जावई शोध
मी यापूर्वी साधुसंत
की संधी साधून संत असा ब्लॉग लिहिला त्याचा प्रत्यय घ्यावयाचा असेल तर भारतामधील
अधात्माचे एक संस्थान प्रमुख जे जीवन जगण्याची कला पैसे घेऊन शिकवतात त्याचे
वक्तव्य तसेच कृती पहावी.
शासकीय शिक्षण
संस्था मध्ये शिक्षण घेणारे नक्षलवादी होतात यामुळे शिक्षण संस्थांचे खासगीकरण
करावे या आशयाचे त्यांनी वक्तव्य केल्याचे समजते. भारतीय समाजातील बहुतेक जनता ही
नक्षलवादी म्हणावी लागेल कारण शासकीय शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेतले आहे. मी
स्वतः सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे.
स्वतःला अध्यात्मिक
गुरु समजणारे किंवा म्हणवणारे यांना नक्षलवाद असो की दहशतवाद अथवा कोणताही वाद
यामागे असणारा अहंकार जर दिसत-समजत-जाणवत नसेल तर यांच्या अध्यात्मिक ज्ञान
संदर्भात व्यापक प्रश्न चिन्ह निर्माण होते. तसेच मुलांची वास्तविक जडण-घडण वर
घरातील संस्कारांचा व्यापक तसेच प्रभावी पगडा असतो थोडक्यात घरातील संस्कार
पायाभरणी करणारे असतात. या तथाकथिक गुरुदेवांना घरातील संस्कार दिसत नाहीत?
कोणताही उच्च कोटीचा
शिल्पकार असो तो प्रत्येक दगडाला हवा तसा आकार देत शिल्प घडवू शकतो का? दगडात जर
गुणधर्म असतील तरच दगडातून शिल्प साकारता येते. शिल्पकार फक्त संस्कार करतो पण
दगडाने जर संस्कार ग्रहण केला तर उपयोग होते. संस्कार करणारा जितका महत्वाचा असतो
तितकाच महत्वाचा संस्कार ग्रहण करणारा देखील असतो पण हे समजण्यासाठी प्रत्यक्ष
सोबत अप्रत्यक्ष पाहण्याची क्षमता पाहिजे.
सरकारी शाळा
नक्षलवादी निर्माण करते याप्रकारचे वक्तव्य करण्यामागे जे काही अप्रत्यक्ष आहे ते
पाहण्याचा प्रयत्न करून पाहावा. शिक्षणाचे खासगीकरण करावे म्हणजे माझे
पोशिंदे-बशिन्दे यांचा लाभ होणार त्यामधून मला कोट्यावधी रुपयांचे दान मिळणार व
आमचे संस्थान फाईव्ह स्टार आश्रम निर्माण करणार. सामान्य माणसाचे काय होणार
याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही.
शिक्षण व्यवस्था
संदर्भातील दुरवस्थेचा इतका कनवाळूपणा आहे तर स्वखर्चाने दर्जेदार मात्र मोफत
शिक्षण देणाऱ्या संस्थांचे देशभर जाले निर्माण करावे. पण जो माणूस अध्यात्माची
शिकवण मोफत देत नाही तो माणूस मोफत शिक्षण देणार का?
शिक्षण संस्था
सरकारी असो की खासगी त्यामध्ये त्रूटी निश्चित आहेत याबद्दल दुमत नाही मात्र
एकाच्या पारड्यात दान टाकण्याचे कारण काय? समाजातील जे भ्रष्टाचारी आहेत ते कोणत्या
संस्थेत शिक्षण घेणारे आहेत याचा थोडा मागोवा घेऊन पाहावा म्हणजे वास्तवाचा
प्रत्यय मिळणार आहे.
वास्तवात दोष
कोणत्याही व्यवस्थेत नसतो तर तो दोष पाहणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीत असतो. जशी
दृष्टी तशी सृष्टी भासते पण दिसणे व असणे यात अंतर असते हे ज्यांना समजते त्या
व्यक्ती तथाकथित अध्यात्मिक गुरूच्या वक्तव्याला एक जावई शोध व्यतिरिक्त काहीच
समजणार नाहीत.
Comments
Post a Comment