हल्ला बोल
वर्तमान भारतीय
संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य काय? तर हल्ला बोल. वर्तमान भारतीय समाजात कोणता माणूस
कोणत्या माणसावर कधी हल्ला करणार याचा काही नियम अथवा भरवसा नाही. डॉक्टर असो की
पत्रकार, कार्यकर्ता सामाजिक असो की राजकीय, व्यक्ती प्रसिद्ध असो कुप्रसिद्ध अथवा
सामान्य असो त्यावरती हल्ला करणे ही संस्कृती बनली आहे.
हल्ला करण्याची कारण
मीमांसा असो की पद्धत ही व्यक्ती परत्वे बदलते. हल्ला करण्यासाठी कोणी हिंसक
मार्गाचा अवलंब करतो तर कोणी अहिंसात्मक मार्गाचा मुखवटा परिधान करून हल्ला करतो.
हल्ला करणारा असो की झेलणारा असो स्वतःला निर्दोष-निष्पाप-निरागस समजतो तेच दुसरे
दोषी-पापी-नालायक ठरवतो. वर्तमान माणूस स्वतःचे परीक्षण न करता जे काही आचरण करतो
त्याची एक निष्पत्ती म्हणजे हल्ला बोल आहे.
डॉक्टर असो की
पत्रकार अथवा सामान्य माणूस यांच्यावर जे काही हल्ले होतात त्यामागे दुसऱ्यांच्या
स्वातंत्र्यवर घाला घालण्याचा प्रयन्त व प्रकार आहे. मुळात आम्ही लोकशाही राज्य
प्रणाली अंगिकारली पण आमची जडण-घडण ही हुकुमशाही वातावरणात घडते तसेच स्वातंत्र्य
आणि स्वैराचार यामधील अंतर आम्हाला माहित नाही यामुळे त्याचे ज्ञान फार दूर
अंतरावर आहे. थोडक्यात मी काही केले ते स्वातंत्र्य मात्र तेच बाकीचे करतात
त्यावेळी स्वैराचार असतो.
एका डॉक्टर वर अथवा
पत्रकारावर हल्ला होते तो त्याच्या पेश्यावर हल्ला असतो की त्याच्या व्यक्तिमत्वा
वर हल्ला असतो? यासंदर्भात किती डॉक्टर अथवा पत्रकारांनी चिंतन अथवा अभ्यास केला
आहे का? थोडक्यात यांनी कधी स्वतःच्या व्यक्तिमत्वा मधील त्रुटींचा मागोवा घेतला
का? हल्ला करणारा असो की झेलणारा असो यांनी कधी स्वतःचे परीक्षण-त्रूटी यांचा
मागोवा घेतला का?
हल्ला करणारा तसेच
झेलणारा फक्त नाण्याची एक बाजू पाहतात ती देखील पूर्ण नसते मात्र त्यामधून जे काही
आकलन करतात त्याला परिपूर्ण समजतात तसेच यावरून गदारोळ करतात. एक जण कायदा हातात
घेत गदारोळ करतो तर दुसरा कायदा करा यासाठी गदारोळ करतो पण कायदा हातात घेऊन असो
की कडक करून असो प्रश्न सुटणार आहे का? ज्याला ना जनाची, ना मनाची, तो कायद्याची
भीड बाळगणार का?
वैद्यकीय परिभाषेत
सांगता कोणत्याही रोगाचा इलाज करण्यासाठी प्रथम अचूक निदान करणे गरजेचे आहे नंतर
उपचार मात्र हल्ला करणारा असो की त्याचा इलाज करणारा (झेलणारा) असो स्वतःचे निदान
तपासून पाहतात का? जो माणूस स्वतःला सत्य समजतो तो माणूस स्वतःचा निर्णय असो की
निदान अचूक व सत्य समजणार यामुळे त्याचा पुनर्विचार करण्याचा प्रश्न निर्माण होत
नाही.
डॉक्टर वर हल्ला
होते कारण त्याने हलगर्जी पणा केला असा संशय तेच पत्रकारांवर हल्ला होते कारण नको
तिथे नाक खुपसले किंवा माझ्या विरोधात मुद्दाम बातमी दिली. काही डॉक्टर हलगर्जीपणा
करतात याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येक डॉक्टर हलगर्जीपणाच करतो असा नियम नाही.
मात्र जे डॉक्टर हलगर्जीपणा करतात त्याच्या विरोधात इतर डॉक्टर असो की त्यांच्या
संघटना असोत कोणती कारवाई करतात का? हाच प्रकार पत्रकारांच्या बाबत आहे.
प्रत्येक पत्रकार हा
पत्रकारिता करतो असे नाही तर तो व्यक्तिगत शत्रुत्व असो की खंडणी-हप्ता न दिल्याचा
राग धरून देखील कृती करतो या वास्तवाला नाकारता येणार नाही. या प्रकारचे कलंकित
पत्रकार संदर्भात पत्रकार संघटना काही कारवाई करतात का?
पत्रकार असो की
डॉक्टर अथवा हल्लेखोर ते समस्त याच समाजाचे तसेच सामाजिक संस्कारांचे प्रतिनिधित्व
करतात. वर्तमान समाज हा बहिर्मुखी असल्याने निखळ दुसऱ्यांचे परीक्षण करतो मात्र
सृष्टी पाहणारी दृष्टी सहजगत्या दुर्लक्षित करतो याची एक निष्पत्ती म्हणजे हल्ला
बोल आहे. आम्ही आचरण करताना कधी दक्षता बाळगत आचरण करतो का? थोडा स्वतःच्या आचरणाचा
अभ्यास करून स्वतःच्या समज मधील गैरसमज दूर करून घ्या याविना हल्ला बोल थांबणार
नाही. समाज सुधारणेचा प्रारंभ स्वतः पासून करावा लागणार आहे मात्र स्वतःचा अपवाद
मानत वाटचाल करता सुधारणा होणार नाहीत तर हल्ला बोलच होणार आहे.
Comments
Post a Comment