मुसळ आणि कुसळ
गुढीपाडवा व नवीन
वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्हाला दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ सहज
दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही या आशयाची एक म्हण आहे. यासंदर्भात
जर कोणाला प्रत्यय घ्यायचा असेल तर भाजप व त्याच्या नेते यांच्याकडे पहावे.
भाजपा केंद्रातील एक
प्रमुख विरोधी पक्ष आहे. वर्तमान केंद्र सरकार वर टीका करण्याची एकही संधी ते सोडत
नाहीत. तसेच टीका करताना आपण कुठे थांबावे याचे त्यांना भान नाही. टीका करताना आपण
एखाद्याचा पाणउतारा करतो किंवा एखाद्या सर्वोच्च पदाचा अवमान करतो याचे त्यांना
सोयरे किंवा सुतक नाही. अर्थात हा दोष त्यांचा नसून त्यांच्या संस्कारांचा आहे.
वर्तमान समाजावर याच प्रकारचा संस्कार आहे त्याला नेते कसा अपवाद असतील.
वर्तमान पंतप्रधान
हे एक संयमी व मितभाषी वर्गवारीत मोडणारे व्यक्ती आहेत पण भाजपाचे जेष्ठ नेते त्यांना
कमकुवत म्हणतात. जे नेते स्वतः आक्रमक तसेच आक्रस्ताळेपणा साठी प्रसिद्ध आहेत
त्यांच्या दृष्टीने संयम म्हणजे कमकुवतपणा आहे हे क्षणभर मान्य करता येते पण
भाजपाचे आक्रमक नेते स्वतःच्या पक्षाच्या एक राज्य पातळीच्या नेत्या समोर हतबल
होतात, लोटांगण घालतात त्यावेळी ते सशक्त की कमकुवत?
केंद्रातील सरकार
आघाडीचे आहे. पंतप्रधान सहकारी पक्षाचे नेते असोत की मंत्री यांना आवर घालण्यास
असमर्थ असा प्रचार करताना ते एक कमकुवत व्यक्तिमत्व तेच भाजपच्या नेत्यांना
येडियुरप्पा लोटांगण घालण्यास भाग पडतात ते देखील केंद्रीय नेत्यांना एक राज्य
पातळीचा नेता त्यावेळी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना काय म्हणावे? यांच्या पक्षातील
काही आमदार विधानसभेत पोर्न व्हिडीओ(अश्लील चित्रफीत) पाहतात त्यांना देखील साधा
आवर घालणे जमत नाही म्हणून गुजरात राज्य विधान सभेत याच पक्षाचे आमदार याच
प्रकारची पुनरावृत्ती करतात. भाजपा श्रेष्ठी स्वतःचे आमदार नियंत्रीत करू शकत
नाहीत मात्र पंतप्रधानांनी दुसरया पक्षाचे केंद्रीय नेत्यांना आवरावे-नियंत्रीत
करावे अन्यथा कमकुवत? थोडक्यात दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ शोधणाऱ्या माणसाला
स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
वर्तमान मानवी
समाजाची हीच व्यथा आणि कथा आहे. मानवाला स्वतःचे दोष दिसत नाहीत किंबहुना स्वतः
मध्ये काही दोष किंवा त्रूटी आहे याबद्दल मानवाला मुळात माहिती नाही तर ज्ञान
किंवा जाणीव असणे फार दूर अंतरावर आहे. वर्तमान समाजावर परपारीक्षणाचा प्रभावी
पगडा आहे यामुळे माणूस नेहमी दुसऱ्यांचे परीक्षण करतो तसेच आत्मपरीक्षण करण्यापासून
वंचित राहतो. समाजात ज्याला स्वतःचा शेंबुड पुसण्याची अक्कल नाही तोसुद्धा इतरांना
अक्कल शिकवतो तसेच इतरांची अक्कल काढतो, लायकी ठरवतो.
जगात कोणताही माणूस
परिपूर्ण नाही. प्रत्येक मानवाला स्वाभाविकरित्या मर्यादा सोबत स्वतंत्र आहे.
कोणत्या व्यक्तीने काय करावे हे ज्याचे त्याने ठरवावे मात्र दुसऱ्यांचे निर्णायक
होण्याचा प्रयन्त करता आपण आपली अक्कल पाजळणे व्यतिरिक्त काहीच नाही. दुसऱ्यांचे
दोष ते देखील स्वतःच्या स्वाभाविक निकषावरून ठरवणे म्हणजे अकलेचे दिवे लावण्याच्या
प्रकार आहे. आपल्या आकलेला मर्यादा आहेत त्या उघड्या पडण्यापेक्षा त्यांच्या
मर्यादेत राहणे उत्तम कारण झाकली मुठ सव्वालाखाची.
आपण दुसऱ्यांचे दोष शोधून
त्यामध्ये सुधारणा करून जगात सुधारणा होणार नाही कारण मुळात दोष दृष्टी आहे, खरे
आपल्या डोळ्यात असणारे जे मुसळ आहे तेच दुसऱ्यांच्या डोळ्यात असणारे कुसळ भासते
यामुळे प्रथम मुसळ दूर करा कुसळ दिसणार नाही. बघा प्रयन्त करून आत्मपरीक्षण झेपते
का?
Comments
Post a Comment