स्वभाव सापेक्षता

सापेक्षता विज्ञानातील एक सिद्धांत, एक संकल्पना आहे. कोणत्याही घटकाची अस्थिरता समजण्या-जाणवण्यासाठी कोणत्याही एका घटकाला स्थिर मानने-समजणे. ब्रम्हांडातील प्रत्येक घटक अस्थिर आहे. मानव या अस्थिरतेला अपवाद नाही तसेच मानवी स्वभाव देखील अपवाद नाही. मात्र इथे खरी गंमत आहे. मानवाला स्वतःच्या स्वभावाची अस्थिरता तसेच सापेक्षता संदर्भात ज्ञान नाही.
आम्ही जे काही पाहतो, ऐकतो त्यामधून जे काही समजतो-आकलन करतो त्याला सत्य वा आधार मानत आम्ही वाटचाल करतो. तसेच आम्ही स्वतःचे आकलन केंद्र मानत यावरून इतरांचे परीक्षण करून निर्णय घेतो. वास्तवात आमचे आकलन आमच्या आचरणाचे केंद्र आहे मात्र प्रत्येकाला स्वतःचे आकलन आहे.
आम्ही आमच्या आकलन प्रमाणे योग्य-अयोग्य ठरवतो व याचा आधार घेत इतरांचे आचरण तपासण्याचा प्रयन्त करतो. गंमत म्हणजे आमची योग्य-अयोग्य ही संकल्पना स्थिर नसते तर बदलत असते. तसेच प्रत्येक व्यक्तीची जडण-घडण होते त्याप्रमाणात त्याची योग्य-अयोग्य ही संकल्पना निर्माण होते तसेच बदलत राहते. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे आकलन केंद्र मानत आचरण करताना स्वतःच्या संकल्पनांना प्राधान्य देतो.
प्रत्येक व्यक्तीची जडण-घडण भिन्न वातावरणात होते तसेच व्यक्तीचा दृष्टीकोन व आकलन स्वतंत्र आहे. अर्थात काही प्रमाणातील समानता असू शकते तसेच काही प्रमाणात मत-मतांतर देखील असू शकते. आम्ही स्वतःच्या दृष्टीने पाहतो तसेच आकलन करतो त्यानुसार आचरण घडते तसेच प्रत्येक व्यक्ती याप्रकारे आचरण करतो मात्र ज्यावेळी आम्ही इतरांचे आचरण तपासतो त्यावेळी स्वतःच्या आकलनास केंद्र मानतो. वास्तवात प्रत्येकाला स्वतःचे आकलन आहे व त्याच्या आचरणाचे ते केंद्र आहे.
थोडक्यात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्वभाव नुसार आचरण करतो. मात्र व्यक्तिगत स्वभावाला केंद्र मानत जगाचे परीक्षण करण्याचा प्रयन्त करतो त्यामुळे गल्लत करतो. कोणत्याही व्यक्तीच्या आचरणाचा अभ्यास करताना त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत दृष्टी व आकलन(स्वभाव) नुसार अभ्यास करावा लागतो अन्यथा गल्लत घडते.
महात्मा गांधीजींचे आचरण, कृती, निर्णय यांचा अभ्यास करताना तो गांधीजींच्या दृष्टीकोन, आकलन (स्वभाव) परत्वे करावा हे क्रमप्राप्त आहे मात्र हा अभ्यास नथुराम गोडसे किंवा सावरकर यांच्या दृष्टी, आकलन(स्वभाव) परत्वे करता गल्लत होणार कारण स्वभावातील अंतर. गांधीजींचा दृष्टीकोन व स्वभाव हा आत्मपरीक्षण करणारा आहे तेच गोडसे व सावरकर यांचा स्वभाव परपरीक्षण करणारा आहे. गांधीजींनी स्वतःच्या कृतीकडे लक्ष दिले तेच गोडसे व सावरकर यांनी इतरांच्या कृतीकडे लक्ष दिले.
दृष्टीकोन बदलताच आकलन तसेच आचरण व स्वभाव यामध्ये बदल घडतो. गांधीजींना आधार मानता गोडसे व सावरकर चुकीचे भासतात तसेच गोडसे व सावरकर यांना आधार मानता गांधीजी चुकीचे भासतात. भासतात कारण दिसणे व असणे तसेच वाटणे या सगळ्यात अपूर्णत्व आहे. कोणताही मानव ना परिपूर्ण पाहतो ना परिपूर्ण आकलन करतो. काही मानव परिपूर्ण पाहतो तसेच आकलन करतो असा भ्रम पाळतात कारण अज्ञान.
मानव हा उपजत अज्ञानी आहे. तो संस्कार ग्रहण करतो त्याप्रमाणे ज्ञान मिळवत जातो मात्र ज्ञान मिळाले म्हणजे अज्ञान गेले असे नाही. आपण आपल्या अज्ञानाचा मागोवा घेतला तरच सापेक्षता संदर्भात जाणीव होत ज्ञान मिळेल. यासाठी आपली विद्यार्थी अवस्था संदर्भातील जाणीव महत्वाची आहे.

Comments

  1. आत्म परीक्षण करतात तेच मोठे होतात. परपरीक्षणात गुंतलेले सामान्यच राहतात. भूतलावर सामन्यांची संख्या अधिक असण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते