अतिरेकी युग
वर्तमान काळाला विज्ञानाचे-स्पर्धेचे युग समजण्यात येते. अर्थात जशी मानवाची दृष्टी तसे त्याचे आकलन त्याप्रमाणे त्याचे निकष तसाच निष्कर्ष आहे. विज्ञानाची आवड तसेच निवड करतो त्याला विज्ञान युग भासते तसेच स्पर्धा संदर्भात आहे. काही व्यक्ती अध्यात्मिक विचारधारा मानतात किंवा अनुकरण करतात यामुळे कलियुग असल्याचे समजतात. तेच काहींना प्रगतीचे युग भासते थोडक्यात व्यक्तीनुसार युग कोणते यासंदर्भात मत-मतांतर आहे.
मला स्वतःचा तसेच मानवाचा स्वभाव यामध्ये स्वारस्य असल्याने मी स्वभिविक पातळीला पाहतो तसेच स्वाभाविक निकषावर निष्कर्ष घेतो त्यावेळी मला वर्तमान युग हे मानवी अतिरेकाचे युग भासते. दहशतवाद्यांना अतिरेकी हे एक समानार्थी नाव आहे पण मी त्या अनुशंगाने म्हणजे दहशतवादी युग असे संबोधन करीत नाही तर स्वाभाविक पातळीला मानवाचे जे काही अतिरेकी आचरण आहे त्या अनुषंगाने अतिरेकी युग असा शब्द प्रयोग करीत आहे.
वर्तमान मानवी जीवनात कोणता मानव कोणत्या ठिकाणी अतिरेक करणार याच नियम भरवसा नाही मात्र जो मानव अतिरेक करतो तो स्वतःच्या कृतीला अतिरेक समजत नाही. मुळात अतिरेक म्हणजे काय? ज्याठिकाणी मर्यादा उल्लंघन घडते. अतिरेक ही कृती नसून एक निष्पत्ती आहे. मर्यादा उल्लंघन ही कृती आहे. अर्थात माणूस मर्यादा समजतो त्यांचे पालन करतो मात्र समज सोबत असणारा गैरसमज दुर्लक्षित करण्यात येतो कारण जागरुकतेचा अभाव. जागरुकतेचा अभाव कारण अज्ञान मात्र वर्तमान मानव स्वतःला ज्ञानी समजतो तसेच स्वतःचे अज्ञान दुर्लक्षित करतो.
मर्यादा समजणे ते मर्यादांची जाणीव असणे यामध्ये जमीन-अस्मान इतके अंतर आहे. समाजाच्या स्वरुपात बदल होते त्याप्रमाणे मर्यादा बदलतात मात्र ज्याठिकाणी जाणीव असते त्याठिकाणी बदल होत नाही तर पालन होते. तसेच ज्यांना मर्यादा संदर्भात माहिती-समज असतो त्याव्यक्ती मर्यादा उल्लंघन करण्यास एक प्रकारचा पुरुषार्थ समजतात.
वर्तमान मानवाच्या आचरणात मर्यादा संदर्भात भान किंवा जाण आहे का? या प्रश्नाचे उत्तर इतरत्र शोधण्याची गरज नाही तर स्वतःचे आचरण पहा. आपल्या अपेक्षांना काही मर्यादा आहेत का? आपल्या लोभ-हव्यासाला काही मर्यादा आहेत का? जग काय करते किंवा जगाने काय करावे यासंदर्भात आपण स्वतःला निर्णायक समजतो का? तुला कळत नाही, तुला समजत नाही, तू गप्पा बस यासारख्या वाक्यांचा वापर आपण करतो किंवा नाही?
आपण इतरांची लायकी-पात्रता ठरवतो का नाही? आपण आपले मत सत्य मानतो का नाही? आपण स्वतःला खूप काही समजते किंवा ज्ञानी समजतो की नाही? आपण स्वतःला इतरांपेक्षा उच्च समजतो की नाही? या समस्त प्रश्नांची उत्तरे निश्चित होकारार्थी असणार कारण सगळे करतात तेच मी करतो. सगळे इतरांच्यातील दोष व त्रूटी शोधतात तेच मी करतो. मात्र माझा मित्र किंवा शेजारी माझी त्रूटी शोधतो किंवा सांगतो त्यावेळी तो नालायक ते शत्रू होते?
थोडक्यात मी जे काही करतो त्यामाध्ये मर्यादा पालन आहे मात्र तोच प्रकार इतरांनी करता मर्यादा उल्लंघन आहे? मी संधी साधत भ्रष्ट आचरण करतो त्यावेळी माझा फायदा तेच मला संधी मिळत नाही यामुळे समारोचा भ्रष्टाचारी. मी करतो तो शिष्टाचार बाकीच्यांचा भ्रष्टाचार? या प्रकारची विचारधारा असो की कृती यामाध्ये कोणत्या प्रकारचे मर्यादा पालन आहे.
कोणत्याही घरात डोकावण्याचा प्रयन्त करून पाहा सगळे एकमेकांना नियंत्रीत करण्याचा प्रयत्न ते प्रकार करताना आढळतील. सगळे स्वतःला निर्दोष मानत इतरांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न तसेच प्रकार करताना आढळतील यामध्ये कोणत्या प्रकारचे मर्यादा पालन आहे?
वर्तमान मानवाची जीवनशैली पाहाता त्यामध्ये स्वतःच्या मुलभूत-निसर्गतः असणाऱ्या मर्यादांचे पालन होते की उल्लंघन होते? मी उल्लंघन करतो त्यावेळी ती एक प्रतिक्रिया-अपरिहार्यता असते मात्र हाच प्रकार इतर व्यक्ती करतात त्यावेळी जाणीव पूर्वक तसेच दहशतवाद असतो. थोडक्यात मानव स्वतः अतिरेक करतो मात्र इतरांना अतिरेकी ठरवतो कारण अज्ञान. थोडे स्वतःच्या स्वभावाचा मागोवा घेत परीक्षण करून पहा म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळेल तसेच आपण अतिरेकी युगात वावरत आहोत याची खातरजमा होणार आहे. जाणीव सारखा प्रत्यय नाही.
Comments
Post a Comment