असेल तर दिवाळी नाही तर शिमगा


आता उन्हाची तीव्रता वाढण्या सोबत पाणी आणि वीज टंचाई यांची जाणीव सुरु होते. पत्रकार असो की विरोधक यांना आयोजन-नियोजन यामधील त्रूटी दिसण्यास प्रारंभ होते. सामाजिक बौद्धिक कुपोषणाचा एक परिणाम असल्याने तहान लागल्या नंतर विहीर खोदण्याचा उपक्रम सुरु होते तसेच सगळे खापर सत्ताधारी मंडळीवर फोडण्यात येते. दरवर्षी उन्हाळा आला की असा प्रकार सुरु होते.
सत्ताधारी पक्ष असो की अधिकारी वर्ग या नियोजन किंवा आयोजन करीत नाहीत अश्यातला भाग नाही तर ते नियोजन व आयोजन कोलमडून पडते अर्थात यामध्ये काही अंमलबजावणी मधील त्रूटी असतात याबद्दल कोणाचेही दुमत नाही मात्र या कोलमाडण्यात सामान्य माणसाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे परंतु सत्ताधारी असो विरोधक अथवा पत्रकार सामान्य माणूस व त्याची भूमिका यांना सोयीस्कर रित्या दुर्लक्षित करीत फक्त सत्ताधारी व अधिकारी यांचे कान उपटण्याचा प्रयन्त करतात. पण सामान्य व्यक्तीची भूमिका असो की प्रबोधन-जागरण यांना दुर्लक्षित करण्यात येते.
सामान्य माणसाची मानसिकता म्हणा की स्वभाव गुणधर्म म्हणा यामुळे तो समस्त नियोजनावर पाणी फिरवतो. सामान्य माणसातील असेल तर दिवाळी नाहीतर शिमगा करण्याची सवय-गुणधर्म-स्वाभाविकता मुळे उपलब्ध होणारा घटक काटकसरीने-बारकाव्याने वापरण्यापेक्षा उधळपट्टी करण्यात येते. नैसर्गिक साधन-संम्पती, इंधन, उर्जा यांचा वापर करताना माणूस सर्रास उधळपट्टी करतो. अर्थात तो यासाठी ठराविक रक्कम मोजतो मात्र हे समस्त घटक अमुल्य आहेत. या घटकांची खरी किंमत तुटवडा निर्माण होताच जाणवते. त्यावेळी देखील दुसऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडण्यात येताना स्वतःची उधळपट्टी दुर्लक्षित करण्यात येते.
एकाच घरात चार व्यक्ती वेगवेगळया खोलीत बसतात त्यासाठी लाईट, पंखा ते प्रसंगी टीव्ही सुद्धा वेगळे सुरु असतात. हेच सगळे एकाच खोलीत बसून काम करू लागले तर उर्जा तसेच पैसा यांची बचत होणार तसेच आपसात संवाद साधने ते एकमेकांना वेळ देणे यासारखे प्रकार घडतात. आज एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींचा आपसात संवाद घडत नाही. अनेक घरात टीव्ही नेहमी stand by असतो यामुळे उर्जेचा अपव्यय होते. याठिकाणी माणूस स्वतःची सोय साधताना किंवा कंटाळा-जागरुकतेचा अभाव झाकताना स्वतःची उधळपट्टी पाहतो का?
मी गेली दोन वर्ष माझ्या दुकानातील पंखा वापरत नाही. थोडी गैरसोय होते मात्र माझ्या परीने शक्य त्याठिकाणी व शक्य तेवढी बचत करतो याचा मला लाभ होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण राष्ट्रीय कर्तव्य करतो याचे समाधान आहे. मी माझी मोटार सायकल देखील बंद ठेवली यामुळे जवळपास कमीत कमी महिना ५ ते ६ लिटर बचत होते, तितक्या रकमेची बचत होते, शरीराचा व्यायाम होते, आरोग्य राखण्यास मदत होते. गाडी बंद यामुळे तीचे धुणे-पुसणे बंद यातून पाणी बचत.
आपल्या देशात सर्वात जास्त अपव्यय होते तो पाण्याचा. पाणी उपलब्ध असेल तर एका बादली पाण्यात होणाऱ्या कामाला चार बादली पाणी वापरण्यात येते. पाणी असेल तर दोन दिवसाला गाड्या धुण्याचा उपक्रम असतो. आणि पाणी नसेल तर चार बादली पाण्याचे काम फक्त अर्ध्या बदलीत, गाडी धुणे फार लांब फक्त कोरड्या फडक्याने पुसण्यात येते.
पावसाळ्यात बरेच पाणी वाहून जाते पण ते साठवणे किंवा जमिनीत मुरवणे यासाठी सामान्य माणूस प्रयन्त करतो का? हे सरकारचे काम-कर्तव्य असा विचार करून पळवाट शोधण्यात येते. आपण लोकशाहीत आहोत यामुळे आपणच राजा आणि प्रजा आहोत याचे विस्मरण होता कामा नये. लोकशाहीत प्रत्येक नागरिकांना काही राष्ट्रीय कर्तव्य आहेत त्याचा विचार केला का? शक्यता कमी आहे कारण सध्या अधिकारासाठी लढा देताना कर्तव्याला मुठमाती देण्याचा प्रकार, संस्कार, संस्कृती ते फँशन आहे. गंमत म्हणजे असा प्रकार करणाऱ्यांना मिडिया असो की समाज डोक्यावर घेतात व समाजसेवक म्हणतात. यावर्गवारीत मोडणारे खरोखर सेवा करणारे सेवक की मेवा खाणारे सेवक याबद्दल समजत नाही कारण यांच्या संस्था कडे लाखो ते करोडो रुपयांचा निधी येतो. काही असो समाज सेवकाने समाज प्रबोधन करावे एवढी माफक अपेक्षा अर्थात हे प्रबोधन हक्क किंवा अधिकार यापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारे असावे.
सामान्य माणसाने असेल तर दिवाळी करताना नंतर येणारा शिमगा दुर्लक्षित करू नये. ज्या संस्कृती मध्ये दिवाळी आहे त्याच संस्कृती मध्ये शिमगा आहे तो देखील दिवाळी नंतरच येतो. दिवाळी नसेल तर शिमगा देखील नाही. पण आपल्या देशात माणूस स्वतः दिवाळी करतो मात्र शिमगा दुसऱ्यांच्या नावे करतो. आपण स्वतःचे आचरण पाहून खातर जमा करून घ्यावी म्हणजे प्रत्यय मिळणार आहे.
प्रयन्त करून पहा जितकी बचत करता येणार तितकी करावी. अर्थात मुबलक उपलब्धता असो की टंचाई असो काटकसर करून इंधन, उर्जा, नैसर्गिक साधनांचा वापर करावा ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते