांगणार आहे मात्र या यादीत नक्षलवादाचे स्थान असेल का? असेल तर कोणत्या क्रमांकाला असेल? या प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचारून पहा व खातरजमा करून घ्या. आज भारतात कोणत्याही शहरात स्फोट घडला आणि तो दहशतवादी असला तर त्याचे प्रक्षेपण असो की चर्चात्मक काथ्याकुट किती दिवस चालतो हे मी सांगण्याची गरज नाही मात्र हाच स्फोट नक्षलवाद्यांचा असेल तर कितीवेळ चर्चा व प्रक्षेपण होते याबद्दल थोडा विचार ते अभ्यास करावा लागणार आहे. मिडीयाच्या आचरणाचा असो की विचारांचा सामाजिक मनावर व्यापक तसेच प्रभावी पगडा आहे. समाजात अनेक ठिकाणी अनेक विषयावर चर्चा घडते पण या चर्चेत नक्षलवाद हा विषय कधी हाताळला जातो का? यावरती सखोल अभ्यास केला जातो का? नाही तरी आता सखोल अभ्यास करण्याची पद्धत कालबाह्य होत आहे याउलट माझा अभ्यास सखोल व सत्य असा विचार व आचार करण्याची संस्कृती उदयाला येत आहे. समस्या कोणतीही असो तिला प्रारंभिक काळात दुर्लक्षित करण्यात येते विशेषतः जो पर्यंत मला भेडसावत नाही तो पर्यंत मी त्यासंद...