पुस्तकामागील कथा व पुस्तक
मी काल फेसबुकवर
माझ्या ईबुक स्वरुपात होणाऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ अपलोड केले. ज्या प्रमाणे
प्रत्येक घटनेला एक इतिहास-पार्श्वभूमी असते त्याच प्रमाणे या पुस्तकामागे एक
कथा-इतिहास आहे.
माझा विवाह पार
पडल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होते त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी
माझ्या काही नातेवाईकांना हात जोडत काही चुकले असेल तर क्षमा करावी असे सांगितले
त्यावेळी माझे एक नातेवाईक त्यांना म्हणाले की तुम्ही मुलगी देऊन चूक केली. अर्थात
हे माझ्या अपरोक्ष घडले मात्र घरी गेल्यानंतर समजले.
दोन दिवसांनी मी
माझे गुरु डॉ.संजय शिवदे यांच्या पाया पडण्यासाठी गेलो त्यावेळी त्यांनी माझ्या
पत्नीला सांगितले की तू भाग्यवान आहेस हा एक चांगला विचारवंत असून भाविकाळात एक
उत्तम लेखक-विचारवंत होणार आहे फक्त तुला थोडे सांभाळून घ्यावे लागेल.
एकच व्यक्ती
संदर्भात दोन परस्पर विरोधी मत यामुळे पत्नी थोडी गोंधळी यामुळे तिने विचारले
यातील योग्य कोण? माझे उत्तर दोघे योग्य तसेच अयोग्य आहेत कारण दृष्टी तशी सृष्टी.
मला माझे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व आहे. कोणता व्यक्ती, माझा कोणता पैलू,
कोणत्या दृष्टीने पाहणार, तसेच कोणत्या कसोटी वर निष्कर्ष घेणार त्याप्रमाणे
त्याला दिसणार( माझे व्यक्तिमत्व) भासणार आहे.
दृष्टी तशी सृष्टी
हे मला असो की माझी पत्नी अथवा मित्र या सगळ्यांना माहित होते तसेच आहे मात्र
माझ्या मनात दृष्टी तशी सृष्टी का व कशी? यासारखे प्रश्न निर्माण होण्यास प्रारंभ
झाला. प्रश्न कोणताही असो त्याचा मागोवा घेणे-उकल करणे हा माझा स्वभाव आहे यामुळे
मी माझ्या प्रश्नांचा मागोवा घेण्यास प्रारंभ केला त्यामधून जे काही मंथन घडले ते
शब्द स्वरुपात कागदावर उतरण्यास जवळपास तीन वर्ष जावी लागली, त्यानंतर पुस्तकाचे टायपिंग-संपादन
करण्यात वर्ष गेले. श्री. कुमार केतकरांची प्रस्तावना मिळवण्यास दीड वर्षाचा
कालावधी लागला.
दी.५/४/२०१२ वार-
गुरुवार महावीर जयंती रोजी या ई-पुस्तकाचे प्रकाशन माझे गुरु डॉ.संजय शिवदे
यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. या पुस्तकात स्वभाव(धर्म) तसेच
सापेक्षता(विज्ञान) यांचा अनोखा संगम आहे. या पुस्तकामध्ये इ.स.१९९२ ते २००७ या कालखंडात
मी जे काही शिकलो-ज्ञान प्राप्त केले त्याचे सार आहे. यापुस्ताकामध्ये मसालेदार
किंवा चटपटीत असे काहीच नाही मात्र सकस व सात्विकपणा निश्चीत आहे.
श्री.कुमार केतकर
यांनी प्रस्तावनेच्या आरंभी जे लिहिले ते थोडक्यात पुढील प्रमाणे.
डॉ.पूष्कर कोठडिया
यांनी एक विलक्षण असा तत्वचिंतनात्मक लेखनाचा वेगळा प्रयत्न केला आहे. तसे पहिले
तर स्वभाव सापेक्षता व मी एक दहशतवादी हे दोन स्वतंत्र असे छोटेखानी ग्रंथ आहेत.
या दोन्ही ग्रंथामध्ये आपल्या जीवनाला वेढनार्या अनेक गोष्टीवर सखोल मनन केले आहे.
या दोन्ही पुस्तकांचा विषय गंभीर असला तरी त्याचे निरुपण सोप्या शब्दात तसेच
दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन मांडला आहे.
मी दोन्ही पुस्तके
अनेक मान्यवरांना दिली त्याच्या स्वभाव सापेक्ष प्रतिक्रिया देखील मिळाल्या हाच
माझ्या दुष्टीने प्रत्यय आहे. प्रत्येकाची प्रतिक्रिया भिन्न आहे. कोणाला यामध्ये
स्वभावाचे विश्लेषण-पृथ्थकरण आढळते तर कोणाला अध्यात्म तेच कोणाला आत्मचिंतन
वाटते, तत्वज्ञान वाटते, आपण स्वतःच्या जीवनाचा मागोवा घेण्याचा प्रयन्त करता
पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचा प्रत्यय मिळणार आहे.
आज अनेकांना डॉ.संजय
शिवदे यांनी केलेली भविष्यवाणी-भाकीत योग्य वाटते तेच कोणाला नातेवाईकाने केलेले
भाष्य योग्य आढळते. तुमचा स्वतःचा विचार काय? माझ्या बद्दल मत काय? हे तुम्हाला
तुमचा दृष्टीकोन, आकलन, मुल्यांकन एका शब्दात स्वभावाचा प्रत्यय देणार आहे. बघा
विचार करून.
Comments
Post a Comment