अंथरूण पाहून पाय पसरणे


अंथरूण पाहून पाय पसरणे ही एक म्हण तसेच स्वभाव आहे. मानसिकता हा स्वभावाचा अविभाज्य घटक आहे त्याप्रमाणे संस्कार व संस्कृती यांची एक निष्पत्ती आहे. कधी काळी भारतीय संस्कृती मध्ये अंथरूण पाहून पाय पसारण्याला अनन्य साधारण महत्व होते. थोडक्यात आपली कुवत व मर्यादा याची जाणीव व भान राखत आचरण करण्याची मानसिकता-स्वभाव होता. मात्र काळाच्या ओघात परिवर्तन या निसर्ग नियम नुसार यामध्ये बदल होत आहे.
कर्जाचे अथवा उधार-उसनवारीचे ठिगळ लावत अथवा पाठबळ घेत भरारी मारण्याचा प्रयन्त करण्यात येतो म्हणजे थोडक्यात वाघाचे कातडे पांघरून गाढव स्वतःला वाघ समजतो असा काहीसा प्रकार होत आहे. अर्थात उसने अवसान गळून पडते तसेच गाढव स्वाभाविक रित्या रेकते यामुळे जगाला वास्तव समजते. थोडक्यात आपली मर्यादा न पाहता आचरण करण्याची परिणीती भोगावी लागते. यामुळेच आज जगभरात आर्थिक मंदी व दिवाळखोरीची परिस्थिती आहे.
अर्थाला दोन अर्थ आहेत एक लक्ष्मी द्योतक तर दुसरा शारदा द्योतक आहे. एक अर्थ पैसा दर्शवतो तर दुसरा ज्ञान दर्शवतो. आज जगात पैसा असो की ज्ञान संदर्भात दिवाळखोरी निर्माण होत आहे. अर्थात काही व्यक्तींना आर्थिक सुबत्ता निर्माण होत असल्याचा आभास-भ्रम होत आहे कारण वास्तवाचे अज्ञान आहे. एकंदरीत आर्थिक दिवाळखोरी मागे अंथरूण न पाहता पाय पसरण्याची प्रवृत्ती आहे. दुसऱ्या शब्दात मर्यादा न पाहता आचरण करणारी प्रवृत्ती म्हणजेच अतिरेक करणारी प्रवृत्ती असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
वर्तमान मानव वर्तमान काळाला विज्ञानाचे-स्पर्धेचे युग-काळ समजतो-मानतो मात्र वास्तवात हा अतिरेकाचा जमाना आहे. मर्यादा उल्लंघन करता अतिरेक घडतो पण मानवाला स्वतःचा अतिरेक समजत नाही किंवा तो स्वतःच्या कृतीला अतिरेक मानत नाही. मात्र मर्यादा उल्लंघन करतो त्याच वेळी अतिरेक घडतो. गंमत म्हणजे वर्तमान मानवाला स्वतःचा अतिरेक कळत-समजत नाही पण दुसऱ्यांचा अतिरेक समजतो असा दावा करीत एका विशिष्ट समूहाला अतिरेकी ठरवण्यात येते.
वर्तमान मानवाला धड स्वतःची कृती तसेच त्यामागील कारक संदर्भात ज्ञान नाही वर जगाची कृती तसेच त्यामागील कारक समजल्याचा दावा करण्यात येतो. स्वतःच्या कृती मागील उद्देश असो की प्रक्रिया संदर्भात ज्ञान नाही वर इतरांच्या कृती मागील उद्देश असो की प्रक्रिया समजल्याचा दावा करतो. वर्तमान मानव स्वतः काय करावे हे स्वतः ठरवतो तसेच इतरांनी काय करावे हे देखील स्वतः ठरवतो त्यावेळी आपण व्यक्तिगत मर्यादा उल्लंघन करतो, अतिरेक करतो याचे त्याला भान नाही तसेच स्वतःचा अतिरेक योग्य मात्र इतरांचा अयोग्य आहे.
वर्तमान मानवाच्या आचरणात मर्यादा आहेत का? मानवाच्या आशा-अपेक्षा-आकांक्षा यांना मर्यादा आहेत का? माझा फायदा होताना इतरांचा तोटा झाला हरकत नाही, माझी सोय होताना इतरांची होणारी गैरसोय संदर्भात मला काही घेणे-देणे नाही. आज मानवी अतिरेक मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे पण मानवाला त्याच्याशी सोयरे-सुतक नाही. मानवी आचरणात स्वार्थ हा केंद्रबिंदू आहे यामुळे त्याला जगाशी काही देणे-घेणे नाही फक्त माझा फायदा, विचार, मत, तत्व हेच अंतिम सत्य होत आहे. अर्थात यामागे स्वाभाविक अज्ञान तसेच अनुकरण आहे.
अक्कल संपली की नक्कल हा सामाजशात्राचा नियम आहे. वर्तमान मानव स्वतःच्या मर्यादा न पाहता अनुकरणाचा देखील अतिरेक करीत आहे. मानवाला मुळात स्वतःच्या निसर्गतः असणाऱ्या मर्यादा संदर्भात ज्ञान नाही मात्र इतरांच्या मर्यादा संदर्भात ज्ञान असण्याच्या वल्गना करतो अर्थात यामध्ये अनुकरण आहे तसेच स्वतःच्या मर्यादित आकलन क्षमतानुसार जे योग्य त्याचे अनुकरण करताना अयोग्यचे देखील अनुकरण करण्यात येत आहे.
आज मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक क्षेत्रात अतिरेक घडत आहे कारण मुळात ना मर्यादा माहित ना अंथरूण माहित मात्र मर्यादा उल्लंघन करीत अतिरेक तसेच याचे त्याचे उधार-उसनवारीचे अंथरूण घेत ठिगळ लावण्याचा प्रकार घडतो आहे. अर्थात जशी मती तशी कृती तसेच परिणाम-दुष्परिणाम आहेत ते भोगावे लागत आहेत. तणाव, अशांतता, असुरक्षितता,aaaa अनिश्चितता यामागे मर्यादा उल्लंघन आहे फक्त पाहण्याची गरज आहे. अर्थात जग काय करते यापेक्षा आपण काय करतो याला महत्व आहे. काही महाभाग जगासोबत वाटचाल समजत अतिरेक करतात मात्र जगाची वाटचाल स्वतः ठरवत मर्यादा उल्लंघन करतात.
जागतिक इतिहास चाळून पाहावा म्हणजे मर्यादा पालन करणाऱ्यांनी घडवलेला इतिहास निदर्शनास येणार आहे सोबत मर्यादा उल्लंघन करणाऱ्यांनी बिघडवलेला इतिहास लक्षात येणार आहे. अर्थात जे घडले-बिघडले त्यापासून अर्थबोध घेतला तर अंथरूण बघून पाय पसरावे हे उत्तम.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

पेरावे तसे उगवते