सामंजस्याचा अभाव


वर्तमान समाजात जे काही घडते-बिघडते याचा अनेक व्यक्ती व्यक्तिगत परीने अभ्यास करतात अर्थात प्रत्येकाच्या अभ्यासाला तसेच अभिव्यक्तीला काही मर्यादा आहेत. मात्र मानव स्वतःच्या आकलन मर्यादा विसरतो यामुळे सगळा गोंधळ घडतो. सध्या समाजात जे काही घडते त्यामध्ये मानवी आकलन तसेच आकलन मर्यादा विस्मरण यांना निर्णायक भूमिका आहे.
मानव स्वतःच्या आकलन मर्यादा दुर्लक्षित करतो यामुळे जे काही समज बाळगतो त्यांना सत्य मानतो. एखादी गोष्ट समजावून घेण्याचा प्रयन्त करतो मात्र याला समजले असे मानतो तसेच माझा समज हेच अंतिम सत्य मानत इतरांनी देखील हेच सत्य मानावे असा अट्टाहास ते आग्रह करीत स्वतःचा समज लादण्याचा प्रयन्त करण्यात येतो.
एखादी गोष्ट-घटना समजावून घेण्याचा प्रयन्त व समजली यामध्ये अंतर आहे. समजावून घेण्याचा प्रयन्त म्हणजे विद्यार्थी अवस्था द्योतक असून निष्कर्ष घेतलेला नाही तेच समजले म्हणजे निष्कर्ष तयार आहे तसेच परिपूर्णत्व द्योतक आहे. कोणताही समज हा गैरसमज विना परिपूर्ण होत नाही. मानवाचा प्रत्येक समज हा अप्रत्याक्षात गैरसमज आहे फक्त त्यामधील गैर हे प्रत्यक्ष स्वरूप धारण करणार त्यावेळी गैर समज लक्षात येतो. समज विना गैरसमज नाही तसेच गैरसमज विना समज नाही. थोडक्यात नाण्याच्या दोन्ही बाजू विना पूर्णत्व नाही.
माणूस एकांगी पाहतो, त्याधून एकांगी आकलन करतो म्हणजे एकांगी समजतो मात्र एकांगी म्हणजे परिपूर्ण नाही. अर्थात हे समजण्यासाठी-जाणवण्यासाठी स्वतःच्या आकलन मर्यादा संदर्भात भान पाहिजे मात्र वर्तमान समाजात हेच भान नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. याचे प्रमुख लक्षण म्हणजे जो तो दुसऱ्याला शिकवण्याचा- समजावण्याचा प्रयन्त करतो, प्रसंगी तुला समजत नाही, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही याप्रकारचे वाक्य वापरण्यात येते.
कोणत्याही घटने मध्ये कर्ता आहे. त्या घटनेचा अभ्यास करताना कर्त्याच्या दृष्टीने आकलन, अभ्यास करण्याची गरज आहे मात्र जे निरीक्षक-अभ्यासक आहेत ते व्यक्तिगत दृष्टीने पाहतात इथे मुलभूत गल्लत घडते. दृष्टी बदलताच आकलन संकल्पना तसेच निकष बदलतात यामुळे निष्कर्ष बदलतो. दहशतवादी घटना घडणे म्हणजे एक नित्याची बाब आहे. दहशतवादाचे अनेक अभ्यासक-विश्लेषक-निरीक्षक-समीक्षक आहेत. प्रत्येकाची दृष्टी तसेच आकलन व आकलन संकल्पना भिन्न आहेत यामुळे सगळ्यांचे निकष तसेच निष्कर्ष भिन्न आहेत.
दहशतवादाचा अभ्यासक बदलतो त्याप्रमाणे निष्कर्ष बदलतो जर प्रत्येक अभ्यासकाचा समज तसेच निष्कर्ष सत्य मानला तर एकाच दहशतवादाची सत्य अनेक तर त्या सत्याला किंमत काय? मुळात जो कोणी अभ्यासक आहे तो स्वतःच्या दृष्टी व आकलन परत्वे मागोवा घेतो की दहशतवादीच्या दृष्टीने मागोवा घेतो याला अनन्य साधारण महत्व आहे. कर्ता व्यक्ती अभ्यासकाच्या दृष्टी व आकलन नुसार क्रुती करणार की स्वतःच्या दृष्टी-आकलन यांच्या नुसार कृती करणार? प्रत्येकाला स्वतःची दृष्टी तसेच आकलन आहे तसेच यांच्या सोयीनुसार प्रत्येक व्यक्ती आचरण करतो तसेच पाहणारा-अभ्यास करणारा स्वतःची सोय पाहतो यामुळे कोणत्याही व्यक्तीचा यासंदर्भातील समज हा एक गैरसमज आहे तसेच जे काही समजले ते सत्य नसून एक शक्यता आहे.
माणूस स्वतःच्या समज मधील गैरसमज तसेच शक्यता न पाहता स्वतःचा निष्कर्ष हेच सत्य मानतो यामुळे गल्लत करतो मात्र यासंदर्भात जाणीव नसल्याने किंवा अज्ञान असल्याने इतरांवर लादण्याचा प्रयन्त करतो. तेच समज सोबत अहंकार जोडला गेला तर आक्रमक होत आकांडतांडव देखील करतो कारण समजाचे अस्तित्व हे त्याचे अस्तित्व होते. हेच स्वतःचे आकलना अपरिपूर्ण असल्याची जाण व भान असेल तर आपण समजावून घेण्याचा प्रयन्त करीत आहोत याचे भान राहते. हेच सामंजस्य आहे. याठिकाणी समजवून घेण्यामुळे ना निर्णय ना सत्यता यामुळे ना आवेग ना आक्रमकता.
थोडक्यात आपण विद्यार्थी आहोत याची जाणीव असेल तरच समजावून घेता येणार आहे. तसेच यामुळे सामंजस्य निर्माण होणार आहे. सामंजस्य त्याठिकाणी कलह, वादंग, विवाद, हिंसा होत नाही कारण विवेक तसेच सयंम. वर्तमान समाजातील घडण्या-बिघडण्या मागे सयंम तसेच विवेक यांचा अभाव आहे किंवा अहंकार, अज्ञान यांचा प्रभाव आहे. अहंकार व अज्ञान त्याठिकाणी सामंजस्याचा अभाव निर्माण होणार हे स्वाभाविक आहे.
स्वतःच्या स्वभावाचे परीक्षण करून पहावे म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे. आपण समजावून घेतो की समजावून सांगतो? माझा समज एक गैर समज मानतो की सत्य मानतो? आपण सगळे मिळूनच समाज निर्माण करतो.     

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते