गांधीवादी की गोडसेवादी?
टीम अण्णा आंदोलनास
गांधीवादाची किनार-झालर ते झुल आहे अर्थात ते कोणी केले तो व्यक्ती ज्ञात की
अज्ञात याने फारसा फरक पडणार नाही. गांधीवाद म्हणजे नेमके काय? उपोषण करणे, खादीचे
कपडे घालणे, गांधी टोपी वापरणे ते मौन धारण करणे म्हणजे गांधीवाद आहे का? अर्थात
ज्यांनी गांधीजीचे आचरण बाहेरून पकडले, अंधानुकरण केले त्यांच्या दृष्टीने हा
गांधीवाद निश्चित आहे याबद्दल दुमत नाही पण ज्यांनी गांधीवाद आत्मसात केला म्हणजे
गांधींचे अंतरंग पाहण्याचा प्रयत्न केला ते या प्रकारला कधीही गांधीवाद समजणार नाहीत.
गांधीवाद आत्मसात
करण्याचे पहिले पाऊल म्हणजे आत्मपरीक्षण त्यामधून ज्ञान प्राप्ती मधून सक्रीय
होणारा विवेक. विवेकाच्या सक्रियतेने निर्माण होणारा सयंम म्हणजे अहिंसा. अहिंसा
असो की सयंम या निखळ निष्पत्ती आहेत यामागे विवेक सक्रियता म्हणजे जागरुकता आहे.
कोणताही विवेकी माणूस इतरांचा अनादर करीत नाही यामुळे हिंसक होण्याचा प्रश्न
निर्माण होत नाहीत. विवेकी माणूस समतेचा पुरस्कार करतो यामुळे भेदभाव नाहीसा होते.
विवेकी माणूस जग काय करते यापेक्षा त्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो तसेच आकलन
करतो याला प्राधान्य देतात यामुळे अनादर असो की लायकी-पात्रता ठरवणे याचा प्रश्न
निर्माण होत नाही.
महात्मा गांधी यांचे
आचरण पहा त्यांनी कधी कोणाची लायकी काढली नाही किंवा अपमान-अनादर केला नाही अर्थात
पाहणारा अविवेकी असेल तर त्याला अपमान वाटणार आहे यामध्ये शंका नाही. गांधीजी
यांनी प्रथम स्वतः केले मग जगाला सांगितले. गांधीजी यांनी इंग्रज सरकार तसेच
स्वकीय समाज सोबत संघर्ष करीत सुधारणा केल्या त्यांनी आपला-परका असा भेद केला
नाही. गांधीजी यांनी आचरण करताना होणाऱ्या दुरगामी परिणामांचा विचार केला यामुळे
चौरीचौरा हिंसाचार नंतर समस्त आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला.
टीम अण्णा आंदोलनात
आत्मपरीक्षण असो की विवेक पासून सयंम यांचा अभाव यामुळे अहंकाराचा प्रभाव व्यापक
प्रमाणात आहे. विवेक आणि सयंम यांचा दुरान्वये संमंध नाही यामुळे सरळ धोपट लायकी
काढणे ते पात्रता ठरणे पासून इतरांचा उद्देश ठरवणे असा प्रकार केला. समस्त
करण्याला आधार काय तर अर्धवट-अपरीपूर्ण आकलन.
टीम अण्णा यांनी जो
प्रकार केला तो गांधीजी पेक्षा गोडसे यांच्या विचारांशी साधर्म्य दर्शवणारा आहे.
गोडसे यांनी गांधीजी यांची लायकी-उद्देश-पात्रता ठरवली तसेच यामुळे हत्या केली पण
गोडसे समर्थक याला गांधी वध असे संबोधतात. गोडसे समर्थकांना गोडसे देव ते दैवी
पुरुष-अवतार भासतो यामुळे ज्याप्रमाणे अवतारी महापुरुषांनी असुरांचे निर्दालन केले
तसा वध केला. सामान्य माणूस सामान्य माणसाची हत्या करतो मात्र अवतारी करतात तो वध
असतो.
गांधीवध मानतात
त्यांना गांधीजी तसेच त्यांचे विचार यांचे वावडे आहे कारण यामुळे त्यांच्या अनेक
मक्तेदारी संपुष्टात आल्या तसेच सामाजिक भेदभाव नष्ट झाला यामुळे यांची सवर्णता
असो की उच्चता नष्ट झाली. गोडसे विचार धारेची मंडळी उघड गांधी द्वेष करीत नाहीत
मात्र बहुजन समाजाला इतिहासातील अर्धवट गोष्टी सांगत गांधीजी संदर्भात द्वेष
निर्माण करीत वाटचाल करतात. एकंदरीत त्यांना गांधीवाद तसेच गांधीजी यांना नष्ट
करायचे आहे. या व्यक्ती कधीही पडद्यावर येत नाहीत मात्र बहुजन समाजाच्या
व्यक्तीच्या खांद्याचा वापर करतात.
गोडसेवादी व्यक्ती
कधीही माझे चुकले असे सहज अथवा चेष्टेने देखील समजत-म्हणत नाहीत. भारतात याविचार
धारेची एक प्रबळ संघटना असून ती सातत्याने समाजातील अहंकार तसेच घृणा, द्वेष,
तिरस्कार यांना अस्मिता आणि स्वाभिमान या गोंडस नावाखाली खतपाणी घालणे ते सिंचन
करून जोपासना करण्याचे काम करते. समाजातील विवेक तसेच शांती यांना खपत नाही
त्यांना सातत्याने समाजात हिंसाचार पेटवणे तसेच त्यावर आपली पोळी भाजणे यामध्ये
स्वारस्य आहे. फक्त हिंसाचार करताना बहुजन समाज तसेच सामान्य व्यक्तीच्या खांद्यावर
बंदूक ठेवण्यात येते म्हणजे स्वतःला नामनिराळे राहता येते. बाबरी मस्जिद प्रकरणात
काय झाले? गांधीवादाचा प्रभाव राहिला का? राजकीय पोळी भाजली तसेच भविष्यात
भाजण्याची सोय झाली. एका दगडात अनेक पक्षी.
टीम अण्णा आंदोलनात
याच संघटनेशी संलग्न असणाऱ्या संघटनच्या व्यक्तींचा व्यापक वावर तसेच एक शिलेदार
पूर्वाश्रमीचा सदस्य असणे सोबत स्वतःचे काय चुकले हे नापहता अविवेकी, असयंम,
अतिरेकी उतावळेपणा असेल किंवा स्वतःचा पुर्वानुग्रह इतरांवर लादणे असेल सोबत ‘एक
ही मारा?’ यामागील घृणा-द्वेष-तिरस्कर पासून शत्रुत्वाची भावना कोणत्या प्रवृत्तीचे
द्योतक आहेत?
वर्तमान पिढीला
गांधीवाद माहित नाही त्यामुळे टीम अण्णा तसेच स्वतः अण्णा यांचे आचरण म्हणजे
गांधीवाद असा संदेश जातो तसेच समाजातील घृणा, तिरस्कार ते अहंकार यांना खतपाणी
चालना मिळते. मी काय करतो यापेक्ष इतरांनी काय केलेच पाहिजे हे ठरवणे वर याला
नैतिकतेचा दर्जा. एकंदरीत या आंदोलनाने अनेक परिभाषा बदलत आहेत. यामागे गोडसे वादी
तसेच त्यांची भूमिका आहे किंवा नाही यापैकी एका शक्यतेचा अट्टाहास म्हणजे अज्ञान
ते मुर्खपणा आहे.
शक्यता अनेक आहेत
कारण इथे पारदर्शकतेचा व्यापक अभाव आहे. तसेच इतरांच्या कृती मागील प्रवृत्ती संदर्भात
आपण मागोवा घेतो तो शक्यता आधारित असतो याचे भान गांधीवाद द्योतक आहे मात्र भान
नसेल तर गोदासेवाद द्योतक आहे.
टीम अण्णा जनतेचे
प्रतिनिधी असल्याचा दावा करते यामुळे बहुसंख्य जनता ही अहंकारी, असंयमी, अविवेकी
असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात गोडसे वादी असल्याचे निदर्शनास येते
यासंदर्भात खातरजमा करण्यासाठी स्वतःच्या अंतरंगात उतरून स्वतःची झडती घेऊन पहा.
अहंकारी प्रवृत्ती बलात्कार ते चोरी, हिंसाचार, दहशतवाद, भ्रष्टाचार घडवते. कृती
पेक्षा मागील प्रवृत्ती पहावी म्हणजे त्यामध्ये सुधारणा करता येते. वर्तमान
समाजातील समस्त मानव निर्मित समस्या मागे मानवी अहंकार हा एकमेव कारक आहे आणि
त्याचा इलाज म्हणजे विवेक सक्रीय करणे त्यासाठी प्रथम आत्मपरीक्षण करणे. एका
शब्दात गांधीवाद आत्मसात करणे.
आपण आपल्या विवेकाला
सक्रीय करायचे की अहंकाराची गुलामी करावी हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. प्रत्येक
व्यक्ती स्वतंत्र आहे मात्र इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे म्हणजे हुकुमशाही
आहे.
उद्या लोकशाही की
हुकुमशाही?
Comments
Post a Comment