हे चुकीचे आहे
हे चुकीचे आहे,
याप्रकारचे वाक्य आम्हाला सर्रास ऐकण्यास मिळते. एखाद्या व्यक्तीचे मत असो की कृती
अथवा एखादा निर्णय असो याचे काही व्यक्ती विश्लेषण करून चुकीचे असल्याचा निष्कर्ष
ते निर्वाळा देतात. अर्थात हा निर्वाळा योग्य आहे पण व्यक्तिगत दृष्टीने योग्य
असून दसऱ्या व्यक्तीचे मत, कृती किंवा निर्णय याचे सत्य नाही.
भारत-पाक फाळणी झाली
याला काही व्यक्ती तत्कालीन नेत्यांची चूक मानतात अर्थात काही व्यक्ती बरोबर देखील
समजतात हा भाग वेगळा तसेच काही व्यक्ती गांधीजी, पंडितजी तेच काही जीना यांना
जबाबदार मानत त्याची चूक समजतात. दुसऱ्यांच्या चुका शोधणे किंवा दुसऱ्यांना चुकीचे
ठरवणे वास्तवात अज्ञानाचे प्रमुख लक्षण आहे. याठिकाणी स्वतःचा स्वभाव ते आकलन
संकल्पना तसेच मर्यादा यांचे अज्ञान आहे. थोडक्यात दृष्टी तशी सृष्टी याचे अज्ञान
आहे. अर्थात माहिती आहे पण ज्ञान नाही किंवा कळते पण वळत नाही.
कोणत्याही व्यक्तीचे
कोणतेही मत म्हणजे एक निष्कर्ष आहे तसेच याच निष्कर्षाची निष्पत्ती म्हणजे कृती
आहे. तसेच याच निष्कर्षाचे एक स्वरूप म्हणजे निर्णय आहे. प्रत्येक निष्कर्षामागे
प्रक्रिया आहे मात्र अज्ञानी मानव या प्रक्रिया संदर्भात अनभिज्ञ आहे. मानव
स्वतःचे स्वभाव संदर्भातील अज्ञान न पाहता वाटचाल करतो यामुळेच दुसऱ्यांना अयोग्य,
चुकीचा ठरवण्याचा प्रयन्त करतो. मुळात दुसऱ्यांची योग्यता समजण्यासाठी एक योग्यता
लागते, एक पात्रता लागते थोडक्यात स्वभावाचे ज्ञान असावे लागते.
मानवाच्या कोणत्याही
कृती मागे स्वाभाविकता आहे. स्वाभाविकता विना कृती नाही. तसेच जो पर्यंत
स्वाभाविकता लक्षात येत नाही तो पर्यंत कृती मागील वास्तव ज्ञात होत नाही. मानवाची
जी काही नैसर्गिक स्वभावाची जडण-घडण आहे त्या नुसार कोणताही व्यक्ती जे काही
योग्य-बरोबर वाटते-भासते तेच करतो मात्र योग्य-बरोबर या स्वाभाविक आकलन संकल्पना
आहेत. योग्य असो की बरोबर म्हणजे काय याबद्दल प्रत्येकाचा स्वभाव निर्णायक आहे.
भारत-पाक फाळणी
काळातील सामाजिक परिस्थिती पाहता काही व्यक्तींनी त्यांच्या दृष्टीने योग्य असा
निर्णय घेतला. या निर्णया मागे त्याचे स्वतःचे स्वाभाविक निकष होते यामुळे काहींनी
फाळणीची मागणी केली तसेच याचे समर्थन व पाठपुरावा केला तेच ज्यांच्या स्वाभाविक
दृष्टीने फाळणी अयोग्य होती त्यांनी विरोध केला. प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व
तसेच स्वभाव आहे त्यानुसार त्यांचे निकष ते निष्कर्ष तसेच कृती आहे.
