दुर्लक्षित हलगर्जीपणा


भारतीय समाजात सध्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला यावरून डॉक्टरांना मारहाण करणे, हॉस्पिटल मधील सामानाची नासधूस करणे यासारखे प्रकार वाढत आहेत. वास्तवात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला अथवा नाही यासंदर्भात खातरजमा न करता व्यक्तिगत अर्धवट आकलन क्षमतेने जो निष्कर्ष घेतला त्याला सत्य मानत धिंगाणा घातला जातो. मुळात आपले आकलन पूर्ण आहे की नाही याची तपासणी न करता स्वतःला शहाणे व हुशार मानत आचरण करणे हा मानवी स्वभाव आहे. मानवाच्या याच स्वाभाविक घटकामुळे हलगर्जीपणा घडतो मात्र तो त्याच्या लक्षात येत नाही याउलट मानव त्याला स्वतःची हुशारी समजतो.
       स्वतःला वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान नसताना निखळ माहिती वा जाहिरात पाहून औषध सेवन करणाऱ्या व्यक्तीची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. तसेच स्वतःचे अर्धवट आकलन इतरांना देण्यात धन्यता मानणारे अनेक महाभाग आहेत. या व्यक्ती स्वतः तज्ञ असल्याप्रमाणे इतर सामान्य व्यक्ती ते डॉक्टर यांना उपचार संदर्भात मार्गदर्शन देण्याचा प्रयन्त करतात. या वर्गवारीत मोडणाऱ्या व्यक्ती एकतर मानाने औषध सेवन करतात वर हाच प्रकार करण्यासाठी इतरांना उद्युक्त तसेच प्रेरित करतात. यांच्या सोबतीला नर्स, कम्पाउंडर, मेडिकल दुकानात काम करणारे कर्मचारी व मेडिकल दुकानदार हे समस्त घटक स्वतःचा अर्धवटपणा न पाहता औषध सेवन करण्याचा सल्ला तसेच मार्गदर्शन करतात. गंमत म्हणजे नर्स, कम्पाउंडर, मेडिकल दुकानात काम करणारे कर्मचारी व मेडिकल दुकानदार यांना समाजात अर्धा डॉक्टर समजण्यात येते. समाजात अर्धवट माणसाचा सल्ला दुर्लक्षित करण्यात येतो मात्र वैद्यकीय क्षेत्र याला अपवाद आहे.
       वैद्यकीय क्षेत्रात अर्धवट व्यक्तींचा सल्ला असो की अनुकरण असो ते व्यापक प्रमाणात घातक ठरते. यासृष्टीतील प्रत्येक घटकात औषधी गुणधर्म आहेत पण त्यासाठी त्याचे योग्य प्रमाण, योग्य परिस्थिती सोबत योग्य ज्ञान तितकेच महत्वाचे आहे अन्यथा औषधी पदार्थ हानिकारक ठरू शकतो. प्रत्येक औषधाला तत्कालीन व दुरगामी परिणाम आहेत यामध्ये काही चांगले तर काही वाईट आहेत. प्रत्येक औषध सोबत काही दुष्परिणाम आहेत यासंदर्भात कोणत्याही अर्धवट व्यक्तीला माहिती नसते कारण अज्ञान. या अर्धवट व्यक्ती व्यापक प्रमाणात डॉक्टरांचे अनुकरण करतात. पण यांना डॉक्टर जो उपचार करतात त्याची माहिती मिळते मात्र उपचार मागे एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. उपचार मागे रोग निदान आहे तसेच औषधांचा समग्र अभ्यास आहे.
       सामान्य व्यक्ती किंवा अर्धवट व्यक्ती लक्षणांना रोग समजतात मात्र समस्त लक्षण सोबत तपासणी करतांना आढळणारी लक्षणे यांचा एकत्रित अभ्यास करून डॉक्टर निदान करतात व प्रसंगी प्रयोगशाळेतील इतर तपासण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात व तो अहवाल पाहून निदान करतात. कोणत्या लक्षणांला किती महत्व द्यावे या संदर्भात डॉक्टरांना अधिक समजते की सामान्य रुग्ण वा अर्धवट व्यक्तींना अधिक समजते? सामान्य व्यक्ती डोके दुखाण्यास किरकोळ समजू शकतो मात्र तेच त्याचा रक्तदाब वाढलेला असेल तर डोकेदुखीचे महत्व किंवा मुल्यांकन बदलते तेच त्याच्या मज्जातंतूंच्या संस्थेच्या कार्यात काही बिघाड असेल तर त्याचे मुल्यांकन बदलते. थोडक्यात लक्षण व रोग भिन्न आहेत. अर्धवट माणूस लक्षणांचा इलाज करतो मात्र यामुळे काही आजारातील प्राथमिक लक्षणे झाकली जातात परिणामी रोग उग्र स्वरूप धारण करतो तसेच डॉक्टर निदान करताना लक्षणा अभावी गल्लत करतो यापारीस्थितीमध्ये नुकसान रुग्णाचे होते.
समाजातील काही रुग्ण डॉक्टरचा एकदा सल्ला घेतात मात्र त्या चीठ्ठीनुसार आयुष्यभर किंवा तत्सम लक्षणे जाणवतात त्यावेळी सेवन करण्यात येतात तसेच यासारखी लक्षणे आढळतात त्या रुग्णांना हीच औषधे सेवन करण्याचा सल्ला प्रदान करण्यात येतो. याठिकाणी कोणते औषध कोणत्या परिस्थितीमध्ये किती प्रमाणात घ्यावे याला मर्यादा असतात मात्र याला दुर्लक्षित करण्यात येते. काही रुग्ण चिठ्ठी नुसार सगळी औषधे घेतात मात्र सेवन टाळतात कारण मला आता बरे वाटते पण यामुळे प्रतिजैविक औषधे निष्प्रभ ठरत आहेत तसेच रोग बरा न होता त्याच्या स्वरुपात बदल घडतो. औषधांचे दुष्परिणाम निस्तरणे ही एक वैद्यकीय समस्या निर्माण होत आहे यामागे अर्धवट व्यक्तीची भूमिका निर्णायक आहे.
डॉक्टरचा हलगर्जीपणा असेल तर न्यायालयात दाद मागता येते पण अर्धवट शहाण्या माणसांचा हलगर्जीपण कसा रोखणार? आपण स्वतःचा अर्धवटपना पाहावा हे सगळ्यांना साध्य आहे. कबिरांचा एक दोहा आहे, ‘ जिसका काम उसीको साजे दुजा करे सो .......

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते