काखेत कळासा आणि गावाला वळसा
काखेत कळासा आणि गावाला
वळसा अशी एक मराठीतील म्हण आहे. थोडक्यात आपल्या जवळ, हातात असणारी गोष्ट गावभर
शोधत फिरणे. माणूस कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेताना जरा घाई-गडबडीत असतो कारण माझा
पहिला नंबर किंवा आम्ही पहिले, तसेच सगळे म्हणतात धावले पाहिजे याची री ओढली
पाहिजे नाहीतर जग काय म्हणेल?
माणूस कोणत्याही गोष्टीचा
मागोवा घेताना जरा धांदरटपणा करतो. आपण जो मागोवा घेतो तो योग्य दिशेने आहे का?
याचा विचार करण्यापेक्षा मी योग्यच दिशेने जात आहे किंबहुना बाकीचे अयोग्य दिशेने
जातात, गल्लत करतात असा विचार करतो यामुळे वास्तवात दिशा भरकटते मात्र जाणीव होत
नाही. मात्र इतर व्यक्ती दिशाहीन प्रवास करतात असा आभास ते आरोप करण्यात येतो.
दहशतवाद संदर्भातील
उदाहरण पाहू म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा याचा प्रत्यय मिळणार आहे. एकाच
दहशतवादाचे अनेक अभ्यासक तसेच प्रत्येकाचे हाताळण्याचे विषय भिन्न पण आशय एकच आहे.
दहशतवादात कोणाला राजकारण, धर्मकारण, अर्थकारण,....... असे अनेक कारण दिसतात.
प्रत्येकाचे क्षेत्र त्याप्रमाणे कारण आहे. याठिकाणी प्रत्येक अभ्यासकाची काही
संदर्भात ग्राह्यता आहे. मात्र मुलभूत घटकांचा अभ्यास किती अभ्यासक करतात
यासंदर्भात प्रश्नचिन्ह आहे.
दहशतवाद या शब्दाची
नेमकी परिभाषा-संकल्पना-व्याख्या काय? जितके अभ्यासक तितक्या
परिभाषा-संकल्पना-व्याख्या आहेत. प्रत्येक अभ्यासक स्वतःची परिभाषा ग्राह्य मानतो
मात्र या परिभाषेची कधी खातरजमा करतो का? दहशत निर्माण करणारी कृती-विचार-वाद
म्हणजे दहशदवाद आहे का? याठिकाणी निष्पत्ती की उद्देश महत्वाचा मानवा?
निष्पत्ती महत्वाची
मानावी तर दहशत देणारा महत्वाचा की घेणारा महत्वाचा? इथे देणारा महत्वाचा मानवा
तरी अडचण व घेणारा मानवा तरी अडचण. देणारा दहशत देतो की आणखीन काही देतो याचा
निर्णय कश्यावरून करणार? तसेच देणाऱ्याने दहशत दिली मात्र घेणाऱ्याने घेतलीच नाही
तर? कोणत्याही देवाणघेवाण मध्ये देणारा तसेच घेणारा दोन्ही घटक महत्वाचे असतात
त्याविना देवाण-घेवाण होत नाही. देणाऱ्याने दिले नाही तरी काही महाभाग हिसकावून
घेतात. तसेच देणारा कितीही बळजबरी करो घेणाऱ्याने घेतलेच नाही तर मात्र व्यवहार
परिपूर्ण होत नाही.
समोरच्या व्यक्तीने
काही दिले त्याला आपण क्षणभर दहशत समजू मात्र घेणाऱ्याने जर दहशत घेतलीच नाही तर
समोरचा व्यक्ती दहशतवादी ठरणार का? माणसाची खरी गंमत व गल्लत इथे आहे. माणूस
देणाऱ्याला प्राधान्य देताना स्वतःला-घेणाऱ्याला दुर्लक्षित करतो तसेच देणाऱ्याचा
निर्णायक होण्याचा प्रयन्त करतो.
दहशत घेणारा व्यक्ती
वास्तवात दुसऱ्याला दहशतवादी ठरवतो मात्र स्वतः अंतरंगातील भय व अहंकार ना दिसतो
ना समजतो. मुळात ज्यासंदर्भात माहिती नाही त्याची जाणीव होणार का? भय एक काल्पनिक
विचार आहे. याप्रकारचा विचार करण्यामागे आहे त्याचा हुंकार आहे. भय हे दक्षतेच्या
अभावाचे एका लक्षण-एक निष्पत्ती आहे. मात्र माणूस दहशतवादात यामुलाभूत गोष्टींचा
विचार करतो का? दहशतवादाचे मर्म ते मागोवा घेताना माणूस इतरांच्या अंतरंगात
डोकावतो मात्र थोडे स्वतःच्या अंतरंगात देखील डोकावले पाहिजे कारण दृष्टी तशी
सृष्टी यामुळे जेकाही सृष्टीत भासते त्याचा मागोवा प्रथम दृष्टी-अंतरंगात घेतला
पाहिजे नाही तर काखेत कळासा आणि गावाला वळसा होणार यामध्ये शंका नाही.
Comments
Post a Comment