Posts

Showing posts from February, 2012

काखेत कळासा आणि गावाला वळसा

काखेत कळासा आणि गावाला वळसा अशी एक मराठीतील म्हण आहे. थोडक्यात आपल्या जवळ, हातात असणारी गोष्ट गावभर शोधत फिरणे. माणूस कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेताना जरा घाई-गडबडीत असतो कारण माझा पहिला नंबर किंवा आम्ही पहिले, तसेच सगळे म्हणतात धावले पाहिजे याची री ओढली पाहिजे नाहीतर जग काय म्हणेल? माणूस कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेताना जरा धांदरटपणा करतो. आपण जो मागोवा घेतो तो योग्य दिशेने आहे का? याचा विचार करण्यापेक्षा मी योग्यच दिशेने जात आहे किंबहुना बाकीचे अयोग्य दिशेने जातात, गल्लत करतात असा विचार करतो यामुळे वास्तवात दिशा भरकटते मात्र जाणीव होत नाही. मात्र इतर व्यक्ती दिशाहीन प्रवास करतात असा आभास ते आरोप करण्यात येतो. दहशतवाद संदर्भातील उदाहरण पाहू म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा याचा प्रत्यय मिळणार आहे. एकाच दहशतवादाचे अनेक अभ्यासक तसेच प्रत्येकाचे हाताळण्याचे विषय भिन्न पण आशय एकच आहे. दहशतवादात कोणाला राजकारण, धर्मकारण, अर्थकारण,....... असे अनेक कारण दिसतात. प्रत्येकाचे क्षेत्र त्याप्रमाणे कारण आहे. याठिकाणी प्रत्येक अभ्यासकाची काही संदर्भात ग्राह्यता आहे. मात्र मुलभूत घटकांचा अभ्...

लोका सांगे ब्रम्ह ज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषण.

लोका सांगे ब्राम्ह ज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषण ही एक मराठी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय घ्यायचा असेल तर टीम अन्नाचे रण धुरंदर सेनानी श्री.अरविंद केजरीवाल यांचे आचरण पहावे. महाशय स्वतः स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य करण्याच्या फंदात पडत नाहीत मात्र जगाला त्यांची कर्तव्य बेंबीच्या देठापासून ओरडून सांगण्याचा प्रयन्त करतात. जो व्यक्ती स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य करीत नाही तो व्यक्ती राष्ट्रीय प्रश्न संदर्भात अधिकार वाणीने बोलण्यास पात्र आहे का? जो स्वतःच्या कर्तव्यात कसूर करतो त्याने इतरांच्या कर्तव्यातील कसूर संदर्भात आकांड-तांडव करावे का? तसेच मी कर्तव्याला कसूर करून देखील लायक तेच दुसऱ्याने कसूर केला की नाही यापेक्षा मला वाटतो म्हणून कसूर केला यामुळे तो नालायक? मुळात जो दुसऱ्यांची पात्रता ठरवतो, दुसऱ्यांनी काय करावे हे ठरवतो त्याचा इतका नालायक दुसरा कोणीही नाही. श्री.केजरीवाल हे स्वतः मतदान करण्याचे सोयीस्कररीत्या टाळतात वर निवडणूक प्रक्रिया सुधारणा करण्याच्या वल्गना करतात याचा अन्वयार्थ काय? स्वतः शासकीय सेवेत असताना जो करारनामा केला त्यानुसार सेवा मुक्त होताना भरावी लागणारी रक्कम भरण...

प्रसिद्धीचा हव्यास?

श्री.अरविंद केजरीवाल यांनी सध्या वादग्रस्त विधाने करण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी या प्रकारची वक्तव्य करण्यामागे प्रसिद्धीचा हव्यास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या समाजात वाद निर्माण होणारी वक्तव्य अथवा कृती करून प्रसिद्धी मिळवणे हा प्रकार नवीन नाही. नेत्यांच्या सभेत चप्पल भिरकावणे, नेत्यांना मारहाण करणे, नेत्यांवर चिखलफेक करणारी भडक वक्तव्य करणे यासारखे प्रकार वाढत आहेत कारण मिडिया या सारख्या घटनांना अवाजवी प्रसिद्धी देते. कृती करणारा माणूस एका क्षणात जगप्रसिद्ध होतो. भिन्न-भिन्न वाहिन्या या घटनेचे सातत्याने प्रक्षेपण करीत राहतात. याठिकाणी कृती करणारा भले बदनाम करण्यात येतो मात्र बदनाम हुवे तो क्या लेकिन नाम तो हुवा. थोडक्यात माणूस लक्षवेधी वक्तव्य वा कृती करण्यापेक्षा लक्ष वेधणारी कृती करण्यावर भर देण्याचे प्रमाण वाढत आहे. लक्षवेधी आणि लक्ष वेधणारी यामध्ये अंतर आहे. मी स्वतः एक लेखक आहे तसेच मी दहशतवादाचे लक्षवेधाणारे एक पुस्तक लिहिले असून त्याला ‘मी ’ एक दहशतवादी हे नाव दिले हेच मी एखाद्या नेत्याचे नाव घेत .....एक दहशतवादी हे नाव दिले असते तर खूप प्रसिद्धी-खप मिळणा...

प्रलोभानाचे बळी

सध्या भ्रमणध्वनी धारक तसेच इमेल धारकांना फोन किंवा मेल मिळते त्यानुसार मोठ्या रकमेची लॉटरी-बक्षीस तुम्हाला मिळाल्याचे सांगण्यात येते. काही व्यक्ती यावर विश्वास ठेवतात तसेच नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. फसवणुकीचा प्रकार समाजात नवीन नाही फक्त काळाच्या ओघात स्वरूप तसेच पद्धत यामध्ये बदल झाला आहे. कोणत्याही कालखंडातील माणूस हा फसतो कारण प्रलोभन. फासणारा माणूस स्वतः प्रलोभन पाहत आशा-अपेक्षा ते कल्पनाविलास करतो यामुळे फसगत होते. वास्तवात समोरचा माणूस फसवणूक करतो यापेक्षा माणूस प्रलोभन पाई भुलतो. प्रलोभन दिसताच धावतो मात्र क्षणभर थांबून समग्र विचार करीत नाही. तसेच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समोरच्या फसवणाऱ्या व्यक्तीच्या नावे शंख करण्यास सुरुवात करतो. प्रसंगी पोलीस व त्याची कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. कमी किमतीला मिळणारे सोने असो की कोणत्याही प्रकारचे समान माणूस फायद्याचा विचार करीत प्रलोभनाला भुलतो. तसे पाहता यासारखे प्रकार समाजात सातत्याने घडत होते तसेच आहेत व भविष्यात देखील घडत राहणार आहेत कारण प्रलोभन-लोभ-हाव या मानवी स्वाभाविक घटकांचा काही व्यक्ती फायदा-गैरफाय...

वाढता अनादर

काळाच्या ओघात परिवर्तन हा एक निसर्ग नियम-स्वभाव आहे. मानवी जीवन परिवर्तनाला अपवाद नाही. मानवी सामुहिक-सामाजिक जीवनात जे काही परिवर्तन घडत आहे त्यापैकी एक परिवर्तन म्हणजे वाढता अनादर. कधी काळी भारतीय सामाजिक जीवनात एकमेकांना सहजतेने आदर प्रदान करण्यात येत होता. आदर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट अथवा सशर्तता नव्हती. एक माणूस दुसऱ्या माणसाचा सहज आदर करीत होता. वर्तमान समाजात आदर करण्यापूर्वी काही अटी, काही शर्ती असतात. अर्थात या स्वाभाविक पातळीला असणाऱ्या अटी व शर्ती आहेत. आज समाजात कोणीही कोणाचा सहजतेने आदर करीत नाही मात्र सहजतेने अपमान करण्यात येतो. कधी काळी मान देण्याचा प्रकार होता तोच आता अपमान देण्यात परावर्तीत होत आहे. तसेच कधी काळी सहजता ते आता सशर्तता असा परिवर्तन प्रवास आहे. वर्तमान समाजात कोणीही कोणाचीही सहजतेने लायकी काढते. आपण कोणा संदर्भात काय बोलतो यांचे भान नसते. कोणत्याही वृत्त वाहिनीचा पत्रकार पहा त्यांच्या पेक्षा वयाने जेष्ठ असणाऱ्या व्यक्तीला देखील एकेरी संबोधन करणे, अरे-तुरे करण्याचा प्रकार पाहण्यास मिळतो. वृत्तवाहिनी असो की वर्तमान पत्र हे सामाजिक जीवनाचे प्...

अक्कल पाजळणे

प्रत्येक मानवाला ज्याची त्याची प्रज्ञा आहे मात्र काही व्यक्तींना स्वतःची प्रज्ञा इतरांपेक्षा जास्त असल्याचा संभ्रम असतो यामुळे या व्यक्ती स्वतःची अक्कल पाजळत फिरतात. मला या प्रकारचा एक व्यक्ती भेटला तसेच त्या व्यक्तीला स्वतःला नाचक्की करून घेण्याची किंमत मोजताना देखील पहिले आहे. मी मानसिकता व शारीरिक परिणाम या आशयाचे लिखाण करीत असताना एका औषध कंपनीत रिजनल मॅनेजर पदावर कार्यरत असणारा व्यक्ती भेटला. त्यावेळी सदर व्यक्तीने मला मुर्खात काढले कारण तो स्वतः शरीरविज्ञानशास्त्र या विषयातील उच्चशिक्षित होता. मी त्याला माझ्या लिखाणाचा आधार असणारे संदर्भ पुस्तक दाखवण्याचा प्रयन्त केला परंतु भारतीय लेखकाचे नाव पाहताच त्याने पुस्तक विश्वास ठेवण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा दिला. महिनाभराने तेच सदगुहस्थ पुन्हा भेटले. दरम्यान काळात दैनिक पुण्यनगरी मध्ये जसा विचार तसा आजार या मथळ्याखाली परदेशी विद्यापीठाचे संशोधन सुरु असल्यचा तसेच निष्कर्ष घेतल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. मी ते कात्रण त्याव्याक्तीच्या हातावर ठेवले. त्याक्षणी त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. एखाद्याने आपल्या मुस्काडात मा...

अनावर अधीरता

वर्तमान जीवन शैली म्हणजे धावपळ-गतिमानता असे समजले जाते. काही व्यक्ती यापुढे जाऊन जीवन म्हणजे गती-धावपळ समजतात. वास्तवात जीवन हे फक्त जीवन असून त्याकडे पाहणारा दृष्टीकोन तसेच अन्वयार्थ घेणारे आकलन निर्णायक आहे. सध्या समाजात कोणत्याही ठिकाणी पहा माणूस सतत घाई-गडबड करण्याचा प्रयन्त करीत असल्याचे निदर्शनास येते. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी माणूस अधीर झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. सामाजिक-राजकीय जीवनातील बदल असो की कृती ती झटकन झालीच पाहिजे. माझे एखादे काम असो ते झटकन झालेच पाहिजे. कोणत्याही दुकानात पहा, ग्राहक तत्परतेने सेवेची मागणी करतो. कोणत्याही व्यक्तीचे वक्तव्य असो की कृती शब्द कानावर पडता क्षणी किंवा घटना घडता क्षणी तत्परतेने प्रतिक्रिया देण्यात येतात. कार्य क्षेत्र कोणतेही असो किंवा काम कोणतेही असो माणूस तत्परतेने करण्याचा प्रयन्त करताना अती घाई संकटात जाई याला सोयीस्कररीत्या दुर्लक्षित करतो यामुळेच वेगाने वाहन चालवताना असो की शब्दांचा वापर करताना अथवा काम करताना अपघात, विवाद, कामाचा खेळखंडोबा होत असल्याचे निदर्शनास येते. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी माणूस लगीन घाई करतो मात्र घटस्फोट सुद्धा...

हमारा खून खून और तुम्हारा खून पाणी?

परवा एका नेत्याची मुलाखत पहिली त्यावेळी हसावे की रडावे तेच समजेना. नेता स्वतःच्या कार्यकर्त्यांचे मारहाणीत रक्त सांडल्याने दुसऱ्या नेत्याला दोष देत होता. गंमत म्हणजे या नेत्याचे कार्यकर्ते हाणामारी करण्यसाठी प्रसिद्ध-कुप्रसिद्ध आहेत. हेच कार्यकर्ते दुसऱ्यांचे रक्त सांडतात त्यावेळी त्यांच्या कृतीचा सार्थ अभिमान सांगणारा नेता मात्र स्वतःच्या कार्यकर्त्याचे रक्त पाहून व्यथित होतो? आम्ही करतो ती प्रतिक्रिया किंवा धडा शिकवणे मात्र तोच प्रकार दुसऱ्यांनी करताक्षणी गुन्हा. थोडक्यात आमचे सांडले तर रक्त आहे तेच दुसऱ्यांचे रक्त सांडून देखील पाणीच आहे. यासारखा प्रकार फक्त एक पक्ष अथवा राजकारणात घडतो असे नाही तर समस्त समाजात यासारखे प्रकार घडतात. तसेच यासारखे प्रकार फक्त भारतात घडतात असा नियम नाही. यासारखे प्रकार समस्त जगात घडतात. एक माणूस दुसऱ्या माणसाला जी काही वागणूक देतो, तेव्हा त्यामध्ये योग्यता-न्याय असतो मात्र त्याच प्रकारची वागणूक दुसरा माणूस आम्हाला देतो त्यावेळी अयोग्यता-अन्याय असतो. वास्तवात याठिकाणी भेदभाव आहे मात्र तो ना पहिला जातो, ना समजावून घेतला जातो. आम्ही एखाद्याची पात्र...

कायद्याचे तीन तेरा

भारतामध्ये कायदा व सुव्यवस्था यांची अवस्था काय? कायदा राहतो पुस्तकात व माणूस म्हणतो काय द्याचे बोला. भारतात जर कोणी कायदा उल्लंघन करताना सापडला तर तो सगळ्यात प्रथम कायद्याची माहिती न घेता काय द्यावयाचे याची विचारणा करतो. मुळात आम्हाला कायद्याचे ज्ञान कमी व काय द्यायचे याचे ज्ञान अधिक आहे किंबहुना यामुळेच आम्ही कायद्याचे पालन करण्याच्या फंदात न पडता स्वतःची सोय साधताना प्रसंगी दुसऱ्यांची गैरसोय व्यापक प्रमाणात करतो. कोणताही कायदा निर्माण करण्यामागे सामाजिक हित तसेच सामाजिक सुव्यवस्था निर्माण करणे व राखणे असा व्यापक विचार असतो मात्र मानव हा उपजत संकुचित विचार करणारा प्राणी आहे यामुळे तो कायद्याला बंधन समजतो. एक तर मणसाला बंधन आवडत नाहीत तसेच बंधन झुगारण्याचा प्रयन्त माणूस करतो. प्रसंगी माणूस बंधन नाकारतो. कदाचित यामुळेच माणूस कायद्याचे पालन करीत नाही. एकीकडे माणूस स्वतःला बंधन नको ही भूमिका घेताना मला बंधन नको मात्र इतरांना बंधन हवी आहेत असा विचार ते आग्रह करतो. माझे आचरण म्हणजे स्वातंत्राचा एक भाग आहे तेच इतरांचे आचरण म्हणजे स्वैराचाराचा एक भाग असतो. इथे मानवी स्वभावातील भेदभाव न...

एका हाताने टाळी वाजवणारे

समाजात सध्या एका हाताने टाळी वाजवणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. यासंदर्भात प्रत्यय घ्यायचा म्हटले तर कोणत्याही दोन व्यक्ती मध्ये कोणत्याही कारणास्तव सुरु असणारा कलह-वादंग पहा जो-तो स्वतःला निष्पाप-निरागस तसेच निर्दोष समजतो सोबत दुसऱ्याला दोषी- गुन्हेगार मानतो, तत्सम दावा करतो. कोणत्याही कलहात-विवादात-भांडणात दोन पक्ष असतात. जर एकच पक्ष असेल तर कलह-भांडण-विवाद होत नाही. कोणत्याही भांडणात सहभागी असणारे व्यक्ती दोष एकमेकाच्या माथी मारण्याचा प्रयन्त करतात. बऱ्याचदा कलहाचा मुद्दा राहतो बाजूला व हमरी-तुमरी ते गुद्देगिरी सुरु होते. काही व्यक्ती निखळ मुद्देगिरी करताना समग्र खानदानाचा देखील भूतकाळ काढतात तेच काही सात पिढ्यांचा उद्धार करण्यात धन्यता मानतात. थोडक्यात व्यक्तीचा स्वभाव त्याप्रमाणे त्याचे आचरण असते. दोन भांडी एकमेकावर आदळत-आपटत नाहीत तो पर्यंत आवाज निर्माण होत नाही. त्याच प्रमाणे दोन व्यक्ती मध्ये टकराव होत नाही तो पर्यंत कलह होत नाही. ज्या दोन व्यक्तीमध्ये टकराव होतो त्या दोघांची संयुक्त जबाबदारी-चूक-दोष असतो. मात्र मानव स्वभावानुसार दोष-जबाबदारी दुसऱ्या...

कोण कोणासाठी?

वर्तमान समाजातील मानवाचे राहणे-बोलणे-वागणे पहिले तर मनात सहजतेने प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे माणसासाठी संकल्पना की संक्ल्पनासाठी माणूस आहे? मुळात अनेकांना संकल्पना व सत्य यातील अंतरच माहित नाही यामुळे तो संकल्पना म्हणजे सत्य मानत आचरण करतो तसेच प्रसंगी यासंकल्पना साठी वास्तविक मानवाचा बळी दिला तसेच घेतला जातो. विशेष म्हणजे कधी काळी या संकल्पना मानवी समूहात अस्तित्वात नव्हत्या मात्र मानव अस्तीत्वा मध्ये होता. मानवाने उत्क्रांती करीत प्रवास करताना मानवाने भाषा, संस्कृती, प्रांत, जात-धर्म, वंश, राष्ट्र, देश या सारख्या संकल्पना निर्माण केल्या कारण आकलन तसेच सामाजिक सुलभता निर्माण होत समाजात एक प्रकारचा समन्वय निर्माण करता यावा. अर्थात कोणत्याही संकल्पनेला जन्म देताना त्यामागे चांगला-योग्य असा विचार होता मात्र चांगला-योग्य हे काळाच्या प्रवासात वाईट-अयोग्य यामध्ये रुपांतरीत झाले कारण परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. काळाच्या ओघात अनेक संकल्पना निर्माण तसेच नामशेष झाल्या तेच काहींचे अस्तित्व आजही आहे मात्र त्यामध्ये परिवर्तन झाल्याचे निदर्शनास येते. काळाच्या ओघात अनेक भाषा, संस्कृती, प्रांत,...

समर्थक आणि विरोधक

जगभरात अनेक प्रकारच्या विचारधारा, मत प्रवाह, राजकीय पक्ष आहेत. प्रत्येक विचारधारा असो की मत अथवा राजकीय पक्ष या सगळ्यांना काही समर्थक तसेच विरोधक आहेत. सामान्यतः समर्थक व विरोधक असे दोन भिन्न पक्ष समजण्यात येतात मात्र समर्थक हाच विरोधक आहे तसेच विरोधक हा समर्थक आहे. समर्थक हा अप्रत्यक्ष विरोधक आहे तसेच विरोधक हा अप्रत्यक्ष समर्थक आहे. माणूस एका विशिष्ट मताचे, विचारधारेचे अथवा राजकीय पक्षाचे समर्थन करतो त्यावेळी दुसऱ्या विरुद्धार्थी मताचा, विचारधारेचा, राजकीय पक्षाचा विरोध करतो. कोणत्या व्यक्तीने, कोणत्या मताचे, विचारधारेचे अथवा राजकीय पक्षाचे समर्थन वा विरोध करावा यासंदर्भात निर्णय घेण्यास प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे मात्र समर्थक तसेच विरोधक व्यक्ती एकमेकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर सहजतेने गदा फिरवण्याचा प्रयन्त करतात कारण अज्ञान. समर्थक व विरोधक व्यक्तिगत अज्ञान न पाहता आपसात संघर्ष-कलह-विवाद करतात. याठिकाणी माझ्या तो बाब्या तसेच तुझे ते कार्टे होणे स्वाभाविक आहे. कोणताही व्यक्ती योग्य त्याचे समर्थन करतो की त्याला जे योग्य वाटते-समजते त्याचे समर्थन करतो हा एक भाग आहे. तसेच ...

वाढ की घट

आज माझा ‘वाढ’दिवस आहे. अर्थात ही नाण्याची एक बाजू आहे. याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ‘घट’दिवस देखील आहे. येणाऱ्या प्रत्येक क्षणा सोबत वय वाढत असताना आयुष्यमान घटत आहे. वाढ होणे हे सकारात्मक असेल तर घट होणे नकारात्मक आहे. सामान्यतः सकारात्मक दृष्टीने पहावे असे म्हटले जाते मात्र कोणत्याही ठिकाणी कोणताही विचार करताना निखळ सकारात्मक किंवा निखळ नकारात्मक पाहणे म्हणजे अर्धवट पाहणे आहे. माणूस जे प्रत्यक्ष स्वरूप पाहतो त्याला ग्राह्य मानत वाटचाल करतो. अर्थात जे सुलभ आहे तेच प्रत्यक्ष स्वरूप आहे मात्र अप्रत्यक्ष स्वरूप पाहण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. काहींना सकारात्मक सुलभ वाटते तेच काहींना नकारात्मक सुलभ भासते. काही व्यक्ती वय वाढणे सकारात्मक मानतात तेच काही व्यक्ती नकारात्मक देखील मानतात तसेच त्या एकच दृष्टीने-अनुषंगाने विचार करतात. वाढदिवस साजरा करण्यात येतो मात्र घट दिवस साजरा करण्यात येतो का? जन्म दिवसाला वाढ दिवस साजरा करताना जो घट दिवस आहे त्याचे स्मरण होते का? माणूस असो की प्राणी, सजीव असो की निर्जीव ज्या क्षणात जन्माला आला त्याच क्षणापासून आयुष्य घटण्यास प्रारंभ होतो. जन्म म्हण...

आणि मी मेलो तर.........

शाळेत असताना निबंध लिखाण करण्यासाठी मी .....झालो तर असा एक विषय असतो. जीवनाच्या मुक्त विद्यापीठात लिखाण करताना विचार केला की मी मेलो तर. जन्मा सोबत मृत्यूचा प्रवास सुरु झाला तो उद्या अंतिम ठिकाणाला पोहचणार आहे. अर्थात तो मृत्यू क्षण भविष्यात असणार या बद्दल शंका नाही. माझा मृत्यू झाल्यानंतर जे सगळ्यांच्या बाबतीत होते तेच होणार आहे. यामध्ये नवीन किंवा वेगळे काहीच नाही. कोणाला दुखः होणार तर कोणाला आनंद होणार. कोणी हळहळ व्यक्त करणार तर कोणी म्हणेल बरे झाले. कोणी म्हणेल एक चांगला माणूस गेला तर कोणी म्हणेल एक वाईट माणूस गेला. कोणाच्या दृष्टीने एक लायक गेला तेच कोणाच्या दृष्टीने नालायक गेला. थोडक्यात जितक्या दृष्टी त्यानुसार त्यांची प्रतिक्रिया असणार. माझ्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीचे मत त्याप्रमाणे त्याची अभिव्यक्ती असणार. मला स्मशानात पोहचवल्या नंतर कदाचित श्रद्धांजली देण्यात येणार त्यामध्ये प्रसंगी माझ्यात असलेला व नसलेला चांगुलपणा सांगण्यात येणार नंतर जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाने निघून जाणार. काही व्यक्तींच्या दृष्टीने एक अस्तित्व संपले पण वास्तवात कोणते अस्तित्व संपले? शरीर ...

वाद

वर्तमान काळात मानवी समूहात अनेक वाद आहेत. वाद या शब्दाचे अनेक अर्थ तसेच अनेक अर्थानी एक शब्द आहे. वाद म्हणजे विचारधारा, मतप्रवाह तसेच अभिव्यक्ती देखील आहे. वाद विना संवाद किंवा विवाद होत नाही. वादाचे स्वरूप कोणतेही असो मात्र वाद ही मानवी स्वभावाची निष्पत्ती आहे. काही व्यक्ती वादाला मानवी आकलन-प्रज्ञा यांची निष्पत्ती मानतात परंतु मुळात आकलन मागे समग्र स्वभाव आहे दुसऱ्या शब्दात समग्र व्यक्तिमत्व आहे. वर्तमान समाजात प्रत्येक वाद भिन्न-भिन्न समजण्यात येतो म्हणजे हा वाद वेगळा तर तो वाद वेगळा करण्यात येते. प्रत्येक वादाचा अभ्यास करणारे तज्ञ देखील वेगवेगळे आहेत. वर्तमान समाजावरील विज्ञानाचा प्रभाव पाहता प्रत्येक गोष्ट भिन्न समजणे यामध्ये आश्चर्य नाही. भिन्नता ही एकांगी सापेक्षता आहे. प्रत्येक भिन्नता मागे एकता आहे. भिन्नता समजण्या-जाणवण्यासाठी एकता तसेच एकता समजण्या-जाणवण्यासाठी भिन्नता आवश्यक आहे. ज्याची त्याची जडण-घडण तसा स्वभाव त्याप्रमाणे आकलन. आकलन तसे आचरण व अभिव्यक्ती. एकता योग्य की भिन्नता योग्य? दोन्ही योग्य तसेच अयोग्य देखील आहेत कारण एकमेकाविना परिपूर्ण-समग्र होत नाहीत मात्र...

प्रेम व घृणा

आज प्रेमाचा दिवस साजरा करण्याची प्रथा-परंपरा आहे. पाश्चिमात्य देशात दिवस साजरा करण्यात येतो तसेच आपल्याकडे सन साजरा करण्याची प्रथा-परंपरा आहे. काही व्यक्ती प्रेमाचा दिवस साजरा करण्यास विरोध करतात गमंत म्हणजे या विरोध करणाऱ्या व्यक्ती देखील प्रेम करतात मात्र त्याच प्रेमासोबत कृतघ्नपणा करतात कारण मानवी स्वभाव. कृतघ्नता हा मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. अर्थात यामागे अज्ञान आहे. प्रेम करतात तेच प्रेमासोबत कृतघ्नपणा करतात. अर्थात हा प्रकार जाणीवपूर्वक करतात असे नाही तर हा प्रकार अनावधानाने घडतो. अनावधान मागे अहंकार आहे. अहंकार त्याठिकाणी घृणा-तिरस्कार येणार. घृणा व तिरस्कार यामध्ये प्रेमाची दुसरी बाजू आहे. प्रेम ही नाण्याची एक बाजू आहे त्याची दुसरी बाजू घृणा आहे. प्रेम ही विवेकाची निष्पत्ती आहे तर घृणा ही अहंकाराची निष्पत्ती आहे. प्रेम असो की घृणा या निखळ निष्पत्ती आहेत. काही व्यक्ती यांना कृती समजतात परंतु यामध्ये कृती नाही. प्रेम असो की घृणा करावी लागत नाही तर निर्माण-निष्पन्न होते. विवेकाचा भाव किंवा अहंकाराचा अभाव त्याठिकाणीच प्रेम आहे तेच अहंकाराचा भाव किंवा विवेकाचा अभाव त्...

स्पर्धा व मी

वर्तमान काळाला स्पर्धेचे युग समजले जाते. आज प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात स्पर्धा आहे. काही व्यक्ती जीवघेणी स्पर्धा असल्याचे मानतात तसेच स्पर्धा करतात व जीव जातो देखील. जाणारा जिवानिशी गेल्यानंतर कोणती व कशाची स्पर्धा करणार? असो स्पर्धा म्हणजे काय याचा कधी समग्र विचार करून पहिला का? मी किंवा माझ्याशी निगडीत आहे त्यालाच मिळावे असा विचार किंवा भावना स्पर्धा निर्माण करते. मी किंवा माझा नसेल तर स्पर्धा नाही. कोणत्याही ठिकाणी स्पर्धा त्याठिकाणी मी आहे तसेच मी सोबत येणारा अहंकार तसेच अहंकाराची लक्षणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात येणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. सर्वात प्रथम अज्ञान तसेच यामधून निर्माण होणारा तणाव. स्पर्धा करण्यामागे योग्य तसेच पात्र व्यक्तीला मिळावे असा विचार किंवा भावना नसते तर मलाच मिळावे यासाठी स्पर्धा करण्यात येते. कोणत्याही स्पर्धेत गुणवत्ता हा निकष असतो का? नाही. गुणवत्ता असणारा व्यक्ती स्पर्धा करीत नाही तर प्रयन्त करून पाहतो. गुणवत्ता असणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने स्पर्धा नसते तर कसोटी-परीक्षा असते तसेच तो कसोटीला उतरण्याचा प्रयन्त करतो. स्पर्धा करणारा ...

राष्ट्र पुरुष की जात-पात पुरुष?

सध्याचे जे काही सामाजिक वातावरण पाहण्यास मिळते त्यामध्ये राष्ट्र पुरुषांना एका विशिष्ट जात-पात पुरतेच बंदिस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक जात-पात आपल्या जाती मध्ये झालेल्या राष्ट्र पुरुषांना पकडून ठेवत मालकी हक्क दर्शवण्याचा प्रयन्त करताना त्यांना इतर जाती-धर्मातील राष्ट्र पुरुषांसोबत जणू काही घेणे देणे अथवा सोयरे-सुतक नसावे असे आचरण करीत आहेत. कोणत्याही सामान्य व्यक्तीला राष्ट्र पुरुष हे पद प्राप्त होत नाही तर ज्यांनी राष्ट्र निर्मिती मध्ये प्रसंगी घरादाराचा त्याग केला तसेच सामाजिक विचारसरणी मध्ये सुधारणा करण्याचा प्रयन्त केला त्यांना राष्ट्र पुरुष समजण्यात येते. राष्ट्र पुरुषांनी कोणत्याही प्रकारचे काम करताना एक ठराविक जात-पात अथवा धर्मासाठी काम केले नाही. प्रसंगी या पुरुषांनी जाती व्यवस्था वर आसूड ओढले आहेत. या पुरुषांनी स्वतःच्या जाती-धर्मातील व्यक्तीवर पुरोगामी संस्कार करण्याचा प्रयन्त केले मात्र वर्तमान काळात त्यांच्या जाती-धर्माच्या लोकांनी त्याच्या नावाचा फायदा घेत सोयीस्कररीत्या राष्ट्र पुरुषांना एकाच जाती-धर्मात बंदिस्त करण्याचा प्रकार सुरु ...