लढा हक्कसाठी की कर्तव्यासाठी?
टीम अण्णा पुन्हा
एकदा नव्याने मैदानात उतरली यावेळी काही नवीन मुद्दे तसेच नवीन भिडू यांचा समावेश
आहे. काही मंत्र्यांची नावे घेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुदत देत कार्यारंभ
करण्यात आला. सध्या मार्च महिना सुरु असून वार्षिक ताळेबंद, जमाखर्चा करून समस्त
कर भरणा करण्याचा अंतिम महिना आहे. सरकारने ही मुदत अनेक वर्षापासून ठरवलेली आहे
मात्र आपल्या पैकी किती व्यक्ती मुदत अंतर्गत काम करतात? तसेच प्रसंगी मुदत बाह्य
काम कसे मुदत अंतर्गत करून घेतात हा संशोधनाचा एक विषय आहे. तसेच समस्त प्रकारचा
करभरणा करताना आम्ही किती इमाने-इतबारे भरतो हे एक उघड गुपित आहे.
हमाम में सब नंगे
होते है असे म्हणतात. सध्या घरात असो की समाजात अथवा देशात स्वतःचा नंगेपणा न
पाहता इतरांचा नंगेपणा पाहण्याची प्रथा-संस्कार तसेच संस्कृती रुजत आहे किंवा
रुजवण्यात येत आहे. आम्ही स्वतःचा भ्रष्टाचार असो की काळापैसा असो याच कधी विचार
करतो का? तसेच आम्ही कौटुंबिक असो की सामाजिक अथवा राष्ट्रीय कर्तव्यांचा विचार
करतो की अधिकारांचा विचार करतो?
टीम अण्णा नेहमी
अधिकाराची भाषा वापरते तसेच सरकारला सरकारच्या कर्तव्याची आठवण करून देताना मुदत
देखील प्रदान करते मात्र स्वतःच्या आचरणातील भ्रष्टता पाहण्याचे कष्ट घेते का? टीम
अण्णा मधिल किती सदस्य आत्मपरीक्षण करण्यास सक्षम आहेत हा देखील संशोधनाचा विषय
आहे कारण एकतर सातत्याने परपरीक्षण करतात तसेच अर्धा अभ्यास व अर्धा उपाय याबद्दल
अट्टाहास करतात.
एक नासका आंबा इतर
आंब्याना नासावतो त्यावेळी आपण नासका अंबा बाजूला काढतो त्यावेळी तो लहान की मोठा
किंवा कोणत्या जातीचा याच विचार करतो का? भ्रष्टचार समाजाला नासावतो त्यावेळी
मात्र सरकारी, नेता अशी मर्यादित उपचार प्रणाली का? इथे मूळ मुद्दा भ्रष्टाचार की
शासकीय भ्रष्टाचार? या संदर्भात मी पूर्वी एक ब्लॉग लिहिला आहे.
सरकार काय करते किंवा
सरकारने काय करावे याच अभ्यास ते ध्यास पासून धसास याफंदात हे आंदोलन अडकले असून
सामान्य माणूस व त्याचा भ्रष्टचार ना पहिला जातो ना वाच्यता केली जाते. गंमत
म्हणजे जे व्यक्ती सरकारला सामान्य माणसाच्या हक्काची तसेच सरकारच्या कर्तव्याची
आठवण करून देतात त्यांना स्वतःची कर्तव्य तसेच सरकारचे अधिकार दिसतात का?
आज ज्या कायद्याची
किंवा कारवाईची मागणी करण्यात येते त्याने भ्रष्टाचार निर्मुलन किंवा नियंत्रण
होणार का? यासंदर्भात निर्मुलन की नियंत्रण असा स्वतंत्र ब्लॉग आहे. मुळात आपण
स्वतःची कर्तव्य किती प्रामाणिक पणाने पार पडतो तसेच इतरांच्या अधिकारणाचा विचार
किती प्रामाणिक पणाने करतो याबद्दल स्वतःच्या अंतरंगात उतरून खातरजमा करून प्रत्यय
घ्यावा.
आज समाजात जोतो
इतरांचा निर्णायक होण्याचा प्रयत्न करीत आहे. इतरांनी काय करावे काय करू नये हे
ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यावेळी कर्तव्य व अधिकार यांचे सोयीस्कर स्मरण व
विस्मरण होते ते का? आपण जर विवेकाने विचार केला तर घरा घरात होणाऱ्या
संघार्षामागे स्वतःचा अधिकार तसेच इतरांची कर्तव्य यांचाच विचार आढळणार आहे. थोडे
उलटे आचरण करून पहावे म्हणजे स्वतःचे कर्तव्य तसेच इतरांचा अधिकार याच विचार तसेच
आचरण करून पहा म्हणजे घरात शांतता निर्माण झाल्याचे आढळणार आहे.
निर्णय आपल्या हाती
आहे स्वतःच्या अधिकारासाठी इतरांशी संघर्ष करायचा की इतरांच्या अधिकारासाठी किंवा स्वतःच्या
कर्तव्यासाठी स्वतःच्या अहंकारशी संघर्ष करायचा? जशी दिशा तशी दशा.
Comments
Post a Comment