कोण कोणासाठी?
वर्तमान समाजातील
मानवाचे राहणे-बोलणे-वागणे पहिले तर मनात सहजतेने प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे
माणसासाठी संकल्पना की संक्ल्पनासाठी माणूस आहे? मुळात अनेकांना संकल्पना व सत्य
यातील अंतरच माहित नाही यामुळे तो संकल्पना म्हणजे सत्य मानत आचरण करतो तसेच
प्रसंगी यासंकल्पना साठी वास्तविक मानवाचा बळी दिला तसेच घेतला जातो. विशेष म्हणजे
कधी काळी या संकल्पना मानवी समूहात अस्तित्वात नव्हत्या मात्र मानव अस्तीत्वा
मध्ये होता.
मानवाने उत्क्रांती
करीत प्रवास करताना मानवाने भाषा, संस्कृती, प्रांत, जात-धर्म, वंश, राष्ट्र, देश या
सारख्या संकल्पना निर्माण केल्या कारण आकलन तसेच सामाजिक सुलभता निर्माण होत
समाजात एक प्रकारचा समन्वय निर्माण करता यावा. अर्थात कोणत्याही संकल्पनेला जन्म
देताना त्यामागे चांगला-योग्य असा विचार होता मात्र चांगला-योग्य हे काळाच्या प्रवासात
वाईट-अयोग्य यामध्ये रुपांतरीत झाले कारण परिवर्तन हा निसर्ग नियम आहे.
काळाच्या ओघात अनेक
संकल्पना निर्माण तसेच नामशेष झाल्या तेच काहींचे अस्तित्व आजही आहे मात्र
त्यामध्ये परिवर्तन झाल्याचे निदर्शनास येते. काळाच्या ओघात अनेक भाषा, संस्कृती,
प्रांत, जाती-धर्म, वंश, राष्ट्र, देश निर्माण तसेच नष्ट झाले. वास्तव यामागे
परिवर्तन आहे. भाषा, संस्कृती, प्रांत, जाती-धर्म, वंश, राष्ट्र, देश यांची जागा
दुसऱ्यांनी घेतली म्हणा किंवा स्वरूप परिवर्तन म्हणा घडत गेले तसेच घडत असून
भविष्यात घडत राहणार आहे.
संकल्पना या मानवी
जीवनाच्या अविभाज्य घटक आहेत. संकल्पना विना मानववाटचाल करण्यास असमर्थ आहे
यामध्ये शंका नाही मात्र जो मानव या संकल्पना सत्य मानतो तो गल्लत करतो. मानव
संकल्पना सत्य मानतो कारण अज्ञान. अज्ञान त्याठिकाणी अहंकार. किंबहुना मानवी
उत्क्रांती मध्ये या अहंकाराची भूमिका निर्णायक आहे. अहंकारामुळे मानवाने
उत्क्रांती केली. अहंकार म्हणजे आहे त्याचा हुंकार. वर्तमान समाजात हुंकार
भरण्याची प्रवृत्ती बोकाळत आहे.
अज्ञानी माणूस
अहंकार हेच स्वतःचे अस्तित्व मानत वाटचाल करतो. अज्ञानी मानवाला अहंकाराचा संभ्रम
ना समजतो ना उमजतो. संकल्पना समवेत अहंकार जोडला जातो तो स्वाभिमान व अस्मिता या
स्वरुपात असतो. मात्र वास्तवात अहंकार असल्याने तुलना करणे, सर्वोच्च, सर्वोत्तम
अश्या घोषणा ते वल्गना करणे किंवा यासंकल्पना संकटात आहेत अशी हाकाटी पिटणे
यासारखे प्रकार घडतात सोबत माणूस आक्रमक होत रक्षण करण्यासाठी सरसावत सरळ दुसऱ्या
माणसांना जिवानिशी मारतो.
मानव अज्ञाना मुळेच
असे प्रकार करतो. संकल्पना रक्षण ते संवर्धन करताना वास्तविक मानवाचा बळी
देणे-घेणे यासारखे प्रकार करतो. मानव वास्तवात भक्षण करतो मात्र त्याला रक्षण
समजतो. मानव आभासाला स्वतः बळी पडतो मात्र दुसऱ्यांना दोषी-द्रोही ठरवण्याचा
प्रयन्त तसेच प्रकार करतो. आपण आपल्या संकल्पनांचा कधी मागोवा घेतला आहे का? थोडा
प्रयन्त करून पाहावा म्हणजे संभ्रम गळून पडतील. एकी कडे संभ्रमाला सत्य मानतात
त्यांना मनोरुग्ण ठरवण्यात येते मात्र आम्हाला स्वतःची मनोरुग्नता समजते का?
प्रयन्त करून पहावा त्याविना प्रत्यय मिळणार नाही.
Comments
Post a Comment