कर नाही त्याला डर कशाला
कर नाही त्याला डर
कशाला या आशयाची एक मराठी म्हण आहे. काल एका कांग्रेस कार्यकर्त्याने एक शंका
व्यक्त करताच महाराष्ट्रातील राजकीय तसेच मिडीयाचे जीवन ढवळून निघाले यामुळे
तत्परतेने त्यावर काही वृत्तवाहिन्यांनी चर्चा सत्र घेतली तसेच काही राजकीय
पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास प्रारंभ केला.
भारतामधील एका
अणुउर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संघटनांना काही विदेशी संस्था आर्थिक पाठबळ
पुरवत असल्याचे आढळून आले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जैतापूर इथे निर्माण
करण्यात येणाऱ्या अणुउर्जा प्रकल्पाला होणाऱ्या विरोधामागे देखील काही परकीय
शक्तींचा अर्थ पुरवठा आहे का? यासंदर्भात शंका घेण्यास प्राथमिक दृष्टीने बराचसा
वाव आहे.
अणुउर्जा संदर्भात
काही समर्थक तसेच विरोधक आहेत. समर्थक असो की विरोधक हे वास्तवात अज्ञानी असतात
यासंदर्भात मी पूर्वी ब्लॉग लिहिला आहे. यामुळे त्याचे पुन्हा विश्लेषण करीत नाही.
मुळात अणुउर्जा संदर्भात जे काही वास्तविक ज्ञान आहे ते किती व्यक्तींना आहे?
अणुउर्जा संदर्भात अनेक समज तसेच गैरसमज आहेत. समर्थन करणारा असो की विरोध करणार
असो त्याचा मूलाधार हा समज आधारित आहे मात्र त्यामधील गैरसमज देखील पाहण्याची
क्षमता किती व्यक्ती आहे?
आज जे काही समर्थक व
विरोधक आहेत त्यामागे प्रत्येकाची एक कारणमीमांसा आहे पण त्यामागे ज्ञान-अज्ञान,
शक्यता-तर्क-वास्तव काय याचा विचार केला जातो की नाही? समर्थक पैकी एकाने शंका
व्यक्त केली यामागे देखील ज्ञान-अज्ञान, शक्यता-तर्क-वास्तव ते संशय यांना निश्चित
स्थान आहे मात्र समजा एखाद्याने शंका व्यक्त केली तर त्याचे निरसन करावे की विरोध
करावा? अर्थात व्यक्ती परत्वे विचार करण्याची पद्धत भिन्न आहे.
ज्याने काही गैर
कृत्य केले नाही किंवा करीत नाही तो सरळ चौकशीला सामोरे जाताना कचरणार नाही कारण
कर नाही त्याला डर कशाला. मात्र काल समस्त चर्चा सत्रात ना पत्रकाराने ना
प्रवक्त्याने यासंदर्भात चर्चा अथवा विचारणा केली. जे कोणी विरोध करीत आहेत
त्यांची चौकशी झाली तर वास्तव उघडकीला येत कोण चोर? कोण साव? हे सगळ्यांना समजणार
आहे.
ज्या कोणत्याही
संघटना असो की राजकीय पक्ष असोत त्यांनी चौकशीला हरकत घेण्याचे कारण काय? किंवा
मुलभूत मुद्दा बाजूला ठेवत तुम्हीच चोर यामुळेच उलट तुमची चौकशी झालीच पाहिजे असा
युक्तिवाद-प्रतिवाद करावा? मला वाटते जर आपण काही केले नाही तर चौकशीला सामोरे
जावे.
सद्या कोणत्याही
प्रश्नावर वैचारीक देवाण-घेवाण करण्याचा संस्कार व संस्कृती कालबाह्य होत असून
वैचारीक देवाण-घेवाण न करता वाद-विवाद करण्याचा संस्कार-संस्कृती रुजत आहे.
वाद-विवाद करण्यात मानवाला स्वारस्य आहे मात्र वाद-विवाद हे बैद्धिक
दिवाळखोरी-अज्ञानाचे एक लक्षण असल्याचे अनेकांना माहित नाही यामुळे यासंदर्भात
ज्ञान फार लांब अंतरावर आहे. माणूस माहितीला ज्ञान मानतो तसेच प्रसंगी स्वतःच्या
माहितीच्या आधारे ज्ञानी माणसांना गप्प राहण्याची विनंती-फतवा-आदेश देण्यात येतो.
याचा प्रत्यय महाराष्ट्राने नुकताच घेतला आहे.
अणुऊर्जेचे समर्थक
असोत की विरोधक यांनी आपसात चर्चा करून वैचारीक देवाण-घेवाण करण्याचा मार्ग
स्वीकारला तर शंका-कुशंका असोत की आरोप-प्रत्यारोप असोत यांना वाव मिळणार नाही.
तसेच चौकशी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. जो माणूस चौकशी करण्यास
कुचारतो-टाळाटाळ करतो त्याच्या मनात चोर आहे का? किंवा कर नाही त्याला डर कशाला
याचा प्रश्न निर्माण होणार नाही. थोडा विचार करून पहा.
Comments
Post a Comment