भद्र की अभद्र युती?


जेष्ठ सरकार सुधारक श्री. अण्णा हजारे व सध्या सरकार सुधारक होण्याच्या मार्गावर असणारे योगी श्री.बाबा रामदेव यांनी एकत्र येत सरकार तसेच लोकशाही विरुद्ध बिगुल वाजवले. आम्ही सुरवाती पासून एकत्र आहोत फक्त एकमेकांच्या आंदोलनात हातभार अंतरावर राहणारे की ठेवणारे मित्र एकत्र येतात. काही असो मैत्री अथवा युती जुनी असो की नवी याने फारसा फरक पडत नाही.
इथे दोन्ही व्यक्तींची विचारधारा काही संदर्भात कमालीची विरुद्ध आहे पण काही बाबतीत साधर्म्य आहे. दोघे ब्रम्हचारी म्हणजे अविवाहित आहेत. ब्राम्ह्चर्याचा प्रथम गुण-कसोटी म्हणजे सयंम या दोघांच्या बोलण्यात आहे का? हा भाग वेगळा. दोन्ही व्यक्ती कायदा करण्याचा अट्टाहास करताना संविधानात्मक मार्ग पत्करण्यास तयार नाहीत. दोघांचा प्रयन्त सरकार सुधारणा करण्याचा आहे पण दोघे समाजाला एका शब्दाने प्रबोधनात्मक बोलण्यास तयार नाहीत. थोडक्यात दोघांना अर्धवट इलाज करण्याची इच्छा आहे. दोघांची इच्छा म्हणजे सरकारने मी सांगतो तेच करावे.
एक व्यक्ती म्हणतो मी गांधीवादी आहे. गांधीवादी म्हणजे अहिंसा अशी आमची बापड्यांची समजूत होती पण त्यांनी गांधीवादाची नवीन परिभाषा आम्हा समोर मांडली हा भाग वेगळा. दुसरे महाशय लोकशाही मध्ये स्वतःची सशत्र सेना निर्माण करण्याची भाषा ते प्रयन्त करतात. थोडक्यात यांना हिंसावाद तो देखील लोकशाहीत मान्य आहे तसेच तो करण्याचा इरादा देखील आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात गांधीवादी व गोडसेवादी एकत्र येत आहेत. गांधीजी अहिंसा द्योतक आहेत तेच गोडसे हिंसा द्योतक आहेत. अर्थात मी स्वतंत्र भारत संदर्भातील प्रतिक मांडत आहे.
कल्पना करा काँग्रेस आणि भाजपा युती होते. या दोन्ही पक्षात काही संदर्भात मतभेद ते काही संदर्भात एक वाक्यात आहे. दोन्ही पक्षात भ्रष्ट तसेच खुनी मंत्री-नेते आहेत तसेच या दोघांची विचारधारा परस्पर भिन्न दिशेने जाणारी आहे. अर्थात टीम अण्णाला फक्त कॉंग्रेसचा भ्रष्टाचार दिसतो हा भाग वेगळा. पण या दोन भिन्न राजकीय पक्षात जर युती घडली तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देणार? तसेच राजकारणा बाहेर राहून राजकीय नेते असो की राजकारण यावर मनसोक्त चिखल फेक करणारे पण स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य पालन न करणारे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देणार आहेत?
हजारे व बाबा एकत्र येतात तेव्हा भद्र( चांगली) युती पण तेच नेत्यांनी करता अभद्र का? नावाला अराजकीय असणारे समस्त राजकीय डावपेच करीत अराजकता निर्माण करतात तरीही भद्र! मात्र नेते अभद्र का? रजाकीय नेते व सरकार सुधारकांचे वक्तृत्व यामध्ये तफावत कोणती? दुसऱ्यांची अक्कल काढणे ते नक्कल करणे पासून नालायक ठरवणे दोघे करतात पण एक नैतिक आणि दुसरी अनैतिक. एक फसवणूक करतो मात्र तो शिष्टाचार तेच नेता करतो तो भ्रष्टाचार का?
राजकीय नेता असो की सरकार सुधारक असो यांच्या उक्ती आणि कृती यामध्ये तफावत असताना एक स्वच्छ तर दुसरा गलिच्छ का? आज जे भ्रष्टाचार संदर्भात कायद्याची मागणी करतात त्यांचा नैतिक शिष्टाचार उघडकीला येतो त्यावेळी सोयीस्कर मौन मात्र इतरांच्यावर आग पाखड का? जे परदेशातील काळ्या पैश्याच्या संदर्भात बोलतात यांच्या संस्थानात परकीय चलन अनियमितता असो की सहकाऱ्याची बोगस पदवी असो याबद्दल बोलता सरकारचे षडयंत्र मात्र यांची युती काय? तरीही भद्र मानावी की अभद्र मानावी?
उद्या यांच्या अर्धवट इलाज संदर्भात मागोवा.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते