Posts

Showing posts from March, 2012

विरोधक ते शत्रुत्व

परिवर्तन हा निसर्ग नियम आहे तसेच निसर्गातील कोणताही घटक याला अपवाद नाही. तसेच निसर्गातील प्रत्येक घटक स्वतःचे अद्वितीय असे अस्तित्व बाळगून आहे. माणूस देखील निसर्गातील एक घटक आहे यामुळे त्याच्या एकंदरीत जीवनात परिवर्तन घडतात, प्रत्येक माणूस स्वतःची भिन्नता जोपाण्याचा प्रयन्त करतो. मानवाचे मत असो की विचार धारा ती प्रत्येकाला स्वतंत्र आहे. अर्थात काही प्रमाणात काही व्यक्तीमध्ये काही मतांच्या बाबत समानता असते मात्र त्याच ठिकाणी भिन्नता देखील असते. थोडक्यात मत मतांतर ते मतभेद असणे हे स्वाभाविक तसेच नैसर्गिक आहे. वर्तमान काळात मानवाला स्वतःचे मत हेच अंतिम सत्य वाटण्याचे प्रमाण लक्षणीय आहे यामुळे मत-मतांतर ते मतभेद निर्माण होतात त्या ठिकाणी कलह ते वादंग निर्माण होतात. कालांतराने त्याचे शत्रुत्त्व मध्ये रूपांतर होते. थोडे भूतकाळात डोकावले तर याप्रकारची अवस्था किंवा चित्र होते का? नाही. दोन व्यक्ती मधील मैत्री व त्याची परस्पर विरोधी विचारधारा असणे हे चित्र सर्रास पाहण्यास मिळत होते. एका घरातील असो की गावातील दोन व्यक्ती परस्पर विरोधी विचारधारेचे, राजकीय पक्षाचे समर्थक-विरोधक असताना देखील...

असेल तर दिवाळी नाही तर शिमगा

आता उन्हाची तीव्रता वाढण्या सोबत पाणी आणि वीज टंचाई यांची जाणीव सुरु होते. पत्रकार असो की विरोधक यांना आयोजन-नियोजन यामधील त्रूटी दिसण्यास प्रारंभ होते. सामाजिक बौद्धिक कुपोषणाचा एक परिणाम असल्याने तहान लागल्या नंतर विहीर खोदण्याचा उपक्रम सुरु होते तसेच सगळे खापर सत्ताधारी मंडळीवर फोडण्यात येते. दरवर्षी उन्हाळा आला की असा प्रकार सुरु होते. सत्ताधारी पक्ष असो की अधिकारी वर्ग या नियोजन किंवा आयोजन करीत नाहीत अश्यातला भाग नाही तर ते नियोजन व आयोजन कोलमडून पडते अर्थात यामध्ये काही अंमलबजावणी मधील त्रूटी असतात याबद्दल कोणाचेही दुमत नाही मात्र या कोलमाडण्यात सामान्य माणसाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे परंतु सत्ताधारी असो विरोधक अथवा पत्रकार सामान्य माणूस व त्याची भूमिका यांना सोयीस्कर रित्या दुर्लक्षित करीत फक्त सत्ताधारी व अधिकारी यांचे कान उपटण्याचा प्रयन्त करतात. पण सामान्य व्यक्तीची भूमिका असो की प्रबोधन-जागरण यांना दुर्लक्षित करण्यात येते. सामान्य माणसाची मानसिकता म्हणा की स्वभाव गुणधर्म म्हणा यामुळे तो समस्त नियोजनावर पाणी फिरवतो. सामान्य माणसातील असेल तर दिवाळी नाहीतर शिमग...

मुखपृष्ठ वर्णन आणि पुस्तक प्रत्यय.

काही दिवसापूर्वी मी माझ्या स्वभाव सापेक्षता या पुस्तकामागील कथा, त्याचे मुखपृष्ठ संदर्भात फेसबुक तसेच ब्लॉग वर लिहिले. काही मित्रांना या संदर्भात काही शंका होत्या त्यापैकी काही जणांनी फोनवर विचारणा केली मात्र प्रत्येक जवळ फोन नंबर नाही. तसेच ज्यांनी मुख पृष्ठ संदर्भात विचार केला किंवा समज निर्माण करून घेतला त्यांना समज मधील गैरसमज तसेच पुस्तकातील साहित्याचा प्रत्यय द्यावा या दुहेरी उद्देशाने ब्लॉग प्रपंच. समस्त मुखपृष्ठ हे ब्रम्हांड वर आहे. मुखपृष्ठाची पार्श्वभूमी ही ब्रम्हांड आहे. ब्रम्हांडा मधील एक आकाशगंगा, एक सौर मालिका, एक माणूस तसेच त्याचे सापेक्ष विश्व आहे. सामान्यतः आम्ही स्वतःच्या सापेक्ष इतरांचा विचार करतो. थोडे ब्रम्हांड सापेक्ष विचार करून पाहावा. ब्रम्हांडातील आकाश गंगा म्हणजे एक मोठा ठिपका आहे. तेच सौर मलिक एक लहान ठिपका तर पृथ्वी त्यामधील एक लहान ठिपका आहे. तेच पृथ्वीवरील माणूस म्हणजे काय? तर सूक्ष्म जंतू-अणु-रेणू. समस्त ब्रम्हांडात मानवाचे अस्तित्व किड्या मुंगी पेक्षा लहान आहे. आकाशगंगेत ग्रह-तारे अस्थिर व भ्रमण अवस्थेत असतात. सौर मालिकेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात...

परिपक्वतेचा अभाव

टीम अण्णा व आंदोलन भरकटत असल्याचे काही पत्रकारांच्या निदर्शनास येत आहे किंवा याप्रकारचा मीडियाचा सूर आहे. मीडियाचा सूर कोणत्याही क्षणी पालटतो हे आम्हाला नवीन नाही. ज्या मिडीयाने या आंदोलनाला तसेच आंदोलकांना डोक्यावर घेत नायक केले तीच मिडिया आता पायउतार ते पाणउतार करण्यास कचरत नाही. टीम अण्णा यांच्या आंदोलनाची दिशा मी मुळात भरकटलेली होती फक्त ती त्याकाळात मिडीयाला दिसत-जाणवत नव्हती. मिडिया असो की टीम अण्णा असो यांच्यातील परिपक्वतेचा अभाव दर्शवणारे हे आंदोलन भरकटणार ही काळ्या दगडावरील रेघ होती तसेच आहे. श्री.अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी असणारे कोणतेही आंदोलन पहा ते वास्तवात भ्रष्टाचार विरोधी नसून शासकीय भ्रष्टाचार विरोधी आहे. यामागील नेमके कारण काय? हे फक्त अण्णा हजारे सांगू शकतात. यासंदर्भात ज्या काही शक्यता आहेत त्यापैकी एक शक्यता म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास, दुसरी शक्यता म्हणजे अज्ञान. जर एका वाक्यात समस्त शक्यता सांगायचे म्हटले तर परिपक्वतेचा अभाव. श्री.अण्णा हजारे यांना स्वतःच्या कर्तुत्वाचा दंभ किती आहे हे मी सांगण्याची गरज नाही. श्री.अण्णा हजारे यांचा अहंकार सर्वश्रुत ...

बौद्धिक कुपोषणाचे बळी

टीम अण्णा यांचा पुन्हा एकदा बेफाम व बेलगाम बोलण्याचा कार्यक्रम सुरु झाला. टीम अण्णा यांना यश-अपयशाचे किंवा प्रसिद्धीचे अपचन झाले की त्यांचे बौद्धिक कुपोषण असल्याने सनसनाटी-झणझणीत बोलणे असा प्रकार करतात हे कळण्यास मार्ग नाही. आपल्या देशात कुपोषण ही एक प्रमुख समस्या आहे. अर्थात शारीरिक कुपोषण हे सगळ्यांना थोड्या कमी-जास्त फरकाने परिचित-माहित आहे पण बौद्धिक कुपोषण किती व्यक्तींना माहित किंवा ज्ञात आहे? शारीरिक कुपोषण मोजण्यासाठी वय, वजन, उंची यांचे एक समीकरण निश्चित करण्यात आलेले आहे मात्र बौद्धिक कुपोषण मोजण्याचे निश्चित निकष नाहीत. अर्थात बौध्यांक मोजणाऱ्या काही प्रणाली आहेत परंतु त्यामध्ये व्यापक प्रमाणात त्रूटी-कमतरता आहेत. बौद्धिक कुपोषण म्हणजे नेमके काय? तर वय परत्वे अविकसित बुद्धिमत्ता. बौद्धिक कुपोषणाचे लक्षण काय? तर एकांगी दृष्टीकोन व आकलन. बौद्धिक कुपोषणाचा कारक घटक कोणता? अहंकार-अज्ञान. बौद्धिक कुपोषणात नेमके काय होते? टीम अण्णाचे आचरण पहावे म्हणजे प्रत्यय मिळणार आहे. मी निष्पाप, निरागस, नैतिक, लायक, सत्य, ज्ञानी तसेच बाकीचे सगळे नालायक, चोर, दरोडेखोर, बलात्कारी, भ्रष्टा...

लढा हक्कसाठी की कर्तव्यासाठी?

टीम अण्णा पुन्हा एकदा नव्याने मैदानात उतरली यावेळी काही नवीन मुद्दे तसेच नवीन भिडू यांचा समावेश आहे. काही मंत्र्यांची नावे घेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुदत देत कार्यारंभ करण्यात आला. सध्या मार्च महिना सुरु असून वार्षिक ताळेबंद, जमाखर्चा करून समस्त कर भरणा करण्याचा अंतिम महिना आहे. सरकारने ही मुदत अनेक वर्षापासून ठरवलेली आहे मात्र आपल्या पैकी किती व्यक्ती मुदत अंतर्गत काम करतात? तसेच प्रसंगी मुदत बाह्य काम कसे मुदत अंतर्गत करून घेतात हा संशोधनाचा एक विषय आहे. तसेच समस्त प्रकारचा करभरणा करताना आम्ही किती इमाने-इतबारे भरतो हे एक उघड गुपित आहे. हमाम में सब नंगे होते है असे म्हणतात. सध्या घरात असो की समाजात अथवा देशात स्वतःचा नंगेपणा न पाहता इतरांचा नंगेपणा पाहण्याची प्रथा-संस्कार तसेच संस्कृती रुजत आहे किंवा रुजवण्यात येत आहे. आम्ही स्वतःचा भ्रष्टाचार असो की काळापैसा असो याच कधी विचार करतो का? तसेच आम्ही कौटुंबिक असो की सामाजिक अथवा राष्ट्रीय कर्तव्यांचा विचार करतो की अधिकारांचा विचार करतो? टीम अण्णा नेहमी अधिकाराची भाषा वापरते तसेच सरकारला सरकारच्या कर्तव्याची आठवण करून देतान...

पुस्तकामागील कथा व पुस्तक

Image
मी काल फेसबुकवर माझ्या ईबुक स्वरुपात होणाऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ अपलोड केले. ज्या प्रमाणे प्रत्येक घटनेला एक इतिहास-पार्श्वभूमी असते त्याच प्रमाणे या पुस्तकामागे एक कथा-इतिहास आहे. माझा विवाह पार पडल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होते त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी माझ्या काही नातेवाईकांना हात जोडत काही चुकले असेल तर क्षमा करावी असे सांगितले त्यावेळी माझे एक नातेवाईक त्यांना म्हणाले की तुम्ही मुलगी देऊन चूक केली. अर्थात हे माझ्या अपरोक्ष घडले मात्र घरी गेल्यानंतर समजले. दोन दिवसांनी मी माझे गुरु डॉ.संजय शिवदे यांच्या पाया पडण्यासाठी गेलो त्यावेळी त्यांनी माझ्या पत्नीला सांगितले की तू भाग्यवान आहेस हा एक चांगला विचारवंत असून भाविकाळात एक उत्तम लेखक-विचारवंत होणार आहे फक्त तुला थोडे सांभाळून घ्यावे लागेल. एकच व्यक्ती संदर्भात दोन परस्पर विरोधी मत यामुळे पत्नी थोडी गोंधळी यामुळे तिने विचारले यातील योग्य कोण? माझे उत्तर दोघे योग्य तसेच अयोग्य आहेत कारण दृष्टी तशी सृष्टी. मला माझे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व आहे. कोणता व्यक्ती, माझा कोणता पैलू, कोणत्या दृष्टीने पाहणार, तसेच क...

जावई शोध

मी यापूर्वी साधुसंत की संधी साधून संत असा ब्लॉग लिहिला त्याचा प्रत्यय घ्यावयाचा असेल तर भारतामधील अधात्माचे एक संस्थान प्रमुख जे जीवन जगण्याची कला पैसे घेऊन शिकवतात त्याचे वक्तव्य तसेच कृती पहावी. शासकीय शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेणारे नक्षलवादी होतात यामुळे शिक्षण संस्थांचे खासगीकरण करावे या आशयाचे त्यांनी वक्तव्य केल्याचे समजते. भारतीय समाजातील बहुतेक जनता ही नक्षलवादी म्हणावी लागेल कारण शासकीय शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेतले आहे. मी स्वतः सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे. स्वतःला अध्यात्मिक गुरु समजणारे किंवा म्हणवणारे यांना नक्षलवाद असो की दहशतवाद अथवा कोणताही वाद यामागे असणारा अहंकार जर दिसत-समजत-जाणवत नसेल तर यांच्या अध्यात्मिक ज्ञान संदर्भात व्यापक प्रश्न चिन्ह निर्माण होते. तसेच मुलांची वास्तविक जडण-घडण वर घरातील संस्कारांचा व्यापक तसेच प्रभावी पगडा असतो थोडक्यात घरातील संस्कार पायाभरणी करणारे असतात. या तथाकथिक गुरुदेवांना घरातील संस्कार दिसत नाहीत? कोणताही उच्च कोटीचा शिल्पकार असो तो प्रत्येक दगडाला हवा तसा आकार देत शिल्प घडवू शकतो का? दगडात जर गुणधर्म असतील तरच दगडात...

मुसळ आणि कुसळ

गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्हाला दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ सहज दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही या आशयाची एक म्हण आहे. यासंदर्भात जर कोणाला प्रत्यय घ्यायचा असेल तर भाजप व त्याच्या नेते यांच्याकडे पहावे. भाजपा केंद्रातील एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. वर्तमान केंद्र सरकार वर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. तसेच टीका करताना आपण कुठे थांबावे याचे त्यांना भान नाही. टीका करताना आपण एखाद्याचा पाणउतारा करतो किंवा एखाद्या सर्वोच्च पदाचा अवमान करतो याचे त्यांना सोयरे किंवा सुतक नाही. अर्थात हा दोष त्यांचा नसून त्यांच्या संस्कारांचा आहे. वर्तमान समाजावर याच प्रकारचा संस्कार आहे त्याला नेते कसा अपवाद असतील. वर्तमान पंतप्रधान हे एक संयमी व मितभाषी वर्गवारीत मोडणारे व्यक्ती आहेत पण भाजपाचे जेष्ठ नेते त्यांना कमकुवत म्हणतात. जे नेते स्वतः आक्रमक तसेच आक्रस्ताळेपणा साठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या दृष्टीने संयम म्हणजे कमकुवतपणा आहे हे क्षणभर मान्य करता येते पण भाजपाचे आक्रमक नेते स्वतःच्या पक्षाच्या एक राज्य पातळीच्या नेत्या समोर हतबल होतात, लोटांगण घाल...

साधुसंत की संधी साधून संथ?

काल लिहिल्या प्रमाणे माणसाला दगडात देव दिसतो पण माणसातील देव दिसत नाही. माणूस देवाला दान करतो वास्तवात हे दान कधीही व कोणत्याही देवाला नसते कारण माणूस देवाला देण्या इतका मोठा नाही मात्र अनेक संधी साधू मानवी अज्ञानाचा फायदा घेतात. सामान्य मानवाला दान देण्यासाठी प्रेरित ते प्रवृत्त करतात यामुळेच देवस्थाने अराबोपती आहेत. तसेच काही साधूंची संस्थाने निर्माण होत आहेत. अर्थात जगाला दाखवण्यासाठी संस्था मात्र एकंदरीत कारभार पाहता संस्थान आहेत. संस्थान प्रमुख म्हणजे स्वतःला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गाने संत घोषित करतात वास्तवात हे स्वतः संधी साधून संथ असतात. थोडक्यात गाढवाने वाघाचे कातडे पांघरले तरी उपजत स्वभाव नुसार ते रेकते याच प्रमाणे स्वतःला जे संत म्हणतात त्यांच्या प्रवचनातून पितळ उघडे पडते. अर्थात हे सगळ्यांना समजत-उमजत नाही. संत म्हणजे ज्याचा संसाराचा अंत झाला. सामन्यातः वैवाहिक तसेच कौटुंबिक जीवनाला संसार समजण्यात येते परंतु हे संसाराचे एक संक्षिप्त स्वरूप आहे. समस्त ब्रम्हांड देखील एक संसार आहे तसेच प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात एक संसार आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अंतरंगात...

दगडातील देव दिसतो पण माणसातील देवाचे काय?

जगात देव आहे की नाही या प्रश्नाच्या फंदात न पडता क्षणभर ग्राह्य धरून विचार करून पाहावा ही विनंती. जगात देव आहे हे ग्राह्य धरता तो कुठे आहे? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. धर्मशात्र अनुसार देव हा जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आहे. कोणत्याही दैववादी माणसाला विचारा तो याच प्रकारचे उत्तर देणार आहे. आज जगभरात सर्वात श्रीमंत कोण? तर देव कारण देवाला देणारे अनेक भाविक दान करतात अर्थात आवळा देत कोहळा घेणारा आतबट्याचा व्यवहार करण्यात येतो हा भाग वेगळा. यादेवाच्या दानपेटीत अमुक-तमुक रक्कम दान, सोने, हिरे.... दान करण्यात आल्याचे नेहमी ऐकण्यात, वाचनात तसेच पाहण्यात येते. तसेच अनेक साधू-संत यांची संस्थाने पाहता माणूस देवाला ते देखील दगडातील देवाला खूप काही देतो. अर्थात देव सगुण-निर्गुण असो दगडाचा आधार घ्यावा लागतो. थोडक्यात मानवाला दगडाला एक आकार देत त्याला देव मानत माणूस वास्तवात दगडाला देवपण देतो तसेच माझा तो देव व तुझा तो दगड करण्यात येतो. मात्र या सगळ्यात गंमत म्हणजे जो माणूस जळी-स्थळी-कष्टी-पाषाणी देव असल्याचे सांगतो त्याला माणसातील देव दिसतो का? त्याला पर्यावरणातील देव दिसतो का? स्वतः...

घातक दैवीकरण

वर्तमान समाजातील महापुरुषांची आधुनिक बंदिस्तता यासंदर्भात मी एक ब्लॉग लिहिला होता तो वास्तवात एक पूर्वार्ध होता असे म्हटले तर वावगे होणार नाही तसेच त्याचा हा एक उत्तरार्ध आहे. वर्तमान समाजात फक्त ज्या त्या जाती-धर्मातील महापुरुषांची ज्या प्रकारची पूजा करण्यात येते ते पाहता त्यांना भविष्यात देवत्व बहाल करण्यात येणार आहे किंबहुना देवत्व बहाल करण्यात आलेले आहे. अर्थात कोणताही महापुरुष हा वंदनीय आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही परंतु फक्त माझ्या जातीधर्माचा महापुरुषच वंदनीय आहे असा समज बाळगणे किंवा याविचाराला साजेशी कृती करणे हे श्रद्धा-अंधश्रद्धा यांचे प्रतिक आहे तसेच अज्ञानाचे द्योतक आहे. वर्तमान समाजात स्वतःचे कर्तुत्व करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या कर्तुत्वाचा सोयीस्कर वापर करून स्वतःच्या मिश्या पिळण्याची प्रवृत्ती बोकाळत आहे. तसेच यासाठीच महापुरुषांना देवांच्या पंक्तीमध्ये बसवण्यात येते. अर्थात यामागे असणारा आदर पेक्षा अंधश्रद्धा तसेच अहंकार समाजाला घातक आहे. आपण वंदनीय व्यक्ती पासून प्रेरणा घेणे-आदर्श घेणे ते त्यांचे अनुकरण करणे असे प्रकार सहजतेने करू शकतो. तेच पूजनीय असणाऱ्या व्यक्ती...

जर राजे पन्हा अवतरले तर...

जर राजे पुन्हा महाराष्ट्रात अवतरले तर काय होणार? अर्थात ते पुन्हा अवतार घेणार नाहीत आणि समजा जन्म घेतला तर सर्वात प्रथम त्यांना स्वतः राजे असल्याचा पुरावा द्यावा लागेल. अर्थात तो सगळ्यांना मान्य होणार असाच पुरावा असावा विशेषतः ‘मी’ ‘मला’ ‘माझ्या’ यांना पटणारा पुरावा असावा. तरच ते राजे, छत्रपती अन्यथा भामटा. सर्व पुरावे मान्य झाले तर राजे नंतर राज्यपद. ते देताना माझ्या गटाला-ताटाला प्राधान्य असेल तर अन्यथा विरोध. थोडक्यात त्यांच्या मंत्रिमंडळात मला स्थान पाहिजे. तसेच आरक्षण सुद्धा पाहिजे नाहीतर उग्र व हिंसक आंदोलन. यानंतर छत्रपतींनी स्व जातीला प्राधान्य देत इतर जाती-धर्माचा द्वेष करीत इतरांना शिक्षा करावी ही आग्रहाची मागणी( धमकी). यानंतर राजेंच्या स्मारकाचा प्रमुख मुद्दा मार्गी लावणे. स्मारका साठी अवाढव्य खर्च झाला पाहिजे तसेच त्यामधील ठेके प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात मलाच पाहिजेत. अर्थात ही एक प्रकारची कल्पना-शक्यता आहे. दुसरी शक्यता देखील आहे. छत्रपतींची आदर्श राजेशाही प्रस्थापित होण्याची देखील एक शक्यता आहे. समजा ती प्रस्थापित झाली तर राजांच्या नावाखाली जोगवा मागणारे, जातीयव...

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे?

परवा भारतीय रेल्वेचा अर्थ संकल्प संसदेत मांडण्यात आला. यासंदर्भात प्रत्येक वर्तमान पत्रात सविस्तर विश्लेषण करण्यात आले. जवळपास प्रत्येक वर्तमान पत्राने या शहराला वाटण्याच्या अक्षता, निराशा, .....घाटाचा रस्ता या शब्दात वर्णन करीत नकारात्मक दृष्टीकोन अनुसार विश्लेषण केले. भारतात शहरे अनेक आहेत तसेच शहरांची लोकसंख्या देखील अधिक आहे त्याच प्रमाणे शहर तसेच नागरीक परत्वे अपेक्षा देखील अनेक आहेत. या जगात असा कोणता तज्ञ किंवा माईचा लाल आहे की तो या समस्त अपेक्षा पूर्ण करणारा आहे? असा कोणता पत्रकार आहे की जो या सगळ्यांचे समाधान करू शकेल असा अर्थ संकल्पीय आराखडा निर्माण करू शकेल? आपल्या देशात जो तो स्वतःच्या सोयीचा आराखडा तसेच व्यवस्था अपेक्षित करणार असेल तर काय होणार? कालच्या वर्तमान पत्रावर नजर फिरवा म्हणजे प्रत्यय मिळेल. कालच्या समस्त प्रतिक्रिया म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. स्वतःच्या संकुचित अपेक्षांना प्राधन्य देणाऱ्या मंडळी म्हणजे बौद्धिक दिवाळखोर आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर करताना एक गाव-शहर-राज्य इतक्या पुरता मर्यादित विचार असतो की समग्र देश...

अतिरेकी युग

वर्तमान काळाला विज्ञानाचे-स्पर्धेचे युग समजण्यात येते. अर्थात जशी मानवाची दृष्टी तसे त्याचे आकलन त्याप्रमाणे त्याचे निकष तसाच निष्कर्ष आहे. विज्ञानाची आवड तसेच निवड करतो त्याला विज्ञान युग भासते तसेच स्पर्धा संदर्भात आहे. काही व्यक्ती अध्यात्मिक विचारधारा मानतात किंवा अनुकरण करतात यामुळे कलियुग असल्याचे समजतात. तेच काहींना प्रगतीचे युग भासते थोडक्यात व्यक्तीनुसार युग कोणते यासंदर्भात मत-मतांतर आहे. मला स्वतःचा तसेच मानवाचा स्वभाव यामध्ये स्वारस्य असल्याने मी स्वभिविक पातळीला पाहतो तसेच स्वाभाविक निकषावर निष्कर्ष घेतो त्यावेळी मला वर्तमान युग हे मानवी अतिरेकाचे युग भासते. दहशतवाद्यांना अतिरेकी हे एक समानार्थी नाव आहे पण मी त्या अनुशंगाने म्हणजे दहशतवादी युग असे संबोधन करीत नाही तर स्वाभाविक पातळीला मानवाचे जे काही अतिरेकी आचरण आहे त्या अनुषंगाने अतिरेकी युग असा शब्द प्रयोग करीत आहे. वर्तमान मानवी जीवनात कोणता मानव कोणत्या ठिकाणी अतिरेक करणार याच नियम भरवसा नाही मात्र जो मानव अतिरेक करतो तो स्वतःच्या कृतीला अतिरेक समजत नाही. मुळात अतिरेक म्हणजे काय? ज्याठिकाणी मर्यादा उल्लंघन घडते...

तुलना

  तुलना करणे मानवी स्वभावाचा एक अविभाज्य घटक आहे. तुलना करण्याविना मानवी आकलन तसेच अभिव्यक्ती सुलभ होत नाही. तुलना न करता मानवास आकलन करणे किंवा आत्मसात करणे कठीण जाते किंबहुना आकलन किंवा आत्मसात होत नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तुलना करण्यासाठी दोन घटकांची गरज भासते. निखळ एका घटकाचा तुलनात्मक अभ्यास करता येत नाही. वास्तवात प्रत्येक घटकाला स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येक घटक अद्वितीय आहे मात्र मानव स्वतःच्या सुलभतानुसार दोन घटकात तुलना करतो. सोने असो की लोखंड अथवा पोलाद यासगळ्या धातुंना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे मात्र मानव यासगळ्यात तुलना करून अभ्यासण्याचा प्रयन्त करतो. थोडक्यात निसर्गातील प्रत्येक घटकाला स्वतःचे गुणधर्म-स्वभाव आहेत. मानव या गुणधर्मांचा अभ्यास करताना स्वतःच्या सोयीने वर्गीकरण करून अभ्यासण्याचा प्रयन्त करतो. सोन्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत त्यापारत्वे लोखंडाच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यात येतो किंवा लोखंडाच्या गुणधर्माच्या परत्वे सोन्याचा अभ्यास करण्यात येतो. वास्तवात सोने हे सोने आहे तसेच लोखंड हे लोखंड असून सोन्याचे गुणधर्म सोन्यातच मिळणार तसेच...

आगीत तेल ओतणार की पाणी?

आगीत तेल ओतणार की पाणी? या प्रश्नाचे उत्तर कोणतेही शेंबडे पोर देऊ शकते हे मला माहित असताना हा प्रश्न पडतो कारण स्वतःला सुशिक्षित, सभ्य, समंजस, नैतिक समजणाऱ्या व्यक्तींचे सामजिक आचरण. वर्तमान समाजातील व्यक्तींचे आचरण पहा विशेषतः सामाजिक समस्या वर ज्याठिकाणी चर्चा घडते त्याठिकाणी माणूस सूड, द्वेष, बदला, जश्याला तसे असे म्हणत जे काही बोलतो-करतो ते आगीत पाणी ओतणारे की तेल ओतणारे? भाषावाद असो की प्रांत वाद अथवा दोन व्यक्तींच्या दरम्यान असणारा परस्परातील वाद-कलह-तंटा असो याठिकाणी माणूस कोणत्या प्रकारची भूमिका मांडतो किंवा कृती करतो, ती आगीत पाणी ओतणारी असते की तेल ओतणारी असते? जो माणूस स्वतःचा समज हेच अंतिम सत्य मानतो तो पाणी ओतणार की तेल ओतणार? ज्या माणसाला स्वतःच्या समज मधील गैरसमज समजत नाही तो काय करणार? भारत-पाक या दोन देशातील संमंध कोणत्या प्रकारचे आहेत हे मी सांगण्याची गरज नाही तसेच यासंदर्भात किती व्यक्ती कोणत्या प्रकारची मुक्ताफळे उधळतात हे देखील सांगण्याची गरज नाही. यासंदर्भात किती व्यक्ती पाणी ओतण्याचा प्रयन्त करतात तसेच तेल ओतण्याचे प्रयन्त करतात? दुर्दैवाने तेल ओतणाऱ्या व्...