विरोधक ते शत्रुत्व
परिवर्तन हा निसर्ग
नियम आहे तसेच निसर्गातील कोणताही घटक याला अपवाद नाही. तसेच निसर्गातील प्रत्येक
घटक स्वतःचे अद्वितीय असे अस्तित्व बाळगून आहे. माणूस देखील निसर्गातील एक घटक आहे
यामुळे त्याच्या एकंदरीत जीवनात परिवर्तन घडतात, प्रत्येक माणूस स्वतःची भिन्नता
जोपाण्याचा प्रयन्त करतो.
मानवाचे मत असो की
विचार धारा ती प्रत्येकाला स्वतंत्र आहे. अर्थात काही प्रमाणात काही व्यक्तीमध्ये
काही मतांच्या बाबत समानता असते मात्र त्याच ठिकाणी भिन्नता देखील असते. थोडक्यात
मत मतांतर ते मतभेद असणे हे स्वाभाविक तसेच नैसर्गिक आहे. वर्तमान काळात मानवाला
स्वतःचे मत हेच अंतिम सत्य वाटण्याचे प्रमाण लक्षणीय आहे यामुळे मत-मतांतर ते
मतभेद निर्माण होतात त्या ठिकाणी कलह ते वादंग निर्माण होतात. कालांतराने त्याचे
शत्रुत्त्व मध्ये रूपांतर होते.
थोडे भूतकाळात
डोकावले तर याप्रकारची अवस्था किंवा चित्र होते का? नाही. दोन व्यक्ती मधील मैत्री
व त्याची परस्पर विरोधी विचारधारा असणे हे चित्र सर्रास पाहण्यास मिळत होते. एका
घरातील असो की गावातील दोन व्यक्ती परस्पर विरोधी विचारधारेचे, राजकीय पक्षाचे
समर्थक-विरोधक असताना देखील त्याची मैत्री अखंड असायची. आज या प्रकारचे चित्र फार
दुर्मिळतेने पाहण्यास मिळते. आज विरोधक म्हणजे शत्रू समजला जातो तसेच त्याला
त्याप्रकारची वागणूक देण्यात येते.
आज एखादा विरोधी
विचारधारेचा असो की पक्षाचा असो त्याच्या समवेत संवाद होते की विवाद होते. अगदी
ग्रामीण भागात देखील पहा राजकीय पक्षाचे समर्थक-विरोधक यांच्या दरम्यान शत्रुत्व
असून संवाद कमी विवाद अधिक असतात. तसेच कोणत्याही सामाजिक सांकेतिक स्थळाला भेट
द्या माणूस म्हणतो विवाद नको. थोडक्यात वैचारीक देवाण-घेवाण होते का? आता वैचारीक
देवाण-घेवाण पेक्षा आरोप-प्रत्यारोप यांच्या फैरी झडतात.
निसर्गातील परिवर्तन
दोन ध्रुवा दरम्यान असते. मित्राचा शत्रू होणे स्वाभाविक आहे तसेच विरोधक देखील
शत्रू होणे स्वाभाविक आहे मात्र शत्रूचा मित्र होणे ते विरोधक मित्र होणे देखील
स्वाभाविक आहे फक्त प्रथम वर्गवारीत अहंकाराची स्वाभाविकता तेच दुसऱ्या वर्गवारीत
विवेकाची स्वाभाविकता आहे. कधी काळी भारतीय संस्कृती ही विवेकाची होती यामुळे
विरोधकात मैत्री होती पण वर्तमान काळात अहंकाराची संस्कृती असल्याने समर्थकात
देखील शत्रुत्व असल्याचे निदर्शनास येते.
विरोधक असो की निंदक
तो आम्हाला आमच्यातील त्रूटी-कमतरता दर्शवण्याचा प्रयत्न करतो. जर आम्ही त्यावर
काम केले तर त्रूटी-कमतरता कमी-अधिक प्रमाणात दूर करता येतात यामुळे आम्हाला
आमच्या व्यक्तीमत्वाचा विकास साध्य करता येणार आहे. आम्हाला आमच्यातील
कमतरता-त्रूटी समजतात किंवा जाणवतात असा नियम नाही. विरोधक-शत्रू-निंदक आमचे बरेच
काम हलके-सोपे करून देतात पण आम्ही त्यांचा विचार करताना विरोधक-शत्रू-निंदक असाच
करतो कारण अज्ञान. निसर्गातील परस्परविरोधी घटक हे वास्तवात परस्पर पूरक-सापेक्ष
असतात. विरोधक असो की शत्रू तो आपला पूरक तसेच सापेक्ष आहे याची आम्हाला माहिती
नाही तर ज्ञान कधी होणार.
साधू-संत सांगतात की
निंदकाचे घर असावे शेजारी याबद्दल सगळ्यांना माहित आहे पण त्यामागील ज्ञानाचा अभाव
विरोधक असो की समर्थक यादरम्यान शत्रुत्व निर्माण करतो तसेच मैत्री निर्माण
करण्यापासून परावृत्त करतो. वर्तमान मानव प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहण्याचा ते
करण्याचा प्रयत्न करतो मात्र राजकारणा पलीकडे एक विश्व आहे तसेच त्यापलीकडे देखील
समंध असतात. दुर्दैवाने माणसाचे स्वतःचे विश्व संकुचित होत असल्याने त्याला
याविश्व तसेच संमंध संदर्भात विस्मरण होत आहे. बघा थोडा विचार करून तसेच स्मृतींना
उजाळा देऊन पहा किंवा जरा इकडे-तिकडे पहा ज्या वडिलधारी मंडळी आहेत त्यांचा सोबत
चर्चा करून पहा म्हणजे प्रत्यय मिळेल.
वर्तमान हाच
भविष्याचा पाया आहे. वर्तमानात आम्ही ज्या दिशेने वाटचाल करणार त्यानुसार भविष्य
घडणार आहे.
Comments
Post a Comment