लोका सांगे ब्रम्ह ज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषण.
लोका सांगे ब्राम्ह
ज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषण ही एक मराठी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय घ्यायचा
असेल तर टीम अन्नाचे रण धुरंदर सेनानी श्री.अरविंद केजरीवाल यांचे आचरण पहावे.
महाशय स्वतः स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य करण्याच्या फंदात पडत नाहीत मात्र जगाला
त्यांची कर्तव्य बेंबीच्या देठापासून ओरडून सांगण्याचा प्रयन्त करतात.
जो व्यक्ती स्वतःचे
राष्ट्रीय कर्तव्य करीत नाही तो व्यक्ती राष्ट्रीय प्रश्न संदर्भात अधिकार वाणीने
बोलण्यास पात्र आहे का? जो स्वतःच्या कर्तव्यात कसूर करतो त्याने इतरांच्या
कर्तव्यातील कसूर संदर्भात आकांड-तांडव करावे का? तसेच मी कर्तव्याला कसूर करून
देखील लायक तेच दुसऱ्याने कसूर केला की नाही यापेक्षा मला वाटतो म्हणून कसूर केला
यामुळे तो नालायक? मुळात जो दुसऱ्यांची पात्रता ठरवतो, दुसऱ्यांनी काय करावे हे
ठरवतो त्याचा इतका नालायक दुसरा कोणीही नाही.
श्री.केजरीवाल हे
स्वतः मतदान करण्याचे सोयीस्कररीत्या टाळतात वर निवडणूक प्रक्रिया सुधारणा
करण्याच्या वल्गना करतात याचा अन्वयार्थ काय? स्वतः शासकीय सेवेत असताना जो
करारनामा केला त्यानुसार सेवा मुक्त होताना भरावी लागणारी रक्कम भरण्याचे टाळतात
वर सरकार मुद्दाम कारवाई करीत असल्याचे सांगत फिरतात. सरकारने काम करावे तरी
पंचाईत नाही करावे तर निकामी-कुजकामी सरकार ही हेटाळणी यांनीच करावी.
स्वतःचे शासकीय देणे
देताना मी समाजकारण करतो यामुळे मला सुट-सवलत दिलीच पाहिजे असा दावा. समाजाने
यांना समाजकारण करण्यासाठी पत्र पाठवून विनंती केली होती की बंदुकीचा धाक दाखवत
पदाचा राजीनामा देण्यास भाग पडले होते? श्री केजारीवाला यांना स्वतःला समाजकारण
करण्याची इच्छा होती यामुळे त्यांनी राजीनाम दिला मात्र तो देताना करार उल्लंघन
पोटी द्यावी लागणारी रक्कम भरली नाही. तसेच ती रक्कम भरण्यास व्यापक प्रमाणात
टाळाटाळ देखील करून पहिली. शासकीय देणे न देणे किंवा ते देण्यास टाळाटाळ करणे
भ्रष्टाचार आहे का नाही? शासकीय सेवेत राहून समाजकारण करता येणे अशक्य आहे का?
शासकीय सेवा ही मुळात समाजकारणासाठीच आहे.
मानव निर्मित
कोणतीही प्रणाली परिपूर्ण नाही कारण मुळात माणूस अपरीपूर्ण आहे. मानवत त्रूटी आहेत
यामुळेच मानव निर्मित प्रत्येक प्रणालीत त्रूटी आहेत. तसेच कोणत्याही प्रणाली मधील
त्रूटी दूर करण्यासाठी त्या प्रणालीत प्रवेश करावा लागतो त्याविना त्रूटी दूर करता
येत नाही. श्री.केजरीवाल हे स्वतः त्या प्रणालीत प्रवेश करण्यास तयार नाहीत मात्र
मी सांगतो त्याच पद्धतीने त्रूटी दूर कराव्या असा अट्टाहास करतात. थोडक्यात पाण्या
बाहेर काठावर बसून हातात पोहण्याच्या कलेचे पुस्तक घेत पाण्यात उतरलेल्या
व्यक्तीला कसे पोहावे हे शिकवण्याचा प्रयन्त करताना तुझी पद्धत चुकीची असून मी
सांगतो त्याच पद्धतीने पोहायचे अन्यथा तुम्ही मुद्दाम करता, तुम्ही नालायक आहात.
सामाजिक जीवनात आचरण
करताना आपण कोणत्याही प्रकारचा गैरसमज, अफवा, अज्ञान यांचा प्रचार व प्रसार करू
नये हे सामाजिक तसेच राष्ट्रीय कर्तव्य आहे. कायदा आहे की नाही हा भाग वेगळा कारण
कायदा धाब्यावर बसवणे ही आमची संस्कृती आहे. श्री. केजरीवाल समाजात गैरसमज, अफवा,
अज्ञान यांचा प्रचार व प्रसार जाहीररीत्या करीत आहेत. भ्रष्टाचार म्हणजे सरकार व
शासकीय अधिकारी यांची एक उत्पती-निष्पत्ती आहे. तसेच लोकपाला सारखा हुकुमशाह-कायदा
या समस्त भ्रष्टाचाराचे नियंत्रण-निर्मुलन करणार आहे. भ्रष्टाचारात समाजाला काही
कर्तव्यात्मक भूमिका नाही.
सरकार व सरकारी
अधिकारी तद्दन नालायक, कामचुकार तसेच भ्रष्ट आहेत मात्र समस्त समाज हा धुतल्या
तांदळा सारखा किंवा श्री.अण्णा हजारे यांच्या कपड्या सारखा पांढरा शुभ्र आहे.
कदाचित यामुळेच श्री.केजरिवाल यांना स्वतःचा भ्रष्टाचार तसेच समाजाचा भ्रष्टाचार
दिसला नसावा. तसेच आपण कर्तव्याला कसूर करतो त्याच प्रमाणे जनता कसूर करते याचे
भान-जाण नसावी.
श्री.केजरीवाल हे
समाजातील एका वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. स्वतः कर्तव्य करायचे नाही मात्र
दुसऱ्याकडे बोट दाखवत फिरायचे. स्वतः मधील त्रुटींचा मागोवा घ्यायचा नाही मात्र
दुसऱ्यांच्या त्रूटी शोधत फिरायचे. स्वतः मध्ये सुधारणा न करता जगात सुधारणा
करण्याच्या वल्गना करायच्या, स्वतःच्या डोळ्यातील कुसळ न पाहता इतरांच्या डोळ्यात मुसळ
शोधण्याच्या प्रयन्त करायचा. स्वतःची दृष्टी जी सृष्टी दर्शवते ते फक्त प्रतिबिंब
आहे. दृष्टी जो आभास निर्माण करते त्याला सत्य मानतात त्याच व्यक्ती लोका सांगे
ब्रम्ह ज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषण.
थोडे स्वतःचे
परीक्षण करून पहा तसेच प्रत्यय घ्या.
Comments
Post a Comment