वाढती कुपमंडूक प्रवृत्ती
वर्तमान समाजातील
प्रवृत्तीची भूतकाळ सापेक्ष विचार करता माणसातील कुपमंडूक प्रवृत्ती वाढत आहे.
दुसऱ्या शब्दात माणसातील स्वार्थ तसेच स्व-अर्थ वाढत आहे. मानवाला जग काय करते हे
समजते मात्र स्वतः काय करतो याची जाणीव अथवा भान नाही.
वर्तमान मानव मी व
माझा यामध्ये बंदिस्त होत आहे. मी योग्य यामुळे माझा योग्य, मी निष्पाप व निरागस
यामूळे माझा देखील निष्पाप व निरागस आहे. माझा हा स्थळ-वेळ नुसार बदलतो. माणूस
समस्यांचा विचार करताना देखील मी व माझा यांच्याशी निगडीत समस्यांचा विचार करतो.
सध्या समाजात माझे
हे डबके असणारे भाषा-जात-धर्म-प्रांत-पेशा यांच्या समस्यांचा विचार करताना इतर
भाषा-जात-धर्म-प्रांत-पेशा यांचा एक तर विचार करीत नाहीत आणि केला तर तो दुय्यम
स्वरूपाचा अथवा विरोधाचा-शत्रुत्वाचा असतो. या समस्त डबक्यातील एकाही बेडकाला
यापैकी कशाचे ही वास्तविक ज्ञान नसते पण अस्मिता व स्वाभिमान यांच्या नावाखालील
अहंकार यांना पुरता झिंगवतो.
भ्रष्टाचार विरोधी
आंदोलनाचे डबके घ्या यामधील व्यक्तींना फक्त सरकारी भ्रष्टाचार सोबत घेणे-देणे
असून सामाजिक भ्रष्टाचार संदर्भात ना सोयरे-ना सुतक. मध्यंतरी डॉक्टरांनी
त्याच्यावर होणारे हल्ले यासाठी निषेध केला तसेच कायद्याची मागणी केली. सध्या
पत्रकार हाच प्रकार करीत आहेत पण यांना सामान्य व्यक्ती व त्याच्या वर होणारा
हल्ला याच्याशी काही देणे-घेणे नाही. किती डॉक्टर वर हल्ले झाले हे फक्त डॉक्टर
सांगतील तेच हाच प्रश्न पत्रकारांना विचार त्याच्या जवळ आकडेवारी मिळणार नाही.
किती पत्रकारांच्यावर हल्ला झाला हे फक्त पत्रकार सांगणार आहेत याबद्दल डॉक्टर
सांगणार नाहीत. यादोघांना किती सामान्य व्यक्तीवर हल्ला झाला ते सांगता येणार
नाही.
थोडक्यात जो तो मी व
माझा यापलीकडे जाऊन एक माणूस व मानवाच्या समस्या असा विचार करतो का? आम्हाला
दुसऱ्या मानवाची म्हणजे तू व तुझी समस्या समजते किंवा जाणवते का? आज जो तो माझा
साठी एकत्र येत मी व माझ्या समर्थन साठी एकत्र येतो तसेच माझे काही चुकत नाही, माझ्यात
काही त्रूटी नाहीत असाच अट्टाहास करतो.
लष्कर प्रमुखांचे
फुटलेले अथवा फोडलेले पत्र छापणे असो की मुंबई हल्ला प्रत्यक्ष दर्शवताना जे घडले
असो मिडिया समर्थक स्वतःची चूक-त्रूटी मान्य करतात का? पेड न्यूज संदर्भात मिडिया
बोटचेपी भूमिका घेते. डॉक्टरांना त्यांच्या पेशातील भ्रष्टता संदर्भात विचारणा करा
तोंडाला कुलूप लागते. भाषा वादी असो की प्रांतवादी अथवा जातीयवादी यांना त्याच्या
त्रूटी विचारा बघा सांगता येतात का? आज जो-तो दुसऱ्यांचे दोष-त्रूटी शोधात फिरतो
मात्र स्वतः मधील त्रूटी-दोष दिसत नाही. जोतो स्वतः असो की स्वतःचा व्यवसाय यांची
सोय-सुविधा यांचा विचार करताना दुसऱ्यांची होणारी गैरसोय संदर्भात विचार करू शकत
नाही कारण संकुचित बुद्धी मागील संकुचित दृष्टीकोन.
मानवातील संकुचित
दुष्टीकोन व बुद्धिमत्ता मुळे मानव स्वतःच्या जीवनात समस्या निर्माण करून घेतो
मात्र त्याचे खापर दुसऱ्यांच्या माथी फोडतो. कोणत्याही ठिकाणचा कलह-वाद पहा त्यामध्ये
दोन पक्ष असतात प्रत्येकाचा दावा मी व माझा तो निर्दोष मात्र समोरचा दोषी.
थोडक्यात प्रत्येकजण एका हाताने टाळी वाजवण्याचा प्रयत्न करतो तसेच ती वाजत
असल्याचा दावा करतो. जो पर्यंत माणूस मी व माझे हे डबके म्हणा की कोष म्हणा यामधून
बाहेर पडणार नाही तोपर्यंत तो परिपक्व-प्रगल्भ होणार नाही तसेच त्याविना त्याचे
बैद्धिक कुपोषण दूर होणार नाही. आज जे आरोप-प्रत्यारोप घडतात त्यामागे कुपमंडूक
प्रवृत्ती-परपरीक्षण आहे. थोडे आत्मपरीक्षण करून पहा त्याविना डबक्यातून बाहेर
पडता येणार नाही.
Comments
Post a Comment