Posts

Showing posts from 2012

घातक परिवर्तन(भाग-१०)

भारतीय सामाजिक जीवनात जी काही परिवर्तन घडत आहेत त्यापैकी एक घातक परिवर्तन म्हणजे अनियंत्रित गती, वेगवान जीवन, धावपळ ग्रस्त जीवन. दुसऱ्या शब्दात जीवनातील वाढती अस्थिरता. वेग-गती त्याठिकाणी स्थिरता निर्माण होणार का? वर्तमान माणूस खूप काही मिळवण्यासाठी धावतो पण या धावण्यात जे काही गमावतो त्यामध्ये स्थिरता हा एक महत्वाचा घटक आहे. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे माणूस जी काही धावपळ करतो ती स्थिरता मिळवण्यासाठी करतो पण ही स्थिरता मिळते का? मुळात स्थिरता म्हणजे काय? स्थिरता ही व्यक्तीच्या स्वभाव परत्वे बदलणारी एक संकल्पना आहे. पत्येकाची स्थिरता संदर्भातील व्याख्या भिन्न आहे. काही व्यक्ती भविष्यात स्थिरता मिळावी यासाठी वर्तमान काळात धावपळ करण्याचा प्रयन्त तसेच प्रकार करतात मात्र त्यांना स्थिरता प्राप्त होते का? वर्तमान हा भविष्याचा पाया आहे. वर्तमान काळात असणारी स्थिरता संदर्भातील संकल्पना काळाच्या ओघात बदलत जाते दुसऱ्या शब्दात संकल्पना संदर्भात अज्ञान असल्याने मानव धावतो पण प्राप्त होत नाही. गंमत म्हणजे संकल्पना असते ती व्यक्तिगत अंतरंगात पण तिचा मागोवा असो की पूर्तता करण्याचा प्रयन्त बाह्य...

घातक परिवर्तन(भाग-९)

वर्तमान समाजात जे काही परिवर्तन घडतात त्यामध्ये पैसा हा खूप काही ते दैवत असल्याने प्रतिष्ठा असो की कर्तृत्व यांचे मापदंड ते निकष बदलणे स्वाभाविक आहे. पैसा असेल तर कर्तृत्व किंवा प्रतिष्ठा अन्यथा अपमान किंवा कर्तृत्वहीन-नालायक ठरवला जातो. तसेच बेताल-बेलगाम बोलत हिंसा-घृणा-द्वेष-तिरस्कार यांना उघड-जाहीररीत्या खतपाणी घालणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठा-सन्मान देणे असेल किंवा कर्तृत्व ठरवण्याचा प्रकार असेल तो सर्रास घडतो. थोडक्यात कर्तृत्व असो की प्रतिष्ठा यांचे मापदंड-निकष यामध्ये परिवर्तन घडत आहे. कधी काळी पैसा किंवा संपत्ती पाहून कर्तृत्व अथवा प्रतिष्ठा मापदंड-निकष होते का? कधी काळी एकंदरीत समग्र व्यक्तीमत्वाचा विचार तसेच आचार यांना पाहता तसेच त्यांचे सामाजिक कार्य असो की सामाजिक जीवनातील भूमिका-योगदान यांना अनन्य साधारण महत्व होते. किंबहुना कधी काळी किती संपत्ती यापेक्षा ती कोणत्या मार्गाने येते याला अनन्य साधारण महत्व होते त्यामुळे त्या काळात भ्रष्टाचार हा व्यभिचार समाजला जात होता मात्र वर्तमान काळात एकतर भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला तसेच माझा भ्रष्टाचार हाच फक्त शिष्टाचार असून इतरां...

घातक परिवर्तन(भाग-८)

भारतीय समाजात जी काही परिवर्तन होत आहेत त्यामधील एक घातक परिवर्तन म्हणजे धंदा. वर्तमान समाजात पैसा हा देव ते सर्वस्व पासून खूप काही आहे अशी विचारधारा निर्माण होत त्या प्रकारचा संस्कार ते संस्कृती निर्माण होणे. आज प्रत्येक क्षेत्राला बाजारू स्वरूप प्राप्त होत आहे. डॉक्टर असो की खेळाडू पासून अनेक सामाजिक-धार्मिक संस्था या सगळ्यांचे प्राथमिक ध्येय म्हणजे पैसा मिळवणे तसेच प्रसंगी त्यासाठी कोणत्याही थराला जाणे. वर्तमान समाजात मुखवट्याने वावरणारे अनेक आहेत पण त्यांचा वास्तविक चेहरा उघडा पडल्या वाचून राहत नाही. वर्तमान समाजाची अवस्था थोडक्यात सांगायची झाली तर लक्ष्मी स्वरूप अर्था मागे धावताना शारदा स्वरूप अर्थाला दुर्लक्षित करणे. शारदा स्वरूप अर्थाला दुर्लक्षित करून माणूस धावतो किंबहुना शारदा स्वरूप अर्थ(ज्ञान) दुर्लक्षित करण्यामुळेच तो धावतो आहे. ज्ञान अभावी साधन हेच ध्येय झाले. पैसा हे जीवनाचे एक साधन आहे मात्र माणूस पैसा मिळवण्यासाठी साधना करीत आहे. पैसा असेल तर खूप काही मिळते असा समज प्रचलित आहे पण पैसा फक्त तेच देतो जे बाजारात विकत मिळते. पैसा मनःशांती किंवा समाधान देऊ शकतो का...

घातक परिवर्तन(भाग-७)

मानवी स्वभाव केंद्र विवेकाकडून अहंकाराकडे प्रवास करण्यामुळे मानवी स्वभावात जे काही परिवर्तन घडत आहेत त्यामध्ये आत्मपरीक्षणाचा अभाव तसेच परपारीक्षणाचा व्यापक प्रभाव आहे. परपरीक्षण करण्यामुळे स्वतःला दुर्लक्षित करण्यात येते. सृष्टी पाहताना दृष्टी दुर्लक्षित करण्यामुळे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येते. दुसऱ्या शब्दात जखम पायाला आणि पट्टी डोक्याला असा प्रकार घडतो. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे पट्टी करणारा असो कि बंब चालवणारा, त्याला मार्गदर्शन करणारा म्हणतो कि इतरांना काही काळात नाही मी सांगतो तेच खरे व सत्य बाकी अज्ञानी किंवा स्वार्थी आहेत. दृष्टी तशी सृष्टी यासंदर्भात सगळ्यांना माहिती पण ज्ञान आहे का? माणूस दृष्टी नुसार सृष्टी पाहतो पण अज्ञाना मुळे दृष्टी हीच सृष्टी मानतो. तसेच स्वतःच्या दृष्टी नुसार सृष्टी मध्ये परिवर्तन ते बदल करण्याचा प्रयन्त करतो. प्रत्येक माणूस स्वतःच्या सोय तसेच हिशोबाने सृष्टी बदलण्याचा प्रयन्त करतो. सृष्टी मध्ये इतर व्यक्ती तसेच व्यक्ती समूह यांचा देखील समावेश असल्याने संघर्ष घडणे अटळ आहे. वर्तमान मानवाला स्वतःच्य...

घातक परिवर्तन(भाग-६)

सामाजिक पातळीला होणाऱ्या समस्त स्वाभाविक परिवर्तन मधील स्वतःची भूमिका असो कि कर्तव्य दुर्लक्षित करणे अथवा नाकारण्याचा प्रयन्त करणे म्हणजे थोडक्यात कर्तव्य तसेच जबाबदारी नाकारणे हे समाजाच्या वर्तमान तसेच भवितव्यासाठी अत्यंत घातक आहे. दुसऱ्या शब्दात खापर इतरांच्या माथी फोडणे असे म्हणता येणार आहे पण याठिकाणी थोडा फरक म्हणजे स्वतःची कर्तव्य दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न तसेच प्रकार आहे. वर्तमान समाजाची होणारी अधोगती असो कि वाढती अनैतिकता यामध्ये आपली भूमिका आहे कि नाही? अर्थात इथे सामाजिक प्रवाह बदलणे किंवा दिशा देणे, समाजसुधारणा करणे यासारख्या अपेक्षा नाहीत मात्र आपण आपल्या परीने खारीचा वाटा उचलणार आहोत कि नाही? मी काय करू शकतो, जे सगळे करतात तेच मी करतो, आपण काय करू शकतो, जे सगळ्यांचे होणार तेच माझे होणार, होणाऱ्या गोष्टी होणार त्या टाळता येणार नाहीत, याचा माझ्या जीवनाशी काय समंध, याने मला काही फरक पडत नाही किंवा झळ पोहचत नाही, इथे सवड असो कि आवड आहे कोणाला, याप्रकारची विचारधारा बाळगणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. एकतर बघ्याची भूमिका घेणारे असो कि स्वतःला कमकुव...

घातक परिवर्तन(भाग-५)

स्वातंत्र्योत्तर काळात जी काही परिवर्तन घडली त्यामधील एक घातक परिवर्तन म्हणजे इतर सुधारक ते देखील स्वतःला सुधारणेसाठी अपवाद मानणारे सुधारक. वर्तमान समाजात घराघरात कमीत कमी एक तरी सरकार सुधारक आहे. सरकारने काय व कसे करावे हे सांगण्याचा-समजावण्याचा प्रयन्त करणारा व्यक्ती घराघरात आढळणार आहे. या व्यक्ती संविधानाने दिलेल्या मार्गाचा अवलंब करतात का? रीतसर सक्रीय राजकारणात प्रवेश घेत निवडणुका लढवत राजकारण करतात कि त्यापेक्षा घरात बसून अकलेचे तारे तोडण्यात धन्यता मानतात? वर्तमान समाजात उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार ते प्रयन्त करणारे लक्षणीय प्रमाणात वाढत आहेत. स्वतः मध्ये करण्याची धमक-पात्रता नाही पण जे कोणी जे काही करतात त्यावर सहज-सरळ आक्षेप घेणे ते आरोप करण्याचा प्रकार जागोजागी घडताना आढळतो. राजकीय तज्ञ- विश्लेषक असो खेळ तज्ञ-विश्लेषक अथवा चित्रपट समीक्षिक यांचे सध्या पेव फुटले आहे. पदवी घ्या- पत्रकारिता करा आणि तज्ञ व्हा असा प्रकार सर्रास घडत आहे. इथे त तत्वाचा कि तर्काचा? याचा विचार करायचा नाही. राजकीय तज्ञ हा कधीही सक्रीय राजकारणात नसतो फक्त राजकारणाचा अभ्यास ते मागोवा घेतो य...

घातक परिवर्तन(भाग-४)

मानवी स्वभावाचे केंद्र विवेक ते अहंकार परिवर्तन करण्यामुळे परस्पर सामंजस्य अभाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. इतरांनी मला समजावून घ्यावे हि प्रत्येकाची इच्छा आहे पण आपण स्वतः इतरांना समजावून घेतो का? कि समजावून घेतले असा समज बाळगतो याचा विचार ते पुनर्विचार करून पाहावा. पती-पत्नी यांच्या मधील सामंजस्य अभावी घटस्फोट घडतो. पती-पत्नी विभक्त होतात त्याच प्रमाणे सध्या समाजात जात-प्रांत-धर्म-भाषा यानावाने सावता सुभा मांडण्याचा प्रयन्त तसेच प्रकार घडत आहे तसेच ज्याप्रमाणे भारतीय फाळणी असो कि कौटुंबिक फाळणी असो त्यादरम्यान जो हिंसाचार, जो रक्तपात घडला त्याची पुनरावृत्ती होते कारण प्रवृत्ती. प्रथम दर्शनी दहशतवादी, नक्षलवादी, प्रांत ते भाषा-धर्म-जातीयवादी, भ्रष्टाचारी या समस्त समस्या असो कि प्रवृत्ती भिन्न भासते मात्र या सगळ्यांचे स्वभाव केंद्र म्हणजे अहंकाराचे केंद्र आहे. अहंकाराचे केंद्र त्याठिकाणी स्वमतांधता, घृणा, द्वेष, तिरस्कार ते शत्रुत्व भावना येणार यामध्ये शंका नाही. तसेच कळत-नकळत इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी हुकुमशाही ते हुकुम चालवण्याचा प्रकार होणार आहे. यासाठी प्रसंगी आक...

घातक परिवर्तन(भाग ३)

मानवी स्वभावाचे केंद्र विवेकावरून अहंकाराकडे करण्याचा प्रवास भारतीय स्वातंत्र्य पूर्व काळा पासून सुरु झाला. स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच आपला तो माझा-तुझा करण्यास सुरवात झाली. या तुझ्या-माझ्याची परिणीती भारत-पाक फाळणी मध्ये झाली. काही महाभाग यासाठी काही नेत्यांना जबाबदार धरतात कारण अज्ञान तसेच अहंकार. सामाजिक वातावरण पाहता तत्कालीन नेत्यांना जे योग्य वाटले त्याप्रमाणे त्यांनी आचरण केले. मात्र या सगळ्यामागे माझे-तुझे असा भेदभाव करणारा अहंकार होता याकडे किती अभ्यासकांनी तसेच विश्लेषकांनी लक्ष दिले? इथे परिवर्तन तसेच अहंकार दुर्लक्षित झाला. भारत-पाक फाळणी हि देशाची फाळणी होती नंतर भाषिक राज्य असो कि कौटुंबिक पातळीला एकत्र ते विभक्त कुटुंब पद्धतीचा उगम ते संस्कार पासून संस्कृतीचा उदय झाला. वर्तमान समाजात भाषिक अस्मिता असो कि स्वाभिमान या गोंडस नावाखाली अहंकार झाकला जातो. भुतकाळापेक्षा वर्तमान काळात प्रांतीय असो कि भाषिक संघर्ष अधिक प्रखर तसेच हिंसक होताना आढळतो यामागे अहंकार केंद्र असणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढणे म्हणा अथवा विवेकाचा अभाव असणाऱ्यांची संख्या वाढणे म्हणा अधिक आहे...

घातक परिवर्तन (भाग २)

वर्तमान समाजात स्वभाव केंद्राचे परिवर्तन प्रत्यय घ्यायचा असेल तर समाजाच्या एका वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे भ्रष्ट नेते असो कि फक्त शासकीय भ्रष्टाचार विरोधात कायद्याची मागणी करणारे टीम आंदोलन असो दोघे समाजाचे प्रतिनिधी आहेत. समाजाचा एक वर्ग भ्रष्टाचार विरोधी लढतो तेच दुसरा वर्ग भ्रष्टाचार करतो प्रथम दर्शनी या दोघात भिन्नता आहे मात्र भिन्नता मागील एकता पाहता स्वाभाविक पातळीला दोघांच्यात समानता ते एकता आहे. या दोन्ही वर्गाचा स्वभाव केंद्र असणारा अहंकार तसेच त्याचा होणारा संस्कार हा चिंताजनक विषय असून तो वर्तमान तसेच भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरणार आहे. टीम अण्णाला समाजकारणाचा संदर्भ तसेच मुखवटा आहे यासोबत नैतिकता, स्वच्छता तसेच गांधीवादाची किनार असल्याने त्याचा सामाजिक मनावर सखोल परिणाम तसेच संस्कार होणार आहे. विशेषतः या आंदोलनात अनेक तरुणांचा सहभाग असून ते आमच्या भावी समाजाचे-समाजकारण ते राजकारणाचे खांदेकरी होणार आहेत. ते पाहता परिभाषा ते मापदंड परिवर्तन अत्यंत घातक ठरणार आहे. टीम अण्णाने अनेक परिभाषा ते मापदंड परिवर्तन केले अर्थात तो त्यांचा उद्देश होता कि नाही हा वादग्र...

घातक परिवर्तन

परिवर्तन म्हणजे निसर्ग स्वभाव आहे. निसर्गातील प्रत्येक घटकात प्रत्येक क्षणात परिवर्तन घडते. मानव या निसर्ग चक्रातील एक घटक असल्याने मानव असो कि मानवी स्वभाव परिवर्तनाला अपवाद नाही पण ते सगळ्यांना समजते-जाणवते असा नियम नाही. काही व्यक्ती प्रसंगी आकलन कक्षेत न येणाऱ्या परिवर्तनाला नाकारण्याचा प्रयन्त करतात अर्थात हा त्यांच्या जडण-घडण प्रक्रियेचा एक भाग आहे. मानवी स्वभावातील परिवर्तनाचा मागोवा घेण्यासाठी भूतकाळ सापेक्ष विचार करणे क्रमप्राप्त आहे. सापेक्षता विना अभ्यास करता येणार नाही. सध्या सोप्या शब्दात भूतकाळ व वर्तमान काळ दरम्यान तुलना करावी लागेल त्याविना आकलन होणार नाही. यापैकी भूतकाळ प्रथम घडला यामुळे त्याला सापेक्ष मानत- त्यापारत्वे वर्तमानाचा अभ्यास करावा लागेल. सध्या भारतीय सामाजिक वाढता भ्रष्टाचार असो कि हिंसाचार, बलात्कार, जातीयवाद सारख्या समस्या वाढत आहेत. एका दृष्टीने प्रत्येक समस्या भिन्न आहे मात्र भिन्नता मागील एकता पाहता मानवातील अहंकार वाढत असून विवेक निष्क्रीय होत आहे. मानवी स्वभावाचे जे केंद्र आहे ते विवेकावरून अहंकाराकडे प्रवास करीत आहे. वर्तमान समाजात स्वतःचे...

दुसरी क्रांती?

टीम अण्णा आंदोलनास काही उत्साही मानवांनी त्याची तुलना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती सोबत केली तसेच तत्सम उपमा देण्याच्या प्रयन्त ते प्रकार घडला. कोणत्या व्यक्तीने कोणाची तुलना कोणा सोबत करावी यासाठी काही नियम-नियमावली नाही कारण लोकशाही असून प्रत्येकाला अभिव्यक्ती तसेच कृती स्वातंत्र्य आहे. माझ्या दृष्टीने संपूर्ण क्रांती सोबत तुलना म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भटाची तट्टीन किंवा कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली या मराठी म्हणी नुसार प्रकार घडणार आहे. संपूर्ण क्रांती मध्ये समाज सुधारणा करून क्रांती होती इथे सरकार सुधारणा करून क्रांती? संपूर्ण क्रांती मध्ये प्रथम स्वतः मध्ये सुधारणा करून समाज ते सरकार-अधिकारी सुधारणा अपेक्षित होती. टीम समाजाला निष्पाप, निरागस मानत असावी यामुळे समाजाला चकार शब्दाने आवाहन न करता फक्त सरकार सुधारणा ती देखील कायदा करून अपेक्षित आहे. संपूर्ण क्रांती मध्ये प्रबोधनातून समाज तसेच देश सुधारणा करण्याचा प्रयत्न होता तेच टीमला कायदा करून फक्त सरकार सुधारणा अपेक्षित आहे. संपूर्ण क्रांती या नावात सगळे आहे तेच टीमच्या मुळात नावात ...

लोकशाही की हुकुमशाही?

भारतात घटनात्मक लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे पण ज्ञान किती व्यक्तींना आहे हा मात्र संशोधनाचा एक विषय आहे. वर्तमान भारतीय लोकशाहीची दुरवस्था असो की अनर्थ असो तो पाहता असा विचार मनात डोकावणे स्वाभाविक आहे. जर टीम अण्णा आंदोलन पहिले किंवा जनआंदोलन मानले तर हा विषय गहन व गंभीर होते. लोकशाही म्हणजे तुम्ही तुमचे मत मांडा त्याचे विश्लेषण करा तसेच इतरांचे मत देखील विचारात घेत त्याचे विश्लेषण करा. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र आहे. आपण आपला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावतो त्याप्रमाणे इतरांना देखील संधी प्रदान करणे. लोकशाहीत मी स्वच्छ व नैतिक तसेच तू भ्रष्ट व अनैतिक असल्याचे माझे मत असून तुला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही असा प्रकार लोकशाही द्योतक आहे का? न्यायालय देखील द्विपक्षीय युक्तिवाद ऐकते थोडक्यात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा तसेच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. टीम अण्णाला कदाचित लोकशाही मान्य नसावी अथवा मी करेल-सांगेल तीच पूर्व म्हणजे लोकशाही वाटत असावी यामुळे त्यांनी ज्या लोकपाल साठी आग्रह धरला त्याला अमर्याद अधिकार तसेच अनिर्बंधता प्रदान कर...

गांधीवादी की गोडसेवादी?

टीम अण्णा आंदोलनास गांधीवादाची किनार-झालर ते झुल आहे अर्थात ते कोणी केले तो व्यक्ती ज्ञात की अज्ञात याने फारसा फरक पडणार नाही. गांधीवाद म्हणजे नेमके काय? उपोषण करणे, खादीचे कपडे घालणे, गांधी टोपी वापरणे ते मौन धारण करणे म्हणजे गांधीवाद आहे का? अर्थात ज्यांनी गांधीजीचे आचरण बाहेरून पकडले, अंधानुकरण केले त्यांच्या दृष्टीने हा गांधीवाद निश्चित आहे याबद्दल दुमत नाही पण ज्यांनी गांधीवाद आत्मसात केला म्हणजे गांधींचे अंतरंग पाहण्याचा प्रयत्न केला ते या प्रकारला कधीही गांधीवाद समजणार नाहीत. गांधीवाद आत्मसात करण्याचे पहिले पाऊल म्हणजे आत्मपरीक्षण त्यामधून ज्ञान प्राप्ती मधून सक्रीय होणारा विवेक. विवेकाच्या सक्रियतेने निर्माण होणारा सयंम म्हणजे अहिंसा. अहिंसा असो की सयंम या निखळ निष्पत्ती आहेत यामागे विवेक सक्रियता म्हणजे जागरुकता आहे. कोणताही विवेकी माणूस इतरांचा अनादर करीत नाही यामुळे हिंसक होण्याचा प्रश्न निर्माण होत नाहीत. विवेकी माणूस समतेचा पुरस्कार करतो यामुळे भेदभाव नाहीसा होते. विवेकी माणूस जग काय करते यापेक्षा त्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो तसेच आकलन करतो याला प्राधान्य देतात ...

भ्रष्टाचार की शिष्टाचार?

टीम अण्णा आंदोलनात अनेक शब्दांच्या परिभाषा संदर्भात संदिग्धता तसेच पारदर्शकतेचा अभाव जाणवतो. भ्रष्टाचार म्हणजे काय? याशब्दाची परिभाषा-व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. पण परिभाषा व्यक्तीचे एकंदरीत व्यक्तिमत्व दर्शवते. इथे टीम अण्णाला अभिप्रेत असणारी व्याख्या कोणती असा प्रश्न पडतो कारण त्यांचा जो लढा तसेच मागणी आहे ती फक्त सरकारी भ्रष्टाचार रोखणारा तसेच चौकशी ते शासन करणाऱ्या कायद्याच्या मागणी करिता आहे. सामान्य माणूस भ्रष्टाचार करीत नाही किंवा फक्त नेते आणि सरकारी अधिकारीच भ्रष्टाचार करतात किंवा मक्तेदार आहेत असा त्याचा समज असेल तर परिभाषा म्हणजे नेता व सरकारी अधिकारी असणाऱ्या व्यक्तीने जी काही कृती केली ती भ्रष्टाचार मात्र तीच कृती सामान्य व्यक्ती अथवा टीम सदस्याने केली तर तो एक शिष्टाचार आहे. टीम अण्णाचे रण धुरंदर शिलेदार-सेनानी ते सेनापती श्री.अरविंद केजरीवाल यांनी शासकीय सेवा सोडताना सरकार सोबत केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन केले त्यापोटी त्यांनी दंडात्मक असणारी रक्कम भरणे क्रमप्राप्त होते पण मी समाजसेवक असल्याने तसेच समाजसेवा करण्यासाठी राजीनामा दिला यामुळे मी रक्कम भरण्याचे कारण...