ये तो आगाज है तो सोचो अंजाम क्या होगा?


अल्पवयीन मुलांनी पैसा तो देखील सहजगत्या मिळवण्यासाठी मित्राचे अपहरण केले तसेच त्याची हत्या केली. काही व्यक्तींनी प्रसार माध्यमांना जबाबदार ठरवले तेच काहींनी पालकांचा बेजबाबदार पणा यावर प्रकाश टाकला. काही महिन्या पूर्वी अल्पवयीन मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होता त्यावेळी देखील चर्चा घडल्या-झाडल्या पण आम्ही कोणता अर्थबोध घेतला?
वर्तमान माणूस कमावण्याच्या मागे धावत सुटला आहे पण कमावण्या मधील जे गमावणे आहे ते पाहण्यास तयार नाही. अर्थात ते समजण्या-जाणवण्यासाठी जे भान-जागरुकता हवी त्याचा अभाव असल्याने याप्रकारच्या घटना घडतात तसेच त्यांची पुनरावृत्ती होते. मानवाने जे काही कमावले त्यामधील गमावण्याचा हा एक प्रारंभ-सुरुवात आहे.
वर्तमान माणसातील हिंसकता वाढत आहे. वर्तमान माणसाचा अहंकार सर्वोच्च शिखराकडे प्रवास करीत आहे. मानवाने जीवनाचे वर्गीकरण केले असून व्यावसाईक-व्यावहारिक,कौटुंबिक,व्यक्तिगत अश्या प्रकारात वर्गीकरण करून आयुष्य जगण्यास प्रारंभ केला आहे. पालकांच्या एकंदरीत आचरणाचा मुलांवर प्रभाव पडतो तसेच मुले फक्त अनुकरण करतात. आज पालकांना मुलांना देण्यासाठी भरपूर पैसा आहे पण वेळ नाही यामुळे मुले काय करतात किंवा त्यांच्या मनात काय आहे? याबद्दल पालक अनभिज्ञ आहेत. मुले पालकां पेक्षा प्रसार माध्यमाच्या संगतीत लहानाचे मोठे होतात.
प्रसार माध्यमांना त्यांच्या नैतिक जबाबदारीचे भान नाही अर्थात मुळात समाजालाच स्वतःच्या जबाबदारीचे भान नाही यामुळे समाजात जडण-घडण होणाऱ्यांना तरी त्यांच्या जबाबदारीचे भान असणार का? समाजातील प्रत्येक घटक बेजाबदार-बेलगाम थोडक्यात स्वैराचारी झाला आहे त्या समाजाचे भवितव्य काय असणार? हत्या-आत्महत्या याव्यतिरिक्त दुसरे काय घडणार?
आपण आपल्या जीवनात जे काही करतो त्यामध्ये जीवन आहे का? थोडे स्वतःचे अंतरंग तपासून पहावे कारण आज जे दुसऱ्यांच्या मुलांच्या बाबत घडत आहे तेच उद्या आपल्या मुलांच्या बाबत घडणार आहे कारण माणसातील मेंढरांचा गुणधर्म. एक माणूस दुसऱ्या माणसाचे अंधानुकरण करतो कारण जगाची वाटचाल समजतो. आज माणूस जी धावपळ करतो, स्पर्धा करतो त्यामागे अनुकरण ते जगाची वाटचाल आहे. उद्या मुलांचे आत्महत्या असो हत्या करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले तर आश्चर्य-नवल नाही.
माणूस हा विनाशाच्या दिशेने गतिमान प्रवास करीत आहे यामुळे हिंसाचार वाढत आहे. आता लहान मुले देखील याला अपवाद नाहीत. अर्थात आपण हा प्रवास थांबण्याचा प्रयत्न करून थांबणार की नाही यापेक्षा काही प्रमाणात-काही अंशी गतिरोध निर्माण करू शकतो पण त्यासाठी प्रथम स्वतःला काही वेळ द्यावा लागेल तरच मुलांना काही वेळ देता येणार आहे. प्रथम स्वतःच्या आयुष्यात डोकावले तरच मुलांच्या आयुष्यात डोकावता येणार आहे अन्यथा.........

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते