भ्रष्टाचार की शिष्टाचार?


टीम अण्णा आंदोलनात अनेक शब्दांच्या परिभाषा संदर्भात संदिग्धता तसेच पारदर्शकतेचा अभाव जाणवतो. भ्रष्टाचार म्हणजे काय? याशब्दाची परिभाषा-व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. पण परिभाषा व्यक्तीचे एकंदरीत व्यक्तिमत्व दर्शवते. इथे टीम अण्णाला अभिप्रेत असणारी व्याख्या कोणती असा प्रश्न पडतो कारण त्यांचा जो लढा तसेच मागणी आहे ती फक्त सरकारी भ्रष्टाचार रोखणारा तसेच चौकशी ते शासन करणाऱ्या कायद्याच्या मागणी करिता आहे.
सामान्य माणूस भ्रष्टाचार करीत नाही किंवा फक्त नेते आणि सरकारी अधिकारीच भ्रष्टाचार करतात किंवा मक्तेदार आहेत असा त्याचा समज असेल तर परिभाषा म्हणजे नेता व सरकारी अधिकारी असणाऱ्या व्यक्तीने जी काही कृती केली ती भ्रष्टाचार मात्र तीच कृती सामान्य व्यक्ती अथवा टीम सदस्याने केली तर तो एक शिष्टाचार आहे.
टीम अण्णाचे रण धुरंदर शिलेदार-सेनानी ते सेनापती श्री.अरविंद केजरीवाल यांनी शासकीय सेवा सोडताना सरकार सोबत केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन केले त्यापोटी त्यांनी दंडात्मक असणारी रक्कम भरणे क्रमप्राप्त होते पण मी समाजसेवक असल्याने तसेच समाजसेवा करण्यासाठी राजीनामा दिला यामुळे मी रक्कम भरण्याचे कारण नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. शासकीय सेवेत राहून समाजसेवा करता येत नाही का? समाजाने निमंत्रण देत समाजसेवा करण्यासाठी बोलावले होते का? तुम्ही स्वतःची आवड निवडली त्याचा भुर्दंड इतरांना का?
शासकीय सेवेत असताना सामाजिक संस्थान निर्माण करून परकीय देणगी-निधी मिळत नाही यासाठी कदाचित नोकरी सोडली असेल काही असो पण एकतर कायद्याचे उल्लंघन तसेच त्याची प्रक्रिया नोकरी सोडल्या पासून सुरु असताना सरकार जाणीवपूर्वक त्रास देते असा आरडा-ओरड म्हणजे एकतर चोर वर शिरजोर तो देखील अरेरावी पणा करून. यामध्ये भ्रष्टाचार आहे की शिष्टाचार? नेते सुद्धा हाच प्रकार करतात त्यावेळी भ्रष्टाचार तर इथे शिष्टाचार आहे का?
टीम अण्णा मधील दुसऱ्या रणरागिणी श्रीमती किरण बेदी यांनी स्वतःच्या संस्थेला निधी मिळावा त्यामध्ये भर पडावी यासाठी त्यांनी इतर सामाजिक संस्था कडून अतिरिक्त पैसा घेतला. त्यांना मिळत असणाऱ्या सवलतीचा फायदा घेतला पण इतर संस्थांना अंधारात ठेवले यामुळे गैरफायदा ते फसवणूक देखील होते पण कदाचित माझ्या संस्था साठी यामुळे तो शिष्टाचार असावा. नेते त्यांच्या सामजिक ते शैक्षणिक पासून कौटुंबिक संस्था करिता सवलत मिळवतात त्यावेळी लाटणे ते भ्रष्टाचार मात्र इथे शिष्टाचार? हे काम इतर संस्थांना विश्वासात घेत करणे शक्य की अशक्य होते?
टीम अण्णाचे प्रमुख श्री.अण्णा हजारे यांनी स्वतःच्या शिलेदारांचा शिष्टाचार बाहेर येत असताना सरकार मुद्दाम त्रास देत आहेत हे सांगत भरल्या झाडाला दगड मारणे असे म्हणत होते पण जसे वास्तव बाहेर पडण्यास प्रारंभ झाला तसे त्यांनी प्रकृती साठी मौन धारण केले पण याच व्यक्तीने प्रकृती खराब असताना उपोषण ते आंदोलन केले त्यावेळी धारण केलेले मौन सोयीस्कर होते का? वास्तवाला सामोरे जाण्याचे धाडस का नव्हते? वास्तव स्वीकारण्याची तयारी नव्हती का? इथे खरे काय आणि खोटे काय?
एकंदरीत टीम अण्णाने समाजात अनेक परिभाषा मध्ये परिवर्तन केले त्यामुळे आज समाजात स्वतःचा तो शिष्टाचार तेच बाकीचे करतात तो भ्रष्टाचार असा संस्कार घडत आहे. स्वतःची चूक-दोष-त्रूटी न पाहता इतरांच्याकडे बोट दाखवत आचरण करणारा नैतिक ते स्वच्छ ठरवण्यात येतो मात्र बाकीचे अनैतिक ठरवण्यात येतात. मी साधा चोर पण बाकी दरोडेखोर आहेत त्यांना आवरा पण चोर हाच दरोडेखोर आहे आणि दरोडेखोर हाच चोर आहे.
आपण स्वतःचे अंतरंग पाहणे-परीक्षण करणे याला बगल देत लोकशाही मध्ये सुधारणा करण्याचा प्रयन्त म्हणजे वांझोटी आशा ते दिवास्वप्न आहे. दाखवणारा काही दाखवेल पण पाहणारयाने काय पहावे तसेच कोणता अर्थ घ्यावा हे जोतो ठरवणार आहे. इथे भ्रष्टाचार कोणता आणि शिष्टाचार कोणता? एकदा विचार करून पहा आणि निर्णय घ्यावा.

Comments

  1. एकंदरीत टीम अण्णाने समाजात अनेक परिभाषा मध्ये परिवर्तन केले त्यामुळे आज समाजात स्वतःचा तो शिष्टाचार तेच बाकीचे करतात तो भ्रष्टाचार असा संस्कार घडत आहे. स्वतःची चूक-दोष-त्रूटी न पाहता इतरांच्याकडे बोट दाखवत आचरण करणारा नैतिक ते स्वच्छ ठरवण्यात येतो मात्र बाकीचे अनैतिक ठरवण्यात येतात............. होत आहे ते असंच !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते