प्रलोभानाचे बळी
सध्या भ्रमणध्वनी
धारक तसेच इमेल धारकांना फोन किंवा मेल मिळते त्यानुसार मोठ्या रकमेची
लॉटरी-बक्षीस तुम्हाला मिळाल्याचे सांगण्यात येते. काही व्यक्ती यावर विश्वास
ठेवतात तसेच नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. फसवणुकीचा प्रकार समाजात नवीन नाही
फक्त काळाच्या ओघात स्वरूप तसेच पद्धत यामध्ये बदल झाला आहे.
कोणत्याही
कालखंडातील माणूस हा फसतो कारण प्रलोभन. फासणारा माणूस स्वतः प्रलोभन पाहत
आशा-अपेक्षा ते कल्पनाविलास करतो यामुळे फसगत होते. वास्तवात समोरचा माणूस फसवणूक
करतो यापेक्षा माणूस प्रलोभन पाई भुलतो. प्रलोभन दिसताच धावतो मात्र क्षणभर थांबून
समग्र विचार करीत नाही. तसेच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समोरच्या फसवणाऱ्या
व्यक्तीच्या नावे शंख करण्यास सुरुवात करतो. प्रसंगी पोलीस व त्याची कार्यक्षमता
यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
कमी किमतीला मिळणारे
सोने असो की कोणत्याही प्रकारचे समान माणूस फायद्याचा विचार करीत प्रलोभनाला
भुलतो. तसे पाहता यासारखे प्रकार समाजात सातत्याने घडत होते तसेच आहेत व भविष्यात
देखील घडत राहणार आहेत कारण प्रलोभन-लोभ-हाव या मानवी स्वाभाविक घटकांचा काही
व्यक्ती फायदा-गैरफायदा घेणार यामध्ये शंका नाही. गंमत म्हणजे प्रलोभन दाखवणारा
असो की त्या प्रलोभनाला बळी पडणारा असो दोघांचा उद्देश एकच असतो तो म्हणजे माझा
फायदा, कमी श्रम-मूल्यात खूप काही मिळवणे. दोघांच्या स्वभावात लोभ-हाव आहे,
दोघांच्या दृष्टीने मार्ग महत्वाचा नसून मिळकत महत्वाची आहे.
सामान्यतः प्रलोभन
कोणत्या प्रकारची याबद्दल अनेकांना माहित आहेत मात्र काही प्रलोभना पासून समाज
अज्ञानी आहे. काही प्रलोभने ही व्यावसाईक मुखवट्याने करण्यात येतात. सध्या
जाहिरातींचा जमाना आहे. तुम्ही गोरे होणार, तुमच्या मुलाचा आत्मविश्वास-उंची-शक्ती
वाढणार यासारखे काही प्रलोभन दर्शवण्यात येतात. सामान्य माणूस प्रलोभनाला बळी पडतो
कारण अज्ञान. अज्ञान त्याठिकाणी अहंकार तसेच बेसावधपणा म्हणा किंवा जागरुकतेचा
अभाव म्हणा शब्द महत्वाचा नसून अवस्था महत्वाची आहे.
कोणताही जागरूक
व्यक्ती कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही कारण ज्ञान, सदसदविवेकबुद्धी. अहंकार
त्याठिकाणी स्वार्थाला प्राधान्य तसेच संकुचित विचार क्षमता. अहंकारी माणूस फक्त
स्वतःच्या फायद्याचा विचार करताना दुसऱ्यांचा होणारा तोटा दुर्लक्षित करतो. जो
व्यक्ती आम्हाला प्रलोभन दाखवतो तो स्वतःचा तोटा करून घेण्या इतका मुर्ख असतो का?
अर्थात जे मुर्ख समजतात तेच महामुर्ख ठरतात हा भाग वेगळा आहे. या मूर्खपणाचा कळस
म्हणजे ज्याने फसवले त्याच्या नावाने आरडा-ओरड करणे. एखाद्याने मला फसवले यामध्ये
फसवणारा शहाणा ठरतो पण त्याच वेळी मी फसलो हा माझा मुर्खपणा ठरतो. समोरच्याने
माझ्या स्वभावातील लोभाचा फायदा घेतला पण माझ्या लोभाने माझा घात केला याला
दुर्लक्षित करण्यात येते.
जगातील कोणता
व्यक्ती काय करतो यापेक्षा आपण काय करतो याचा विचार केला तर आम्हाला आपल्या
स्वभावातील अहंकार तसेच लोभ-हाव, स्वार्थ, अज्ञान निदर्शनास येणार आहे. तसेच
प्रलोभन म्हणजे लोभाला प्रवृत्त करणारा घटक असल्याची जाणीव होणार आहे. लोभाचे काही
फायदे आहेत त्याच प्रमाणे तोटे देखील आहेत. काही ग्रामीण भागात फायद्यापेक्षा
भोळ्याची अपेक्षा जास्त असे म्हणतात यावर्गवारीत मोडणाऱ्या व्यक्तींना पश्चाताप
करावा लागतो कारण यांचे तेलही जाते व तूपही जाते प्रसंगी धुपाटणे देखील जाते. आपण
या वर्गवारीत मोडायचे की विवेकी वर्गवारीत मोडत काष्ठाने मिळेल त्यामध्ये समाधानी
राहावे हा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा मात्र अहंकाराला प्राधान्य देणारा
प्रलोभानाचा बळी ठरत स्वतःचा लोभ-हाव जगजाहीर करणार आहे यामध्ये तिळमात्र शंका
नाही.
Comments
Post a Comment