काखेत कळासा आणि गावाला वळसा
काखेत कळासा आणि गावाला वळसा अशी एक मराठीतील म्हण आहे. थोडक्यात आपल्या जवळ, हातात असणारी गोष्ट गावभर शोधत फिरणे. माणूस कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेताना जरा घाई-गडबडीत असतो कारण माझा पहिला नंबर किंवा आम्ही पहिले, तसेच सगळे म्हणतात धावले पाहिजे याची री ओढली पाहिजे नाहीतर जग काय म्हणेल? माणूस कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेताना जरा धांदरटपणा करतो. आपण जो मागोवा घेतो तो योग्य दिशेने आहे का? याचा विचार करण्यापेक्षा मी योग्यच दिशेने जात आहे किंबहुना बाकीचे अयोग्य दिशेने जातात, गल्लत करतात असा विचार करतो यामुळे वास्तवात दिशा भरकटते मात्र जाणीव होत नाही. मात्र इतर व्यक्ती दिशाहीन प्रवास करतात असा आभास ते आरोप करण्यात येतो. दहशतवाद संदर्भातील उदाहरण पाहू म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा याचा प्रत्यय मिळणार आहे. एकाच दहशतवादाचे अनेक अभ्यासक तसेच प्रत्येकाचे हाताळण्याचे विषय भिन्न पण आशय एकच आहे. दहशतवादात कोणाला राजकारण, धर्मकारण, अर्थकारण,....... असे अनेक कारण दिसतात. प्रत्येकाचे क्षेत्र त्याप्रमाणे कारण आहे. याठिकाणी प्रत्येक अभ्यासकाची काही संदर्भात ग्राह्यता आहे. मात्र मुलभूत घटकांचा अभ्...