Posts

Showing posts from January, 2012

या व्यसनांचे काय?

व्यसन म्हणताच दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा नजरे समोर येतात. अर्थात काही अमली पदार्थ ते औषध यांचे देखील व्यसन काही व्यक्तींना माहित आहेत. मात्र अनेक व्यसना पासून समाज अनभिज्ञ देखील आहे. साधारणतः नशेची अनुभूती म्हणजे व्यसन करणे असे समजण्यात येते. व्यसन म्हणजे नेमके काय? तर एखादी गोष्ट वारंवार करण्याची सवय तसेच या सवयी सोबत असणारी सशर्तता. आपण एखादी गोष्ट करतोच त्यावेळी बरे वाटते अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट करण्याविना बरे वाटत नाही अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखाद्या सवयीच्या आहारी जाणे म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट केल्याविना करमत नाही, जमत नाही, ताजे-तवाने वा तरतरीत पणा जाणवत नाही म्हणजे व्यसन आहे. आपल्याला असणारे व्यसन आपणास कळते किंवा आपण त्याला व्यसन मानतो असा नियम नाही. आपण आपल्या आचरणाचा अभ्यास करून पाहावा म्हणजे सवय तसेच सशर्तता लक्षात येणार आहे. सध्या समाजात मनोरंजन, बाहेरचे खाद्य पदार्थ खाने, सामाजिक सांकेतिक स्थळांना भेट देणे सारखी काही व्यसन वाढत आहेत. सोबत काम करणे, पैसा मिळवणे, प्रतिष्ठा मिळवणे, पद मिळवणे- सत्ता मिळवणे यासारखी व्यसनाधीनता वाढत आहे. मनोरंजनाचे...

भिन्नता मागील एकता

दहशदवाद, नक्षलवाद, हिंसाचार हे समस्त प्राथमिक दृष्टीने भिन्न आहेत. तसेच काही व्यक्ती व्यक्ती यांचा भिन्नता आधारित मागोवा घेतात मात्र सोईस्कररीत्या एकतेचा आधार देखील घेतात. दहशदवाद तसेच नक्षलवाद भिन्न मात्र समस्त दहशदवादी व नक्षलवादी एक समजण्यात येतात. अर्थात ज्याचा त्याचा दृष्टीकोन तसे आकलन. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. आपण आपल्या तसेच इतरांच्या स्वतंत्रतेचा आदर करावा. अभ्यास करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. एक भिन्नता प्रधान तर दुसरी एकता प्रधान. सामान्यतः भिन्नता प्रधान पद्धतीचा व्यापक प्रमाणात अवलंब होतो. दहशतवाद, नक्षलवाद, हिंसाचार या सगळ्यात असणारी भिन्नता अनेकांना माहित आहे मात्र एकता किती जणांना माहित आहे? दहशतवाद, नक्षलवाद, हिंसाचार या सगळ्यांचा निर्माता माणूस आहे. या सगळ्या मानवाच्या प्रतिक्रिया आहेत( काही व्यक्ती क्रिया समजतात). या सगळ्यात मानवी स्वभावाची निर्णायक भूमिका आहे. या सगळ्यात मानव स्वतःच्या मुलभूत मर्यादा उल्लंघन करतो. या सगळ्यात हुकुमशाही आहे. या सगळ्यात हिंसा आहे. शोधणार तितक्या एकता मिळणार आहेत. काही व्यक्ती हिंसा व दहशतवाद भिन्न मानतात कारण हिंसेची ...

भाव-नांना भाव का?

कोणीही कुठेही हल्ला करणे ते देखील भावना भडकल्याने, क्रियेला एक प्रतिक्रिया असा प्रकार प्रथम घडतो आहे का? महाराष्ट्रात ही नवीन संस्कृती उदयाला आलेली आहे. कोणताही समूह उठतो व भावना भडकल्या, क्रियेला प्रतिक्रिया असे म्हणत राजरोस धुडगुस घातला जातो. काही व्यक्ती या कृतीला योग्य समजतात तेच काही व्यक्ती अयोग्य समजतात. ज्याचा जसा संस्कार तसा दृष्टीकोन व आकलन त्यापारत्वे आचरण. इथे प्रश्न आहे तो मुळात भावना का भडकतात? एकी कडे आम्ही भावना म्हणतो म्हणजे भाव-ना तरीही त्या भडकतात म्हणजे भाव आहे. भडकणे हा भाव झाला. एकतर भाव आहे म्हणून भडकणे असताना भाव-ना भडकल्या कितपत योग्य आहे? मुळात आम्हाला भावना मधील भाव संदर्भात माहिती आहे का? ना भाव कळतो ना भावना कळतात तरीही भडकतात कारण अज्ञान. भाव म्हणजे मुल्यांकन तसेच प्रत्येक व्यक्ती नुसार हे मुल्यांकन बदलते. अर्थात यासाठी व्यक्तिगत स्वभावाचे ज्ञान तसेच भान-अभ्यास पाहिजे पण त्यासाठी आम्हाला सवड आहे कुठे. मुळात आम्हाला स्वतः मध्ये स्वारस्य आहे का? जो पर्यंत स्वभाव तसेच ‘स्व’भाव यांचे ज्ञान होत नाही तो पर्यंत भाव तसेच भावना यांचे वास्तविक आकलन होत नाही. ...

माझे ते सर्वश्रेष्ठ

भूतलावर अनेक मानवी समाज-संस्कृती, धर्म आहेत. प्रत्येक मानव असो की समाज-संस्कृती अथवा धर्म यामध्ये काही भिन्नता आहेत यासंदर्भात कोणाचेही दुमत नसावे मात्र यासामस्त भिन्नता मागे एकता देखील आहे. अर्थात काही व्यक्ती एकता नाकारण्याची शक्यता आहे कारण एकता सहज निदर्शनास येत नाही. समस्त भिन्नता मागील एक प्रमुख एकता म्हणजे माझा समाज-संस्कृती असो की धर्म तो सर्वश्रेष्ठ आहे असा समज ते घोषणा देणारी माणसे. याठिकाणी जे श्रेष्ठत्व बहाल करण्यात येते ते फक्त समाज-संस्कृती ते धर्म यांच्या पुरते मर्यादित नसून भाषा-प्रांत-राज्य-देश थोडक्यात जे घटक मी व माझ्याशी निगडीत ते समस्त घटक सर्वश्रेष्ठ आहेत अशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात अभिव्यक्ती देणे हा मानवाचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. माणूस कोणत्याही समाजाचा, जाती-धर्माचा असो की भाषा- प्रांताचा असो तो माझे ते श्रेष्ठ समजतो. सामान्यतः माझ्या निगडीत ते सर्वश्रेष्ठ अशी घोषणा करणे म्हणजे अस्मिता-स्वाभिमान समजण्यात येतो. अनेक मानवांना अस्मिता व स्वाभिमान या शब्दांचा साधा मतितार्थ-भावार्थ माहित नसतो पण हे प्राणाहून अधिक प्रिय असतात. वास्तवात अस्मिता व स्वा...

जीवन एक मुक्त विद्यापीठ

जीवन म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीच्या स्वभावानुरूप आहे. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन, आकलन, संस्कार ते संकल्पना भिन्न आहेत. प्रत्येकाला स्वतःची दृष्टी आहे त्याप्रमाणे सृष्टी भासते. माझ्या दृष्टीने जीवन म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे कारण मी एक विद्यार्थी आहे. मला माझ्या दृष्टीकोन, आकलन, संस्कार तसेच संकल्पना यांच्या मर्यादा ज्ञात आहेत. मला माझ्यातील अपूर्णत्वाची जाणीव तसेच भान आहे. मला माझ्या ज्ञानाची तसेच अज्ञानाची कल्पना-जाणीव आहे. सामान्यतः ज्ञान मिळाले म्हणजे अज्ञान नाहीसे झाले असे समजण्यात येते कारण ज्ञान व अज्ञान यांना विरुद्धार्थी शब्द समजण्यात येते. मात्र विरुद्धता त्याठिकाणी परस्पर पूरकता आहे. ज्ञाना विना अज्ञान तसेच अज्ञान विना ज्ञान यांचे आकलन होत नाही. ज्ञानाला प्रकाशाची उपमा देण्यात येते तसेच अज्ञानाला अंधाराची उपमा देण्यात येते. प्रकाश आला म्हणजे अंधार नाहीसा होतो का? अंधार कधीही नाहीसा होत नाही तर प्रकाशामुळे त्याचे अस्तित्व जाणवत नाही तसेच प्रकाश किरण पोहचतात त्याठीकाणाचा अंधार जाणवत नाही. प्रकाशामुळे अंधार अप्रत्यक्ष स्वरूप धारण करतो तसेच प्रकाश नाहीसा ह...

पेरावे तसे उगवते

पेरावे तसे उगवते ही एक म्हण तसेच एक निसर्ग नियम देखील आहे. कोणत्याही मानवाचे दैनंदिन आचरण पाहता मनात विचार येतो. मानवाला यासंदर्भात माहिती असून याची जाणीव नसावी अन्यथा मानवाने आचरण करताना दक्षता घेतली असती. मानवाचे दैनंदिन आचरण पहा त्यामध्ये हिंसाचार, दुसऱ्यांचा अपमान करणे, दुसऱ्यांना त्रास देणे, द्वेष, घृणा, तिरस्कार करणे यासारखे प्रकार सर्रास घडतात. अर्थात याप्रकारचे आचरण करण्यामागे अज्ञान आहे. अज्ञानी लोकांना जाणीव होण्यासाठी एक अनुभव मांडतो आहे. हा अनुभव म्हणजे कल्पनाविलास अथवा कथा नाही तर वास्तव आहे. एकाच घरात नांदणाऱ्या दोन जावा-जावा. यादोघी समवयस्क आहेत. यापैकी ज्या मानाने मोठ्या आहेत त्यांनी फक्त अधिकाराचा वापर करीत इतर जावांकडून काम करून घेतले तसेच विभक्त होण्यासाठी आकांड-तांडव केले. स्वतःच्या सासू- सासऱ्यांची कधी देखभाल केली नाही. अगदी सासू तीन वर्ष अंथरुणात पडून होत्या तरी देखील पहिले नाही. दोन नंबरच्या जाऊ बाईंनी मात्र सासू-सासऱ्यांची सेवा केली व स्वतःच्या समस्त कर्तव्यांची पूर्तता केली. आज या जावा-जावांना सुना तसेच जावई आहेत. थोरल्या जाऊ बाईंना त्याच्या स्वतःच्या सून बाईंच...

स्वभाव सापेक्षता

सापेक्षता विज्ञानातील एक सिद्धांत, एक संकल्पना आहे. कोणत्याही घटकाची अस्थिरता समजण्या-जाणवण्यासाठी कोणत्याही एका घटकाला स्थिर मानने-समजणे. ब्रम्हांडातील प्रत्येक घटक अस्थिर आहे. मानव या अस्थिरतेला अपवाद नाही तसेच मानवी स्वभाव देखील अपवाद नाही. मात्र इथे खरी गंमत आहे. मानवाला स्वतःच्या स्वभावाची अस्थिरता तसेच सापेक्षता संदर्भात ज्ञान नाही. आम्ही जे काही पाहतो, ऐकतो त्यामधून जे काही समजतो-आकलन करतो त्याला सत्य वा आधार मानत आम्ही वाटचाल करतो. तसेच आम्ही स्वतःचे आकलन केंद्र मानत यावरून इतरांचे परीक्षण करून निर्णय घेतो. वास्तवात आमचे आकलन आमच्या आचरणाचे केंद्र आहे मात्र प्रत्येकाला स्वतःचे आकलन आहे. आम्ही आमच्या आकलन प्रमाणे योग्य-अयोग्य ठरवतो व याचा आधार घेत इतरांचे आचरण तपासण्याचा प्रयन्त करतो. गंमत म्हणजे आमची योग्य-अयोग्य ही संकल्पना स्थिर नसते तर बदलत असते. तसेच प्रत्येक व्यक्तीची जडण-घडण होते त्याप्रमाणात त्याची योग्य-अयोग्य ही संकल्पना निर्माण होते तसेच बदलत राहते. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे आकलन केंद्र मानत आचरण करताना स्वतःच्या संकल्पनांना प्राधान्य देतो. प्रत्येक व्यक्तीची जडण-घडण भ...

देशप्रेमी की द्रोही?

निवडणुकांच्या तोंडावर नेता असो की सामान्य माणूस यांना अफजल गुरु व अजमल कसाब यांची हमखास आठवण होते किंवा करून देण्यात येते. या दोघांना न्यायालयाने देशद्रोही कारवाई करण्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांचा देशद्रोह सगळ्यांना समजतो तसेच माहित आहे मात्र अनेक सामान्य व्यक्ती व राजकीय नेते यांचा देशद्रोह दुर्लक्षित होतो किंवा या संदर्भात ज्ञान नाही. देशाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात कोणत्याही कारणास्तव नुकसान-हानी करणे म्हणजे देशद्रोह आहे. अर्थात नुकसान करणारा व्यक्ती कोणत्याही देशाचा नागरीक असो अथवा कोणत्याही धर्म वा पंथाचा असो त्याने देशाचे नुकसान करताच तो देशद्रोही आहे. आपल्या देशात अनेक जात-पात, धर्म, संस्कृती, भाषा, प्रांत रक्षक आहेत. या व्यक्ती अस्मिता व स्वाभिमानाचा प्रश्न या नावाखाली राजरोस धुमाकूळ घालत खाजगी तसेच सार्वजनिक, शासकीय मालमत्तेचे मनसोक्त नुकसान करतात. भावना भडकल्या, एक प्रतिक्रिया होती, जश्याला तसे उत्तर दिले, या प्रकारचे वक्तव्य करीत कृतीचे समर्थन करण्यात येते. या वर्गवारीत मोडणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात देशाचे नुकसान करतात. अर्थात ...

तरच प्रजासत्ताक होईल

दिनांक २६ जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज प्रजासत्ताक दिन आहे. अनेक व्यक्ती एकमेकांना शुभेच्छा प्रदान करतील, झेंडा वंदन करतील, काही जण सुट्टीचा आनंद घेतील. पण क्षणभर चिंतन करून आपण वास्तवात प्रजासत्ताक आहोत का? याची खातरजमा करतील का? काही व्यक्ती राजकारण व नेते यांच्याकडे बोट दाखवत वर्तमान प्रजासत्ताक दुरवस्थेला जबाबदार ठरवण्याचा प्रयन्त करतील. अर्थात या व्यक्ती मिडीयाच्या असणार कारण काही झाले तरी सरकार व राजकारण यांना जबाबदार ठरवण्याची त्यांना सवय जडत आहे. मीडियाचा सामाजिक मनावर प्रभाव आहे. देशातील वर्तमान परिस्थिती प्रजासत्ताकला तारक की मारक हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. कोणताही वर्तमान म्हणजे भूतकाळाची एक निष्पत्ती आहे तसेच भविष्याचा पाया आहे. भूतकाळ घडून गेलेला आहे तसेच भविष्य घडणार आहे या दरम्यान असणाऱ्या वर्तमानात आम्हाला प्रयन्त करता येणार आहे. आम्हाला म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रयन्त करावा लागणार आहे. अर्थात या प्रयन्ता मध्ये कोणी सिंहाचा वाटा घ्यावा अथवा खारीचा वाटा घ्यावा. कमीत कमी आपण आपल्या घरात लोकशाही नांदे...

बैल गेला नी झोपा केला

एकापाठोपाठ उघडकीला आलेले भ्रष्टाचार प्रकरण पाहता बैल गेला नी झोपा केला या म्हणीचा प्रत्यय मिळतो. टू जी घोटाळा असो की राष्ट्रकुल स्पर्धा मधील घोटाळा असो हे घडले नंतर कॅगचा रिपोर्ट आला त्यावेळी मिडिया तसेच विरोधी पक्षाला जाग आली. घोटाळा घडत असताना किंवा तो घडल्या-घडल्या मिडिया वा विरोधी पक्षाला जाग आली नाही. माझ्या दृष्टीने सरकार सोबत मिडिया व विरोधी पक्ष देखील या घोटाळ्यास तितक्याच व्यापक प्रमाणात जबाबदार आहेत. मिडिया व विरोधी पक्ष यांनी कर्तव्यात कसूर केला आहे. मात्र यासंदर्भात कोणीही वाच्यता करीत नाही. लोकशाही प्रणालीत विरोधीपक्ष हा सरकारचा अविभाज्य घटक आहे. सरकारी कामावर देखरेख करणे तसेच सरकार कडून काम करून घेणे हे विरोधी पक्षाचे काम-कर्तव्य आहे. सरकारी ध्येय-धोरण यामधील त्रुटींचा अभ्यास करणे, मागोवा घेणे हे विरोधी पक्षाचे काम आहे अर्थात विरोधा साठी विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम नाही. मात्र वर्तमान विरोधी पक्ष स्वतःचे कर्तव्य व काम दुर्लक्षित करून निखळ विरोधासाठी विरोध करीत असल्याचे अनेकदा प्रकर्षाने जाणवते. मिडिया म्हणजे लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. मिडीयाने सातत्य...

धर्म व विज्ञान

मानवी समाजात धर्म व विज्ञान यांना भिन्न समजण्यात येते तसेच या दोन्हीत तुलना करण्यात येते. मानव धर्म व विज्ञान यांच्यात तुलना करताना ज्याला धर्म व विज्ञान समजतो त्या नुसार तुलना करतो. मानव वास्तवात धर्म व विज्ञान यात तुलना करतो असा नियम नाही. वास्तवात निसर्गातील कोणत्याही दोन घटकात तुलना करता येत नाही मात्र मानव आकलन व अभिव्यक्ती सुलभ करण्यासाठी तत्सम प्रकार करतो. थोडक्यात मानव व्यक्तिगत दृष्टीकोन, आकलन यांच्या क्षमता नुसार तुलनात्मक अभ्यास करतो मात्र ना दृष्टीकोन परिपूर्ण ना आकलन परिपूर्ण. अर्थात याठिकाणी तुलना करण्याचे निकष स्वतःच्या आकलन क्षमता नुसार ठरवण्यात येतात तसेच या निकषावर त्या व्यक्तीच्या स्वभाव सापेक्षतेचा प्रभाव असतो. सापेक्षता विना तुलनात्मक अभ्यास करता येत नाही. धर्म व विज्ञान यांचा तुलनात्मक अभ्यास करताना सर्वात प्रथम या दोन्हीच्या दृष्टीचा अभ्यास करावा लागतो कारण दृष्टी नुसार आकलन बदलते. धर्म दृष्टी व्यक्तिगत अंतरंगाकडे प्रवास करते तेच विज्ञान दृष्टी इतरांच्या अंतरंगाकडे प्रवास करते. दुसऱ्या शब्दात धर्म म्हणजे स्वतःच्या स्वभाव-गुणधर्मांचा मागोवा-अभ्यास आहे. तेच ...

आधुनिक गुलामगिरी

कधी काळी मानवी समाजात मानवीय गुलामगिरीची पद्धत अस्तित्वा मध्ये होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली असे समजण्यात येते मात्र निसर्गात नष्ट होण्यापेक्षा स्वरूप परिवर्तन घडते मात्र मानव भिन्न स्वरूपांना भिन्न अस्तित्व मानतो. वर्तमान समाजात गुलामगिरी अस्तीत्वा मध्ये आहे फक्त तिच्या स्वरुपात तसेच त्याच्याकडे पाहणाऱ्या दृष्टीकोनात बदल झाला आहे यामुळे त्याला गुलामगिरी समजण्यात येत नाही. वर्तमान समाजात भौतिक घटकांची मालकी समजण्यात येते, ती वास्तवात एक प्रकारची गुलामगिरी आहे. प्राचीन काळात गुलाम विकत घेण्यात येत मात्र वर्तमान काळात पैसा मोजून गुलामगिरी स्वीकारली जात आहे. पूर्वी गुलाम मालकाचे रक्षण करीत मात्र वर्तमानात मालक(गुलाम) भौतिक घटकांचे रक्षण करतात. सामान्यतः मालकी व गुलामी यांना भिन्न व विरुद्ध समजण्यात येते मात्र या भिन्नता मागे एकता आहे तसेच विरुद्धता मागे परस्पर पूरकता व सापेक्षता आहे. वास्तवात मालकी व गुलामी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही व्यक्तीला एका वेळेस एका नाण्याची एकच बाजू पाहता येते तसेच दुसरी बाजू पाहण्यासाठी नाणे उलटे करून पहावे लागते. आपण नाण्याची जी बाजू पाहतो ते ...

बेरोजगारी मागील काही दाहक वास्तव

बेरोजगारी ही काळासोबत निर्माण झालेली एक सामाजिक समस्या आहे. बेरोजगारी ही जवळपास प्रत्येक देशाला भेडसावणारी समस्या आहे. एकीकडे लोकासंखेचा डोलारा वाढत आहे त्याप्रमाणात रोजगार निर्माण होत नाहीत याबद्दल दुमत नाही मात्र जे रोजगार उपलब्ध आहेत त्याठिकाणी काम करण्याची बेरोजगारांची मानसिकता नाही या वास्तवाला नाकारता येणार नाही. एकीकडे रोजगार मिळत नाही अशी तक्रार करणारे अनेक आहेत मात्र कामगार मिळत नाही अशी तक्रार करणारे देखील तितक्याच प्रमाणात आहेत. माझ्या मते रोजगार मिळत नाही यापेक्षा मला अपेक्षित असणारा रोजगार मिळत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बेरोजगारी मध्ये अपेक्षेची भूमिका निर्णायक आहे. कोणताही व्यक्ती रोजगारी की बेरोजगार यामध्ये त्या व्यक्तीची अपेक्षा निर्णायक आहे. अर्थात प्रत्येक व्यक्ती योग्य व वाजवी अपेक्षा बाळगतो मात्र त्याच्या व्यक्तिगत दृष्टी व आकलन यांच्या अनुसार जे योग्य व वाजवी आहे त्याच अपेक्षा बाळगतो याबद्दल दुमत नाही. अपेक्षा त्या ठिकाणी अपेक्षाभंग तसेच योग्य त्याठिकाणी अयोग्य व वाजवी त्याठिकाणी अवाजवी देखील आहे याबद्दल मानवाला ना ज्ञान, ना भान, ना जान. अपेक्षा ...

परावलंबी सुख-दुखः

माणूस आयुष्यभर सुख शोधण्याचा प्रयन्त करतो मात्र ते त्याला मिळते का? या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती परत्वे बदलते कारण सुखाची संकल्पना-परिभाषा-व्याख्या व्यक्ती प्रमाणे बदलते. माणूस सुख शोधतो म्हणजे वास्तवात तो अंतरंगातील संकल्पनेचा शोध घेतो मात्र यासंदर्भात त्याला कल्पना वा माहिती नसते यामुळे याबद्दल ज्ञान असणे फार दूरची गोष्ट आहे. सामान्यतः माणूस स्वतःचे सुख-दुखः ठरवताना इतरांसोबत स्वतःची तुलना करून निर्णय घेतो कारण स्वभाव व संस्कार. सामान्य माणूस स्वतः स्वतःचे सुख-दुखः ठरवतो तसेच इतरांचे देखील सुख-दुखः ठरवण्याचा प्रयन्त करतो. माणूस स्वतःची सुखाची व्याख्या दुसऱ्यावर लादतो. एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने स्वतःच्या मालकीचे चारचाकी वाहन दारात असणे म्हणजे सुख त्याच्या दृष्टीने ज्यांच्या दारात चार चाकी तो सुखीच आहे. माझ्या दारात चार चाकी नाही तर मी दुखीः तसेच ज्यांच्या दारात चार चाकी नाही ते सगळे दुखीः आहेत. कोणत्याही सामान्य माणसाला स्वतःचे सुख-दुखः ठरवण्यासाठी इतरांची गरज भासते. कोणत्याही मानवाला स्वतः जवळचे सुख इतरांचा आधार न घेता समजते किंवा जाणवते का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी द्याव...

प्रगती ते अधोगती

     मी नुकताच बिहार व झारखंड राज्यांचा तीर्थाटन निमित्ताने प्रवास केला. या दोन्ही राज्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती जवळून पाहण्याची संधी मिळाली. भगवान महावीर व भगवान गौतम बुद्ध यांची जन्म व कर्म भूमी हीच का? असा एक प्रश्न मनात निर्माण झाला. कारण वैभवाचा इतिहास ते दारिद्रतेचा वर्तमान असा प्रवास. कधी काळी ज्ञान संपन्न असणारा प्रदेश ज्या मध्ये कधी काळी नालंदा सारखे विश्व विद्यापीठ होते त्या बिहार मध्ये आज मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इतर राज्यात जावे लागते.      बिहार राज्याचा गौरवशाली इतिहास तसेच विदारक वर्तमान यामध्ये फार अंतर नाही. महावीर व गौतम बुद्ध यांचा इतिहास फक्त २५०० ते २६०० वर्षा पूर्वीचा आहे. महावीर व बुद्ध यांच्या काळात या प्रकारच्या वर्तमान संदर्भात कोणी भाकीत केले असते तर त्याला तत्कालीन समजणे मुर्खात काढले असते. कारण तत्कालीन वर्तमान हा समृद्ध व संपन्न असा होता.      एकंदरीत प्रगतीचा भूतकाळ असणारा प्रदेश वर्तमानात अधोगती दर्शवतो यामागे निसर्ग नियम आहे. परिवर्तन हा निसर्गाचा मुलभूत स्वभाव आहे यामागे परिवलन आह...

महावीर की महाविनाश

     नेपोलियन बोनापार्ट असो की जगजेत्ता सिकंदर असो अथवा जागतिक इतिहासातील कोणताही पराक्रमी राजा असो त्यांना ‘महावीर’ ही पदवी-उपाधी मिळाली का? अर्थात त्यांना तत्कालीन काळात महावीर समजण्यात आले मात्र काळाच्या ओघात महावीरपणा नामशेष झाला. मात्र इतिहासातील दोन महावीर अजरामर झाले. एक रामभक्त हनुमान तर दुसरे जैन तीर्थंकर भगवान महावीर. एक भक्ती परंपरेचे प्रतिक तर दुसरे श्रमण परंपरेचे प्रतिक आहेत.      दोन्ही महावीरांचा मार्ग भिन्न आहे पण निष्पत्ती एक आहे. ती निष्पत्ती म्हणजे संयम. साधारणतः स्वतःवर नियंत्रण म्हणजे संयम समजण्यात येते मात्र संयम म्हणजे सत्याचा आयाम, सत्य पाहण्याची तसेच आकलन करण्याची क्षमता. अर्थात ही क्षमता बाजारात विकत मिळत नाही तर त्यासाठी आत्मसाधना करावी लागते. अहंकाराच्या विवेक या स्वरूपाला सक्रीय करावे लागते म्हणजे थोडक्यात जग काय करते यापेक्षा आपण काय पाहतो, कसे पाहतो व कसे-काय आकलन करतो याला महत्व आहे. दुसऱ्या शब्दात व्यक्तिगत दृष्टी मर्यादा संदर्भात जागरूक राहणे.अर्थात हे इतके सुलभ नाही कारण अहंकार स्वतःला वाचवण्यासाठी संभ्रम निर्मा...

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

     कोणत्याही भाषेतील वृत्त वाहिनी पाहता उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा प्रत्यय मिळतो. कोणत्याही प्रकारची घटना घडताच करंट इश्यूच्या नावाखाली काथ्याकुट सुरु करतात मात्र आपण समाजाला जो संदेश वा शिकवण देतो त्याचा ना विचार केला जातो ना त्यासंदर्भात भान राखले जाते. वृत्त वाहिनी मधील होणारी चर्चा ही समाजाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात शिकवण व संस्कार प्रदान करते मात्र याची जाणीव अथवा भान वृत्त वाहिनी मध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना नसावी किंवा वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार तरी असावा.      घटना घडल्या नंतर तत्परतेने विश्लेषण करीत आम्ही पहिले साठी घाई गडबड करण्यात येते मात्र आपण जे विश्लेषण करतो ते व्यापक दृष्टीने की संकुचित दृष्टीने याची खातरजमा केली जाते का? आपण जे विश्लेषण करतो ते एकांगी की सर्वांगीण समीप याचा कधी विचार केला का? या प्रश्नां संदर्भात विचार करणे दूर याउलट मी सत्य व सर्वांगीण परिपूर्ण या थाटात विश्लेषण करण्यात येते. वृत्त वाहिनीच्या पत्रकारांना आपण परिपूर्ण आहोत हा एक भ्रम असावा किंवा स्वतःच्या अपरिपूर्णत्वाची जाणीव...

अर्थाचा अनर्थ

अर्थाचा अनर्थ होणे अशी एक म्हण आहे. अर्थाचा अनर्थ कसा होतो हे अनेकांना माहित किंवा ज्ञात नाही. सामान्यतः कोणत्याही शब्दाचा अर्थ हा शब्दात असल्याचे समजले जाते मात्र प्रत्येक शब्द म्हणजे अभिव्यक्ती करण्याचे एक ढोबळ तसेच संक्षिप्त माध्यम आहे. अर्थात प्रत्येक शब्दाला अर्थ आहे पण तो शब्दार्थ, भावार्थ, मतितार्थ या स्वरुपात आहे. ज्याप्रमाणे शब्दात अर्थ त्याच प्रमाणे प्रत्येक माणसाच्या आकलनात त्याची एक परिभाषा( व्याख्या) असते. शब्दामागे भावना असते. योग्य हा एक शब्द त्याला पुस्तकी-व्याकारानात्मक एक अर्थ आहे तसेच प्रत्येक व्यक्तीनुसार योग्य या शब्दाची परिभाषा आहे. कोणत्याही व्यक्तीला योग्य म्हणजे काय प्रश्न करून पाहावा म्हणजे त्या व्यक्तीची योग्य या शब्दाची व्याख्या समजण्यास मदत मिळते. व्यक्तीनुसार या परिभाषेत बदल घडतो कारण प्रत्येकाची दृष्टी भिन्न यामुळे आकलन भिन्न. हिंसा योग्य की अयोग्य? याला काही व्यक्ती योग्य तर काही अयोग्य असे उत्तर देतील कारण दृष्टीकोन, आकलन, जडण-घडण, संस्कार. हिंसा म्हणजे काय? असा प्रश्न करता दुसऱ्यांना त्रास देणे असे समजण्यात येते. ज्याव्यक्तीची जडण-घडण हिंस...