लायकीचे मोज-माप


सध्या समाजात अनेक व्यक्तींच्या जवळ इतरांची लायकीचे मोजण्याचे मशीन असावे कारण उठ-सुठ इतरांची लायकी तपासण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः सामाजिक सांकेतिक स्थळांना भेट देताच यासंदर्भातील प्रत्यय मिळतो. सामाजिक सांकेतिक स्थळांवरील प्रतिक्रिया पहा जो तो इतरांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात लायकी काढण्याचा प्रयन्त करतो.
एखाद्या व्यक्तीची योग्यता-अयोग्यता तपासणे म्हणजे अप्रत्याक्षात लायकी ठरणे आहे मात्र आम्ही याला लायकी तपासणे न समजता समीक्षण, स्वतःचे मत प्रकट करणे समजतो. आपण व्यक्तिगत मत जरूर प्रकट करावे मात्र काही दक्षता बाळगत मत प्रकट करावे तसेच न विसरता मला वाटते हे नमूद करावे, परंतु असा प्रकार दुर्मिळ तेने घडतो. यामागे स्वाभाविकरित्या अज्ञान आहे.
आपण ज्या सहजतेने इतरांची लायकी काढतो त्यामागे अज्ञान आहे. सर्वात प्रथम व्यक्तिगत दृष्टी व आकलन संदर्भात अज्ञान नंतर संकल्पना संदर्भात अज्ञान आहे. तसेच आपण निरीक्षक आहोत की समीक्षक तसेच विद्यार्थी आहोत की शिक्षक याचे भान नसणे यामुळे असा लायकी काढण्याचा प्रकार घडतो.
लायकी म्हणजे काय? तर एक संकल्पना आहे. लायकी म्हणजे व्यक्तीच्या जडण-घडण नुसार बदलणारी संकल्पना आहे. ज्याच्या दृष्टीने पैसा म्हणजे दैवत-खूप काही, सगळे काही त्याची लायकीची संकल्पना म्हणजे ज्याच्या जवळ पैसा तो लायक बाकी नालायक. काही व्यक्तींच्या मते जो माझा सल्ला ऐकतो, माझ्या शब्दाबाहेर जात नाही तोच लायक. काहीच्या मते जो माझ्या पुढे-मागे गोंडा घोळतो तोच लायक. थोडक्यात प्रत्येकाच्या दृष्टीने लायकीची संकल्पना तसेच संदर्भ बदलतात.
गंमत म्हणजे एक व्यक्ती त्याच्या स्वाभाविक संकल्पना नुसार आचरण करतो मात्र त्याचे आचरण पाहणारे, समीक्षण करणारे हजारो ये लाखो आहेत. पाहणारा व्यक्ती स्वतःच्या संकल्पना नुसार अन्वयार्थ घेतो तसेच यावरून लायकी ठरवतो. कृती करणाऱ्याने स्वतःच्या संकल्पना नुसार वाटचाल करावी की इतरांच्या संकल्पना नुसार वाटचाल करावी? आपण स्वतः काय करतो? ज्याला स्वतःच्या संकल्पना संदर्भात ज्ञान नाही तो इतरांच्या संकल्पना लक्षात घेणार का?
कोणताही व्यक्ती कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीची लायकी काढतो यामुळे अप्रत्याक्षात स्वतःचे अज्ञान जग जाहीर करतो. इतरांची लायकी काढणाऱ्या व्यक्ती अहंकारी वर्गात मोडतात कारण विवेकाचा अभाव. विवेकी माणूस स्वतःची लायकी पाहतो मात्र अहंकारी दुसऱ्यांची लायकी ठरवतो. दुसऱ्यांची लायकी तपासण्यात अहंकारची सोय आहे. अहंकाराला यामुळे प्रकट होण्यास संधी मिळते.
प्रत्यक्षात एक माणूस दुसऱ्या माणसाला नालायक ठरवतो कारण अप्रत्याक्षात स्वतःला लायक ठरवण्यास संधी मिळते. दुसऱ्या शब्दात इतरांची रेष पुसत स्वतःची रेष मोठी ठरवण्याचा प्रयन्त व प्रकार घडतो. अर्थात कधी अवधानाने तर कधी अनवधानाने असा प्रकार घडतो. वास्तवात जो लायक नाही तोच इतरांची लायकी ठरवतो. मुळात ज्याला स्वतः च्या लायकी संदर्भात ज्ञान नाही तोच दुसऱ्यांची लायकी तपासत फिरतो. ज्याला लायकी संदर्भात ज्ञान नाही तो इतरांची लायकी तपासण्याला लायक आहे का? थोडे स्वतःचे परीक्षण करून पहा म्हणजे प्रत्यय मिळणार आहे. तसेच हा प्रत्यय असावा ही वर्तमान काळाची एक गरज आहे.
वर्तमान काळात ज्याकाही सामाजिक समस्या आहेत त्यामागे लायकी तपासणे तसेच काढणे यांची भूमिका निर्णायक आहे. दहशतवाद असो की नक्षलवाद, जातीयवाद असो की प्रांतीयवाद अथवा भाषावाद यासारख्या हिंसाचारात ज्यांना नालायक समजण्यात येते त्यांनाच मारहाण ते जीवे मारण्याचा प्रकार घडतो. अर्थात यामागे मुलभूत घटक अहंकार असल्याने असे प्रकार घडतात मात्र मानव या सगळ्यांना भिन्न मानतो कारण एकता संदर्भात अज्ञान.
जो दुसऱ्यांची लायकी काढतो-ठरवतो तो आज ना उद्या तोंडघशी पडतो मात्र पडलो तरी तोंड वर म्हणतो. थोडा विचार करून पहा ज्यावेळी दुसरे आपली लायकी ठरवतात किंवा काढतात त्यावेळी आपण कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देतो? आपली प्रतिक्रिया सामाजिक समस्या निवारण करणारी की निर्मुलन करणारी? अखेर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे पण स्वातंत्र आणि स्वैराचार यामध्ये अंतर आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे त्याचा आदर कराव कारण आदर दिला तर आदर मिळेल. निर्णय आपण घ्यायचा तसेच परिणाम पण आपणच भोगणार आहोत. 

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते