विरोधक ते शत्रुत्व
परिवर्तन हा निसर्ग नियम आहे तसेच निसर्गातील कोणताही घटक याला अपवाद नाही. तसेच निसर्गातील प्रत्येक घटक स्वतःचे अद्वितीय असे अस्तित्व बाळगून आहे. माणूस देखील निसर्गातील एक घटक आहे यामुळे त्याच्या एकंदरीत जीवनात परिवर्तन घडतात, प्रत्येक माणूस स्वतःची भिन्नता जोपाण्याचा प्रयन्त करतो. मानवाचे मत असो की विचार धारा ती प्रत्येकाला स्वतंत्र आहे. अर्थात काही प्रमाणात काही व्यक्तीमध्ये काही मतांच्या बाबत समानता असते मात्र त्याच ठिकाणी भिन्नता देखील असते. थोडक्यात मत मतांतर ते मतभेद असणे हे स्वाभाविक तसेच नैसर्गिक आहे. वर्तमान काळात मानवाला स्वतःचे मत हेच अंतिम सत्य वाटण्याचे प्रमाण लक्षणीय आहे यामुळे मत-मतांतर ते मतभेद निर्माण होतात त्या ठिकाणी कलह ते वादंग निर्माण होतात. कालांतराने त्याचे शत्रुत्त्व मध्ये रूपांतर होते. थोडे भूतकाळात डोकावले तर याप्रकारची अवस्था किंवा चित्र होते का? नाही. दोन व्यक्ती मधील मैत्री व त्याची परस्पर विरोधी विचारधारा असणे हे चित्र सर्रास पाहण्यास मिळत होते. एका घरातील असो की गावातील दोन व्यक्ती परस्पर विरोधी विचारधारेचे, राजकीय पक्षाचे समर्थक-विरोधक असताना देखील...