प्रेम व घृणा
आज प्रेमाचा दिवस
साजरा करण्याची प्रथा-परंपरा आहे. पाश्चिमात्य देशात दिवस साजरा करण्यात येतो तसेच
आपल्याकडे सन साजरा करण्याची प्रथा-परंपरा आहे. काही व्यक्ती प्रेमाचा दिवस साजरा
करण्यास विरोध करतात गमंत म्हणजे या विरोध करणाऱ्या व्यक्ती देखील प्रेम करतात
मात्र त्याच प्रेमासोबत कृतघ्नपणा करतात कारण मानवी स्वभाव. कृतघ्नता हा मानवी
स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. अर्थात यामागे अज्ञान आहे.
प्रेम करतात तेच
प्रेमासोबत कृतघ्नपणा करतात. अर्थात हा प्रकार जाणीवपूर्वक करतात असे नाही तर हा
प्रकार अनावधानाने घडतो. अनावधान मागे अहंकार आहे. अहंकार त्याठिकाणी
घृणा-तिरस्कार येणार. घृणा व तिरस्कार यामध्ये प्रेमाची दुसरी बाजू आहे. प्रेम ही
नाण्याची एक बाजू आहे त्याची दुसरी बाजू घृणा आहे. प्रेम ही विवेकाची निष्पत्ती
आहे तर घृणा ही अहंकाराची निष्पत्ती आहे. प्रेम असो की घृणा या निखळ निष्पत्ती
आहेत. काही व्यक्ती यांना कृती समजतात परंतु यामध्ये कृती नाही.
प्रेम असो की घृणा
करावी लागत नाही तर निर्माण-निष्पन्न होते. विवेकाचा भाव किंवा अहंकाराचा अभाव
त्याठिकाणीच प्रेम आहे तेच अहंकाराचा भाव किंवा विवेकाचा अभाव त्याठिकाणी घृणा
निर्माण होते. प्रेम व घृणा विरुद्धार्थी तसेच परस्परपूरक आहेत. प्रेम विना घृणा
नाही तसेच घृणा विना प्रेम नाही. माणूस सोयीने प्रेम तसेच घृणा करतो. सामान्यतः
माणूस यांना कृती समजतो कारण अज्ञान.
माणूस ज्याला प्रेम
व घृणा समजतो ते करतो कारण त्याच्या कृतीमागे त्याचा समज व स्वभाव आहे. यामुळेच
वर्तमान मानवाने प्रेम असो की घृणा यांचा बाजार मांडला आहे. माणूस एकीकडे प्रेम
करण्याच्या वल्गना करतो तेच दुसरीकडे घृणा करतो. मी करतो ते प्रेम बाकीचे करतात
त्यामध्ये वासना आहे.
प्रेम म्हणजे काय?
प्रेम एक अनुभव आहे. या अनुभवाची अभिव्यक्ती करण्याचा प्रयन्त करता शब्द अपुरे
पडतात. प्रेम या एका शब्दात समस्त धर्म सार देखील आहे. प्रेमात विना अट समर्पण
आहे. प्रेमात दुसऱ्याकडून अपेक्षा नसतात ना दुसऱ्याला बदलण्याचा प्रयन्त करण्यात
येतो. प्रेमात स्वतःची सोय पेक्षा दुसऱ्याची सोय महत्वाची असते. स्वतःच्या
सुखापेक्षा दुसऱ्याचे सुख महत्वाचे असते. प्रेमात माझे-तुझे नसते तर आपले असते.
थोडक्यात प्रेम हा अहंकार मुक्तीचा अनुभव आहे कदाचित यामुळेच माणूस प्रेमाला विसरू
शकत नाही. प्रेमात एक नशा, निर्भयता आहे. प्रेमात माणसाला जगाचे विस्मरण होते.
थोडक्यात प्रेमात असणारा पाहता क्षणी समजतो.
प्रेम मानवाच्या
जीवनात क्रांतीकारक बदल घडवते. कोणत्याही व्यक्तीला कोणतीही गोष्ट प्रेमाने सांगता
तो पालन करतो. प्रेमात जी ताकद आहे ती दुसऱ्या कोणत्याही घटकात नाही. अर्थात ते
प्रेम असावे परंतु काही व्यक्ती स्वतः वर प्रेम करतात (अहंकार) त्याव्यक्ती
प्रेमात परिवर्तन करतात.
जो व्यक्ती प्रेमात
पडतो त्याला कधी कारण विचारून पहा त्याला उत्तर देता येणार नाही. वास्तवात प्रेम
ही विवेकाची अवस्था आहे यामुळे यामध्ये सशार्तता नसते. प्रेमात सहजता असते हीच
सहजता जर सामाजिक जीवनात आली तर समस्त सामाजिक समस्या निर्मुलन होणार आहेत. फक्त
प्रेमाला व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे.
खरा तो एकीची धर्म
जगाला प्रेम अर्पावे. मात्र मानव प्रेमाला संकुचित स्वरुपात पाहतो तसेच त्याचे
संकुचित आकलन करतो यामुळेच एकीकडे प्रेम करताना घृणा देखील करतो. मानवी अहंकार
मानवाला तसेच मानवाच्या आकलनास संकुचित करतो तेच विवेक मानवाला व्यापकता प्रदान
करतो.
आज एकमेकांना फुल,
पत्र, भेटकार्ड देत गळ्यात गळा घालून फिरणे, सिनेमा पाहणे, स्वप्नरंजन करणे
यापलीकडे जाऊन प्रेमाचे व्यापक तसेच उदात्त स्वरूप पाहण्याची गरज आहे. आज आपण
आपल्या अंतरंगात डोकाऊन पहा प्रेमाचे क्षण किती व घृणेचे क्षण किती. यादोन्हीची
गोळाबेरीज करून प्रत्य घ्यावा. प्रेमाचे क्षण म्हणजे विवेकाचे क्षण तेच घृणेचे
क्षण म्हणजे अहंकाराचे क्षण आहेत. मानव
विवेक व अहंकार यादरम्यान दोलायमान असतो कारण अस्थिरता. तेच जर तो विवेक वर स्थिर
झाला तर परिपूर्ण होतो प्रेम त्याचे एक लक्षण आहे, प्रेमाला कोणी शांती म्हणते तर
कोणी अहिंसा म्हणते. एका शब्दात प्रेम हेच जीवन ध्येय-सार आहे.
वर्तमान मानव
जीवनातील अनेक ध्येय प्राप्त करतो मात्र मुळात जे जीवन आहे तेच दुर्लक्षित करतो.
आपण स्वतः काय करतो?
Comments
Post a Comment