कर्ता व्यक्तीला
स्वतःचा स्वभाव आहे त्यानुसार त्याच्या संकल्पना तसेच आचरण आहे तसेच याचा मागोवा
घेणाऱ्या, समीक्षण करणाऱ्या, परीक्षण करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचा स्वभाव ते
संकल्पना आहेत. कोणी कोणते मत बाळगावे किंवा कोणत्या प्रकारचे आचरण करावे याचा
निर्णय ज्याने त्याने घ्यावा कारण स्वाभाविक स्वातंत्र आहे. थोडक्यात ज्याने
त्याने स्वतःच्या गणिताने चालावे मात्र स्वभावाचे अज्ञानी इतरांनी देखील माझ्याच
गणिताने वाटचाल करवी ही अपेक्षा बाळगतात तसेच अपेक्षेला साजेशी कृती करतात.
प्रत्येकाला
स्वतंत्र स्वभाव असून प्रत्येकाचा योग्य-बरोबर या संकल्पना भिन्न आहेत. आपण आपली
संकल्पना इतरांवर लादणे कितपत योग्य आहे? मुळात त्यासाठी काही पात्रता आहे का? या
दोन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. आपण जे काही योग्य समजतो ते जागतिक योग्य
असण्याचा समज अथवा दावा म्हणजे व्यक्तिगत अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन आहे. तसेच
कळत-नकळत व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षात संस्कार व संस्कृती यांचे प्रदर्शन आहे.
थोडक्यात स्वतःच्या स्वभावाचे जाहीर प्रदर्शन आहे. तसेच स्वाभाविक त्रूटी व अहंकार
यांचे प्रदर्शन आहे.
जीवन एक मुक्त
विद्यापीठ आहे तसेच आपण विद्यार्थी आहोत याची जाणीव असेल तर इथे शिकण्याची सुवर्ण
संधी आहे. ज्यावेळी दुसरा अयोग्य-चुकीचा भासतो त्यावेळी आपले बरोबर-योग्य संकल्पना
यांचे आकलन होते तसेच आपले योग्य व बरोबर मधील अयोग्य व चुकीचे यांचे देखील दर्शन
होते. फक्त सापेक्षता केंद्र आपला स्वभाव न मानता दुसऱ्यांच्या स्वभावाच्या
केंद्राला प्राधान्य द्यावे. दुसऱ्यांचे योग्य आपले अयोग्य आहे तसेच दुसऱ्यांचे
बरोबर ते आपले चूक आहे.
आपली दृष्टी असो की
आकलन हे परिपूर्ण नाही याचे भान राखले तर सगळे बरोबर आहेत त्याच प्रमाणे चूक देखील
आहेत. इथे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो तसेच आकलन करतो हे अनन्य साधारण महत्वाचे
आहे. तसेच आपली दृष्टी तशी सृष्टी आहे परंतु तीच सृष्टी व सृष्टीचे वास्तव-सत्य
नाही. दृष्टीला मर्यादा आहेत पण सृष्टीला मर्यादा नाहीत तसेच व्यक्तिगत
अज्ञानामुळे या सृष्टीला बंदिस्त करता काम नये. मात्र अज्ञानी मानव हा प्रकार करतो
व यातून सामाजिक समस्या निर्माण होतात. कळत नकळत माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड
मारून घेतो वर इतरांनी मारली असा कांगावा करतो.
दुसरा योग्य असो की
अयोग्य, चूक असो की बरोबर त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा स्वतःच्या दृष्टी मध्ये
सुधारणा करता, आपल्या आकलनात सुधारणा होणार आहे. आपल्या आकलनात सुधारणा म्हणजे
आचरणात सुधारणा यामुळे समाजात सुधारणा होतील तसेच स्वतःचे सोबत समाजाचे ज्ञान
वृद्धिंगत होणार आहे. त्याविना कोणत्याही प्रकारची मुक्तता नाही.
स्वतःचे परीक्षण
करून प्रत्यय घ्यावा. यामुळे योग्य मधील अयोग्य तसेच चूक मधील बरोबर लक्षात येणार
आहे. बाकी सांगण्याची गरज नाही कारण अनुभव मिळेल. अनुभवा सारखा गुरु नाही.
Comments
Post a Comment