वाद-विवाद की वैचारीक देवाण-घेवाण?


शालेय जीवनात वाद-विवाद स्पर्धा घेण्यात येतात अर्थात विद्यार्थी आकलन प्रगल्भ करण्यासाठी तसेच विद्यार्थी वक्तृत्व क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास प्रदान करणे यासारखी काही उद्दिष्ट असतात परंतु हाच विद्यार्थी सामाजिक जीवनात पुढे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करीत वाद-विवाद करतो. अर्थात यामागे पालाकांच्यातील आपसातील वाद-विवादांचा संस्कार देखील आहे.
वर्तमान समाजात ज्याठिकाणी मत-विचार मांडण्यात येतात त्याठिकाणी वाद-विवाद निर्माण होतात किंवा करण्यात येतात. मत-विचार मांडणारा असो अथवा त्याला प्रतिक्रिया देणारा असो यापैकी कोणताही व्यक्ती वाद-विवाद निर्माण करू शकतो-करतो. याठिकाणी जो काही वाद-विवाद घडतो तो वैचारीक देवाण-घेवाण करणारा असतो का? या वाद-विवादात आकलन प्रगल्भ होते का? याविवाद मध्ये मुलभूत मुद्द्यांवर चर्चा घडते की आरोप-प्रत्यारोप यांच्या फैरी झाडत मुलभूत विषय-आशय यांना बगल दिली जाते का?
वर्तमान जीवनावर शाळा-पालक-पासिद्धी माध्यम व सामाजिक सांकेतिक स्थळांचा व्यापक प्रभाव आहे. या समस्त ठिकाणी होणारी चर्चा ही वाद-विवादाचे स्वरूप धारण करते मात्र यामध्ये वैचारीक देवाण-घेवाण घडते की विवाद होते? प्रसिद्धी माध्यमातील ज्या वृत्त वाहिनी आहेत त्यावरील चर्चा सत्र पहा म्हणजे विवादाचा प्रत्यय मिळणार आहे. मुलभूत मुद्दा व त्यावरील चर्चा यापेक्षा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप यांच्या फैरी झडतात तसेच वाद-विवाद करणारे जणू एखादे मैदान मारण्याच्या किंवा मारल्याच्या अविर्भावात असतात. या व्यक्तींना आपले विचार मांडणे यापेक्षा दुसऱ्यांचे विचार खोडणे किंवा त्याचे खंडन-मुंडण करणे यामध्ये अधिक स्वारस्य असते यामुळे योग्य काय यापेक्षा मीच योग्य यासाठी अट्टाहास करण्यात येतो. स्वतःची लायकी न पाहता इतरांना नालायक ठरवत स्वतः लायक असल्याचे दर्शवण्याचा प्रकार घडतो.
टीम अण्णा आंदोलन मुळे या प्रवृत्तीला खत-पाणी मिळाले हा भाग वेगळा. सामाजिक सांकेतिक स्थळावर देखील असाच काहीसा प्रकार घडतो. मुद्देसूद चर्चा करून वैचारीक देवाण-घेवाण करण्यापेक्षा सोयीस्कररीतीने चर्चेचा रोख असो की आशय-विषय बदलण्यात येतात. वर्तमान समाजात स्वतःला सत्य तसेच सर्वज्ञ समजणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. सोबत स्वतःला नैतिक-नीतिवान-स्वच्छ चारित्र्याचे स्वयं घोषित प्रमाणपत्र असणाऱ्यांची संख्या देखील तितकीच आहे. अर्थात यामध्ये दोष त्यांचा नाही तर संस्कार ज्याप्रमाणे घडले त्याप्रमाणे माणसाचे आचरण आहे. दिवसोंदिवस असा प्रकार वाढत जाणार कारण समस्त संस्कार माध्यमात जो तो स्वतःला सत्य-लायक-योग्य सिद्ध करण्याचा प्रयन्त करतो. अर्थात याला काही अपवाद आहेत.
सगळेच व्यक्ती वाद-विवाद करतात असा नियम नाही तसेच याप्रकारचे वक्तव्य करण्यास मी अज्ञानी नाही. सगळ्यांना एकाच फुटपट्टीने मोजणे अज्ञानाचे लक्षण आहे. जो अज्ञानी आहे तोच वाद-विवाद करीत स्वतःचे खरे करण्याचा प्रयन्त करतो यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तो सदैव तयार असतो. अज्ञानी स्वतःचे ज्ञान पाहताना अज्ञान दुर्लक्षित करतो मुळात त्याला आपण अज्ञानी आहोत हेच मान्य नसते. यामुळे तो आक्रमक होत जातो तसेच बेछुट, बेफाम, बेलगाम होते.
जगातील कोणत्याही क्षेत्रातील कोणताही ज्ञानी पहा तो स्वतःचे अज्ञान जाणतो यामुळे कधीही आक्रमक होत नाही तर शांतपणाने स्वतःचे मत-विचार मांडतो तसेच मुद्देसूद विचारांची देवाण-घेवाण करतो. ज्ञानी मानवाला स्वतःच्या मर्यादांचे भान असते कारण अज्ञानाची जाण असते.
आपण स्वतःचे आचरण तपासून खातरजमा करून घ्यावी. आपण विवाद करतो की विचारांची देवाण-घेवाण करतो. विवाद करतो तो तणावग्रस्त होते तेच विचारांची देवाण-घेवाण करतो तो तणावमुक्त होते कारण प्रगल्भता. आपला निर्णय आपल्या हाती आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते